शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

नवीन वर्षात लग्न समारंभ केवळ 50 पाहुण्यांच्या उपस्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2022 05:00 IST

विवाह समारंभ बंदिस्त असो की मोकळ्या जागेत कार्यक्रमात केवळ ५० पाहुण्यांच्या उपस्थितीलाच परवानगी राहणार आहे, तसेच सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रमातही ५० व्यक्तींच्या मर्यादेतच परवानगी देण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने यापूर्वी निर्गमित केलेले आदेश लागू राहणार आहेत. त्यात सार्वजनिक ठिकाणी रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  जिल्ह्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात असला तरी लगतच्या नागपूर जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक होऊ लागला आहे. त्यातच ओमायक्रॉन व्हेरिएंटचे संकट घोंगावत आहे. गर्दी टाळण्यासाठी आता नवीन वर्षात लग्न समारंभ केवळ ५० पाहुण्यांच्या उपस्थितीतच पार पाडावे लागणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी संदीप कदम नवर्षाच्या पूर्वसंध्येला आदेश निर्गमित केला.कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन नवीन व्हेरिएंटचा प्रसार अलीकडे अत्यंत वेगाने होत आहे. राज्यातही बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भंडारा जिल्ह्यात अद्यापपर्यंत ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला नसून कोरोना रुग्णसंख्याही अत्यल्प आहे. मात्र, आगामी काळात काही दिवसांत लग्नसराई व इतर कार्यक्रमात नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रुग्णसंख्या वाढण्याची भीती आहे. हीच बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने अधिक निर्बंध लागू केले आहेत. २५ डिसेंबर रोजी निर्गमित आदेशात बदल करून आता नव्याने निर्देश जारी करण्यात आले आहेत.विवाह समारंभ बंदिस्त असो की मोकळ्या जागेत कार्यक्रमात केवळ ५० पाहुण्यांच्या उपस्थितीलाच परवानगी राहणार आहे, तसेच सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रमातही ५० व्यक्तींच्या मर्यादेतच परवानगी देण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने यापूर्वी निर्गमित केलेले आदेश लागू राहणार आहेत. त्यात सार्वजनिक ठिकाणी रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. रेस्टॉरंट, हॉटेल, जीम, ब्युटी पार्लर, चित्रपटगृहे, नाट्यगृहामध्ये क्षमतेच्या ५० टक्के नागरिकांची उपस्थिती निर्धारित करण्यात आली आहे. क्रीडा स्पर्धांसाठी प्रेक्षक क्षमतेच्या २५ टक्के नागरिकांनाच उपस्थित राहता येणार आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले असून, सदर आदेश ३१ डिसेंबरपासून अमलात आला           आहे.

अंत्यसंस्काराला २० आप्तस्वकीयांना परवानगी- अंत्यसंस्काराला आता २० व्यक्तींनाच उपस्थित राहण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत असेच निर्बंध अंत्यसंस्कारासाठी घालण्यात आले होते. आता पुन्हा नवीन वर्षात २० आप्तांच्या उपस्थितीचे बंधन राहणार आहे. यासोबतच इतर कार्यक्रमांवरही निर्बंध आणण्यात आले आहे. नागरिकांनी ओमायक्रॉन व्हेरिएन्टचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्न