शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

नवीन वर्षात लग्न समारंभ केवळ 50 पाहुण्यांच्या उपस्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2022 05:00 IST

विवाह समारंभ बंदिस्त असो की मोकळ्या जागेत कार्यक्रमात केवळ ५० पाहुण्यांच्या उपस्थितीलाच परवानगी राहणार आहे, तसेच सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रमातही ५० व्यक्तींच्या मर्यादेतच परवानगी देण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने यापूर्वी निर्गमित केलेले आदेश लागू राहणार आहेत. त्यात सार्वजनिक ठिकाणी रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  जिल्ह्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात असला तरी लगतच्या नागपूर जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक होऊ लागला आहे. त्यातच ओमायक्रॉन व्हेरिएंटचे संकट घोंगावत आहे. गर्दी टाळण्यासाठी आता नवीन वर्षात लग्न समारंभ केवळ ५० पाहुण्यांच्या उपस्थितीतच पार पाडावे लागणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी संदीप कदम नवर्षाच्या पूर्वसंध्येला आदेश निर्गमित केला.कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन नवीन व्हेरिएंटचा प्रसार अलीकडे अत्यंत वेगाने होत आहे. राज्यातही बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भंडारा जिल्ह्यात अद्यापपर्यंत ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला नसून कोरोना रुग्णसंख्याही अत्यल्प आहे. मात्र, आगामी काळात काही दिवसांत लग्नसराई व इतर कार्यक्रमात नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रुग्णसंख्या वाढण्याची भीती आहे. हीच बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने अधिक निर्बंध लागू केले आहेत. २५ डिसेंबर रोजी निर्गमित आदेशात बदल करून आता नव्याने निर्देश जारी करण्यात आले आहेत.विवाह समारंभ बंदिस्त असो की मोकळ्या जागेत कार्यक्रमात केवळ ५० पाहुण्यांच्या उपस्थितीलाच परवानगी राहणार आहे, तसेच सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रमातही ५० व्यक्तींच्या मर्यादेतच परवानगी देण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने यापूर्वी निर्गमित केलेले आदेश लागू राहणार आहेत. त्यात सार्वजनिक ठिकाणी रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. रेस्टॉरंट, हॉटेल, जीम, ब्युटी पार्लर, चित्रपटगृहे, नाट्यगृहामध्ये क्षमतेच्या ५० टक्के नागरिकांची उपस्थिती निर्धारित करण्यात आली आहे. क्रीडा स्पर्धांसाठी प्रेक्षक क्षमतेच्या २५ टक्के नागरिकांनाच उपस्थित राहता येणार आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले असून, सदर आदेश ३१ डिसेंबरपासून अमलात आला           आहे.

अंत्यसंस्काराला २० आप्तस्वकीयांना परवानगी- अंत्यसंस्काराला आता २० व्यक्तींनाच उपस्थित राहण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत असेच निर्बंध अंत्यसंस्कारासाठी घालण्यात आले होते. आता पुन्हा नवीन वर्षात २० आप्तांच्या उपस्थितीचे बंधन राहणार आहे. यासोबतच इतर कार्यक्रमांवरही निर्बंध आणण्यात आले आहे. नागरिकांनी ओमायक्रॉन व्हेरिएन्टचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्न