शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची आत्महत्या ४५ पैकी नऊ प्रकरणे अपात्र

By admin | Updated: December 31, 2016 01:41 IST

नापिकी व कर्जाला कंटाळून ४५ शेतकऱ्यांनी वर्षभरात मृत्यूला कवटाळले. जिल्हास्तरीय समितीकडून

३६ कुटुंबीयांना मदत : सर्वाधिक आत्महत्या लाखांदूर तालुक्यात भंडारा : नापिकी व कर्जाला कंटाळून ४५ शेतकऱ्यांनी वर्षभरात मृत्यूला कवटाळले. जिल्हास्तरीय समितीकडून शेतकऱ्यांच्या आत्महत्येची नऊ प्रकरण अपात्र ठरविली. पात्र ठरलेल्या प्रस्तावात मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबाला ३६ लाखांची मदत दिल्याचे दिसून येते. वर्षाच्या प्रारंभीच म्हणजे जानेवारी महिन्यात १० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. फेब्रुवारी व मार्च महिन्यात चार, एप्रिल महिन्यात पाच, मेमध्ये चार, जून सहा, जुलै पाच, आगस्ट दोन, सप्टेंबर तीन, आॅक्टोंबर दोन, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली आहे. सर्वाधिक आत्महत्या या लाखांदूर तालुक्यात झाल्या असून अकरा शेतकऱ्यांनी जीवन संपविले. लाखनी तालुक्यात आठ शेतकऱ्यानी मृत्यूला कवटाळले. त्यानंतर साकोली व पवनी तालुक्यातील प्रत्येकी सात तर तुमसर व भंडारा तालुक्यात प्रत्येक पाच शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ केले. जिल्ह्यातील शेतकरी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे चित्र आहेत. शेतीसाठी मुबलक पाण्याची गरज आहे. पंरतु पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांना दरवर्षी असमानी व सुलतानी संकटाचा सामाना करावा लागतो. यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस बरसला. मान्सूनने उशीरा हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्याचे नियोजन कोलमडले. पेरणी केली पण पावसाअभावी रोवणी होऊ शकली नाही. कधी अतिवृष्टी, अवकाळी पाऊस गारपीट, रोग किडीचा प्रादुर्भाव यामुळे पिकाचे नुकसान होत गेले. परिणामी शेतकऱ्यांना खरीप हंगामात अपेक्षेप्रमाणे उत्पन्न मिळाले नाही. तद्वतच लागवडीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड होऊ शकली नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखने एक मोठे आवाहन शासनापुढे असून समाजासमोर चिंतेचा विषय बनला आहे. (प्रतिनिधी)