शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

निलागोंदी-किन्ही रस्त्याची दैनावस्था

By admin | Updated: March 16, 2015 00:32 IST

किन्ही ते लाखनी या ग्रामीण मार्गाला जोडणारा निलागोंदी-किन्ही रस्त्याची दैनावस्था झाली आहे. यामुळे नागरिक व वानधारकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे.

सालेभाटा : किन्ही ते लाखनी या ग्रामीण मार्गाला जोडणारा निलागोंदी-किन्ही रस्त्याची दैनावस्था झाली आहे. यामुळे नागरिक व वानधारकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे.निलागोंदी-किन्ही चार किमी अंतराचा रस्ता आहे. या मार्गाने साकोली-सालेभाटामार्गे निलागोंदी बस सेवा सुरु आहे तर ट्रॅक्स, दुचाकी वाहने व इतरही जडवस्तू वाहून नेणारे चारचाकी वाहने या रस्त्यांनी सतत धावत आहेत. साधा खडीकरणाचा रस्ता असल्यामुळे रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्याचप्रमाणे गिट्टीही उखडलेली आहे. सायकलस्वारांना सायकल चालविणे कठीण आहे.ज्या रस्त्यावरुन दिवसभरात पाचही वाहने चालत नाही. अशा रस्त्यांवर डांबरीकरण आहे. परंतु सततच्या रहदारीच्या मार्गावर मागील २० वर्षापासून खडीकरणाचे काम होऊ शकले नाही हे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. लाखनी ते निलागोंदी मार्गे किन्ही हा वर्दळीचा रस्ता आहे. शेतकऱ्यांना शेतात बैलबंडीने जाणे अवघड झालेले आहे. पावसाळयामध्ये खोल खड्डयात पाणी साचून राहतात. त्यामुळे वाहन चालविताना चालकाचे निंयत्रण सुटले वा तांत्रिक बिघाड वाहनामध्ये आल्यास मोठा अनर्थ घडू शकतो. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मुख्य रहदारी असलेल्या निलागोंदी-किन्ही रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम तात्काळ सुरु करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)