शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

आता १७ हजार हेक्टरला मिळणार बावनथडीचे पाणी

By admin | Updated: December 13, 2014 22:33 IST

भूसंपादन आणि जमिनीचा मोबदला देण्याचे प्रकरण प्रलंबित असल्यामुळे आंतरराज्यीय बावनथडी सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील सुमारे १० हजार हेक्टर शेतजमीन सिंचनापासून वंचित आहे.

भंडारा : भूसंपादन आणि जमिनीचा मोबदला देण्याचे प्रकरण प्रलंबित असल्यामुळे आंतरराज्यीय बावनथडी सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील सुमारे १० हजार हेक्टर शेतजमीन सिंचनापासून वंचित आहे. आता हे प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यात आले असून सिंचनापासून वंचित शेतील पाणी मिळणार असल्याची माहिती आमदार चरण वाघमारे यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.यावेळी ते म्हणाले, बावनथडी प्रकल्पाचे काम दोन वर्षापूर्वी पूर्ण झाले. धरणातून सिंचनासाठी पाणी देणे सुरू आहे. परंतु, हे पाणी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील केवळ सात हजार शेतजमिनीला मिळत आहे. १० हजार हेक्टर शेतजमीन सिंचनापासून वंचित आहे. या प्रकल्पासाठी जमीन संपादनाची १४५ प्रकरणे विचाराधीन आहेत. त्यावर निर्णय झालेला नाही. तर ५८ हेक्टर शेतजमीन संपादनाची कार्यवाही पूर्ण झालेली नाही.हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केल्यानंतर नागपूर येथील सिंचन भवनात बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीत प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ५८ हेक्टर शेतजमीन संपादनाच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन एक महिन्या कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यामुळे या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील १७ हजार हेक्टर शेतजमिनीच्या सिंचनाचा मार्ग मोकळा झाला आहे. या हिवाळी अधिवेशनात ७० तारांकित प्रश्न, २० लक्षवेधी उपस्थित केले. ज्यात यात नागठाणा, सोरना, बघेडा आणि चांदपूर या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतजमिनीला बावनथडीच्या लाभक्षेत्रात सामावून घेण्यात यावे, पेंच प्रकल्पाचे पाणी बेटेकर (बोथली) मध्यम प्रकल्पात सोडण्यात यावे, मोहाडी तालुक्यातील फुटाळा तलावाच्या नहरासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही, या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, वैगंगा नदीवरील रोहा-मुंढरी या मार्गावर पुलासह बंधारा बांधण्यात यावा, या मागणीला बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हिरवी झेंडी दिली आहे. तुमसर-गोंदिया राज्य मार्गावरील उड्डाणपुल आणि बायपास रोड, पाचगाव येथे नवोदय विद्यालय, मोहाडीत तालुका क्रीडा संकुलाची कामे सुरू होणार असून जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी आणि नायब तहसीलदारांची रिक्त पदे भरण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. कायम विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोटीनयुक्त पोषण आहार मिळावे, मागीलवर्षीच्या धान खरेदीतील अनियमिततेची चौकशी आणि उंचावर असलेल्या सिंचनापासून वंचित गावांची गावांची सुधारीत आणेवारी करुन वस्तुनिष्ठ सर्व्हेक्षण करण्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित केल्याचे आ.वाघमारे यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)