शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

आता १७ हजार हेक्टरला मिळणार बावनथडीचे पाणी

By admin | Updated: December 13, 2014 22:33 IST

भूसंपादन आणि जमिनीचा मोबदला देण्याचे प्रकरण प्रलंबित असल्यामुळे आंतरराज्यीय बावनथडी सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील सुमारे १० हजार हेक्टर शेतजमीन सिंचनापासून वंचित आहे.

भंडारा : भूसंपादन आणि जमिनीचा मोबदला देण्याचे प्रकरण प्रलंबित असल्यामुळे आंतरराज्यीय बावनथडी सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील सुमारे १० हजार हेक्टर शेतजमीन सिंचनापासून वंचित आहे. आता हे प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यात आले असून सिंचनापासून वंचित शेतील पाणी मिळणार असल्याची माहिती आमदार चरण वाघमारे यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.यावेळी ते म्हणाले, बावनथडी प्रकल्पाचे काम दोन वर्षापूर्वी पूर्ण झाले. धरणातून सिंचनासाठी पाणी देणे सुरू आहे. परंतु, हे पाणी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील केवळ सात हजार शेतजमिनीला मिळत आहे. १० हजार हेक्टर शेतजमीन सिंचनापासून वंचित आहे. या प्रकल्पासाठी जमीन संपादनाची १४५ प्रकरणे विचाराधीन आहेत. त्यावर निर्णय झालेला नाही. तर ५८ हेक्टर शेतजमीन संपादनाची कार्यवाही पूर्ण झालेली नाही.हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केल्यानंतर नागपूर येथील सिंचन भवनात बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीत प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ५८ हेक्टर शेतजमीन संपादनाच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन एक महिन्या कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यामुळे या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील १७ हजार हेक्टर शेतजमिनीच्या सिंचनाचा मार्ग मोकळा झाला आहे. या हिवाळी अधिवेशनात ७० तारांकित प्रश्न, २० लक्षवेधी उपस्थित केले. ज्यात यात नागठाणा, सोरना, बघेडा आणि चांदपूर या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतजमिनीला बावनथडीच्या लाभक्षेत्रात सामावून घेण्यात यावे, पेंच प्रकल्पाचे पाणी बेटेकर (बोथली) मध्यम प्रकल्पात सोडण्यात यावे, मोहाडी तालुक्यातील फुटाळा तलावाच्या नहरासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही, या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, वैगंगा नदीवरील रोहा-मुंढरी या मार्गावर पुलासह बंधारा बांधण्यात यावा, या मागणीला बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हिरवी झेंडी दिली आहे. तुमसर-गोंदिया राज्य मार्गावरील उड्डाणपुल आणि बायपास रोड, पाचगाव येथे नवोदय विद्यालय, मोहाडीत तालुका क्रीडा संकुलाची कामे सुरू होणार असून जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी आणि नायब तहसीलदारांची रिक्त पदे भरण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. कायम विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोटीनयुक्त पोषण आहार मिळावे, मागीलवर्षीच्या धान खरेदीतील अनियमिततेची चौकशी आणि उंचावर असलेल्या सिंचनापासून वंचित गावांची गावांची सुधारीत आणेवारी करुन वस्तुनिष्ठ सर्व्हेक्षण करण्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित केल्याचे आ.वाघमारे यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)