शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

अतिवृष्टीच्या नुकसानीचे अद्यापही पंचनामे नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 06:00 IST

भंडारा तालुक्यातील यात सर्वात जास्त शेतकऱ्यांचा समावेश आहे. पूरामुळे भंडारा जिल्ह्यातील जवळपास ८२ नदीकाठावरील गावांना पुराचा फटका बसतो. त्यात सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने घरांसह जनावरांचे गोठेही उध्वस्त होतात. शेकडो हेक्टरातील धानपिक पाण्याखाली आल्याने पीक सडले आहे.

ठळक मुद्देशेकडो हेक्टरला फटका : तात्काळ सर्वेक्षण करून मदतीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात गत आठवड्यात अतिवृष्टी झाली. यात जिल्हाभरातील शेकडो हेक्टरातील धानपीक पाण्याखाली आले आहे. परिणामी आधीच सुलतानी संकटाचा सामना करीत असलेल्या बळीराजावर अस्मानी संकटही कोसळले आहेत. अशा स्थितीत नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिलेले नाही. यामुळे सदर नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून बळीराजाला मदत देण्याची गरज आहे.भंडारा तालुक्यातील यात सर्वात जास्त शेतकऱ्यांचा समावेश आहे. पूरामुळे भंडारा जिल्ह्यातील जवळपास ८२ नदीकाठावरील गावांना पुराचा फटका बसतो. त्यात सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने घरांसह जनावरांचे गोठेही उध्वस्त होतात. शेकडो हेक्टरातील धानपिक पाण्याखाली आल्याने पीक सडले आहे. विद्यमान स्थितीत काही शेतशिवारात बांध्यांमध्ये पाणी साचले असल्याने ते दृश्य पाहून शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. अशावेळी या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे. पवनी तालुक्यातील चिचाळ परिसरातही असेच नुकसान झाल्याची माहिती आहे. यासंदर्भात नुकसानग्रस्तांना मदत देण्यात यावी, अशी मागणी भंडारा तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मंगेश हुमणे यांनी केली आहे.याच बरोबर गाव तथा मुख्यालयाशी जोडणाऱ्या नाल्यांच्या पुलांची उंची वाढविण्याचीही गरज आहे. अतिवृष्टीमुळे भंडारा तालुक्यातील चांदोरी ते शिंगोरी मार्गावर असलेल्या पुलावर पाच दिवस पाणी असल्याने वाहतूक ठप्प पडली होती. याचा फटका ग्रामस्थांना सहन करावा लागला.या गावांचा समावेशभंडारा तालुक्यातील नदीकाठावर असलेल्या खैरी, कोथुर्णा, दाभा, टाकळी, माडगी, खमारी, सालेबर्डी, पिपरी, सुरेवाडा, करचखेडा, कारधा, सिरसघाट, कोरंभी, गणेशपूर, पिंडकेपार, टेकेपार, मौदी खास, जांब, ईटगाव, पागोरा आदी गावातील शेतशिवारात पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. नदीकाठावरील गावाच्या वेशीवर असलेल्या नाल्यात जनावरेही वाहून गेली. अशामुळे पशुपालकांचे नुकसान झाले आहे. त्यांनाही मदतीची मागणी आहे. याशिवाय मोहाडी, तुमसर, लाखांदूर, साकोली, लाखनी येथेही नुकसान झाले आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती