शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

अतिवृष्टीच्या नुकसानीचे अद्यापही पंचनामे नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 06:00 IST

भंडारा तालुक्यातील यात सर्वात जास्त शेतकऱ्यांचा समावेश आहे. पूरामुळे भंडारा जिल्ह्यातील जवळपास ८२ नदीकाठावरील गावांना पुराचा फटका बसतो. त्यात सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने घरांसह जनावरांचे गोठेही उध्वस्त होतात. शेकडो हेक्टरातील धानपिक पाण्याखाली आल्याने पीक सडले आहे.

ठळक मुद्देशेकडो हेक्टरला फटका : तात्काळ सर्वेक्षण करून मदतीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात गत आठवड्यात अतिवृष्टी झाली. यात जिल्हाभरातील शेकडो हेक्टरातील धानपीक पाण्याखाली आले आहे. परिणामी आधीच सुलतानी संकटाचा सामना करीत असलेल्या बळीराजावर अस्मानी संकटही कोसळले आहेत. अशा स्थितीत नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिलेले नाही. यामुळे सदर नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून बळीराजाला मदत देण्याची गरज आहे.भंडारा तालुक्यातील यात सर्वात जास्त शेतकऱ्यांचा समावेश आहे. पूरामुळे भंडारा जिल्ह्यातील जवळपास ८२ नदीकाठावरील गावांना पुराचा फटका बसतो. त्यात सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने घरांसह जनावरांचे गोठेही उध्वस्त होतात. शेकडो हेक्टरातील धानपिक पाण्याखाली आल्याने पीक सडले आहे. विद्यमान स्थितीत काही शेतशिवारात बांध्यांमध्ये पाणी साचले असल्याने ते दृश्य पाहून शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. अशावेळी या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे. पवनी तालुक्यातील चिचाळ परिसरातही असेच नुकसान झाल्याची माहिती आहे. यासंदर्भात नुकसानग्रस्तांना मदत देण्यात यावी, अशी मागणी भंडारा तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मंगेश हुमणे यांनी केली आहे.याच बरोबर गाव तथा मुख्यालयाशी जोडणाऱ्या नाल्यांच्या पुलांची उंची वाढविण्याचीही गरज आहे. अतिवृष्टीमुळे भंडारा तालुक्यातील चांदोरी ते शिंगोरी मार्गावर असलेल्या पुलावर पाच दिवस पाणी असल्याने वाहतूक ठप्प पडली होती. याचा फटका ग्रामस्थांना सहन करावा लागला.या गावांचा समावेशभंडारा तालुक्यातील नदीकाठावर असलेल्या खैरी, कोथुर्णा, दाभा, टाकळी, माडगी, खमारी, सालेबर्डी, पिपरी, सुरेवाडा, करचखेडा, कारधा, सिरसघाट, कोरंभी, गणेशपूर, पिंडकेपार, टेकेपार, मौदी खास, जांब, ईटगाव, पागोरा आदी गावातील शेतशिवारात पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. नदीकाठावरील गावाच्या वेशीवर असलेल्या नाल्यात जनावरेही वाहून गेली. अशामुळे पशुपालकांचे नुकसान झाले आहे. त्यांनाही मदतीची मागणी आहे. याशिवाय मोहाडी, तुमसर, लाखांदूर, साकोली, लाखनी येथेही नुकसान झाले आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती