शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

राष्ट्रवादीचे कुकडे यांचे नामांकन दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:41 IST

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई व पीरिपा आघाडीचे संयुक्त उमेदवार मधुकर कुकडे यांनी आपला उमेदवारी अर्ज गुरूवारला दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यू काळे यांच्याकडे सादर केला.

ठळक मुद्देलोकसभा पोटनिवडणूक : भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई व पीरिपा आघाडीचे संयुक्त उमेदवार मधुकर कुकडे यांनी आपला उमेदवारी अर्ज गुरूवारला दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यू काळे यांच्याकडे सादर केला.यावेळी राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल, माजी खासदार नाना पटोले, गोंदियाचे आ.गोपालदास अग्रवाल, सावनेरचे आ.सुनिल केदार, आ.प्रकाश गजभिये, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, नाना पंचबुद्धे, माजी आमदार राजेंद्र जैन, अ‍ॅड.आनंदराव वंजारी, सेवक वाघाये, दिलीप बन्सोड, रमेश बंग, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, रिपाईचे वसंत हुमणे यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी व आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. सभेनंतर ट्रॅक्टर मिरवणुकीद्वारे कुकडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन नामांकनअर्ज दाखल केला.तुम्ही शिफारस करा, आम्ही उमेदवारी देऊनामांकन दाखल करण्यापूर्वी आयोजित सभेत काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी प्रफुल्ल पटेल यांना उद्देशून आपण वर्षा पटेल यांची उमेदवारी कापली, याचा उल्लेख केला. हाच धागा पकडून प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या भाषणात पुढच्या सार्वत्रिक निवडणुकीत आपण सर्वांनी मिळून वर्षा पटेल यांच्या नावाची शिफारस केली तर त्यांनाही उमेदवारी देता येईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.सर्वांनी एकदिलाने काम करा - प्रफुल्ल पटेलभविष्यात येणाऱ्या कुठल्याही निवडणुका आपण एकत्रितपणे लढण्याची गरज आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाचा मी जिल्ह्यात मोठा भाऊ असल्यामुळे आता ही जबाबदारी माझी राहणार आहे. त्यामुळे राजी-नाराजी, किंतू-परंतु मनात ठेऊ नका. त्यासाठी आपण सर्वांनी भंडारा-गोंदिया जिल्हा भाजपमुक्त करण्यासाठी एकदिलाने काम करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले. यावेळी खा.पटेल म्हणाले, केंद्र आणि राज्य शासनाने वारेमाप घोषणा दिल्या परंतु प्रत्यक्षात घोषणांची अमंलबजावणी झालेली नाही. सर्वच स्तरात असंतोष पसरलेला आहे. आता सर्वांनी मिळून केंद्र व राज्य सरकारचे अपयश जनतेसमोर मांडा, असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस