शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

निलागोंदी-किन्ही रस्त्याची दैनावस्था

By admin | Updated: March 16, 2015 00:32 IST

किन्ही ते लाखनी या ग्रामीण मार्गाला जोडणारा निलागोंदी-किन्ही रस्त्याची दैनावस्था झाली आहे. यामुळे नागरिक व वानधारकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे.

सालेभाटा : किन्ही ते लाखनी या ग्रामीण मार्गाला जोडणारा निलागोंदी-किन्ही रस्त्याची दैनावस्था झाली आहे. यामुळे नागरिक व वानधारकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे.निलागोंदी-किन्ही चार किमी अंतराचा रस्ता आहे. या मार्गाने साकोली-सालेभाटामार्गे निलागोंदी बस सेवा सुरु आहे तर ट्रॅक्स, दुचाकी वाहने व इतरही जडवस्तू वाहून नेणारे चारचाकी वाहने या रस्त्यांनी सतत धावत आहेत. साधा खडीकरणाचा रस्ता असल्यामुळे रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्याचप्रमाणे गिट्टीही उखडलेली आहे. सायकलस्वारांना सायकल चालविणे कठीण आहे.ज्या रस्त्यावरुन दिवसभरात पाचही वाहने चालत नाही. अशा रस्त्यांवर डांबरीकरण आहे. परंतु सततच्या रहदारीच्या मार्गावर मागील २० वर्षापासून खडीकरणाचे काम होऊ शकले नाही हे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. लाखनी ते निलागोंदी मार्गे किन्ही हा वर्दळीचा रस्ता आहे. शेतकऱ्यांना शेतात बैलबंडीने जाणे अवघड झालेले आहे. पावसाळयामध्ये खोल खड्डयात पाणी साचून राहतात. त्यामुळे वाहन चालविताना चालकाचे निंयत्रण सुटले वा तांत्रिक बिघाड वाहनामध्ये आल्यास मोठा अनर्थ घडू शकतो. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मुख्य रहदारी असलेल्या निलागोंदी-किन्ही रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम तात्काळ सुरु करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)