शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

ना धानाचे चुकारे ना पैशाची व्यवस्था, दिवाळी साजरी करावी तरी कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2021 17:59 IST

दिवाळी अगदी एक दिवसावर आली तरी शेतकरी आजही धान कापणीसाठी शेतातच राबताना दिसत आहे. कुणाच्याही चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद दिसत नाही.

ठळक मुद्देशेतकरी शेतात : गावखेड्यात दिवाळीचा उत्साहच नाही

भंडारा : कोरोना संसर्गाने ग्रामीण अर्थव्यवस्था मोडकळीस आली असताना निसर्गाचे दुष्टचक्रही शेतकऱ्यांच्या पाठीशी लागले आहे. दिवाळी अगदी एक दिवसावर आली असतानाही गावखेड्यात उत्साहच दिसत नाही. शेतकरी शेतातच राबत असून, पैशाची तजवीज करताना नाकीनव येत आहेत.

भंडारा हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. दिवाळीचा सण हा धानपिकावर साजरा केला जातो. परंतु गत काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. गत दीड वर्षात तर कोरोनाने संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. कुणाच्याही हातात पैसे नाही. गावखेड्यातून शहरात रोजगारासाठी गेलेले गावात रिकामे बसून आहेत. अशा स्थितीत दिवाळी साजरी कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे. धान विकून पैसे आणावे तर व्यापारी अत्यल्प दरात धान खरेदी करीत आहेत. आधारभूत केंद्रावर धान द्यावा तर वेळेवर पैसे मिळण्याची शक्यता नाही. अशा द्विधा मनस्थितीत शेतकरी सापडला आहे.

पूर्वी दिवाळी म्हणजे गावात उत्साहाचे-आनंदाचे वातावरण असायचे. पाच दिवस दिवाळी म्हणजे आनंदाची पर्वणी असायची. नवीन वस्तूंसह कपड्यालत्त्यांची खरेदी व्हायची. घरांची रंगरंगोटी केली जायची. परंतु आता हे सर्व चित्र बदलले आहे. दिवाळी अगदी एक दिवसावर आली तरी शेतकरी आजही धान कापणीसाठी शेतातच राबताना दिसत आहे. कुणाच्याही चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद दिसत नाही.

आठवडी बाजारातही गर्दी दिसेना

ग्रामीण भागात खरेदीचे हक्काचे ठिकाण म्हणजे आठवडी बाजार. दिवाळीपूर्वीचा आठवडी बाजार म्हणजे वर्षातील सर्वांत मोठा बाजार. प्रत्येक वस्तू खरेदी करण्याचा या बाजारात ग्रामीण जनतेचा कल असतो, परंतु शेतकरी आणि शेतमजुरांची आर्थिक स्थिती बिकट असल्याने खरेदीकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे. गत आठवडाभरापासून जिल्ह्याच्या विविध ठिकाणी असलेल्या आठवडी बाजारात हवी तशी गर्दीच झाली नाही.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीDiwaliदिवाळी 2021