शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

पारंपरिक लग्नपद्धतीत नवीन प्रथा होताहेत रूढ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 13:57 IST

अनेक प्रथांचे इव्हेंट झाल्याने पैशाची उधळपट्टी: अनावश्यक व खर्च टाळण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्ककिटाडी : आजकाल विवाह सोहळ्यामध्ये नवनवीन विधी उद्यास आल्या आहेत. त्यात नव्याने रूढ झालेली मेहंदी व हजारो रुपये खर्च हळदी समारंभात करून विशेष सजावट केली जाते. त्या दिवशी हिरवे- पिवळे कपडे (ड्रेसकोड) घालतात. पूर्वी मेहंदी व हळदी विधीची प्रथा ग्रामीण भागात कुठेही दिसून येत नव्हती. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांपासून ग्रामीण भागात ही प्रथा झपाट्याने वाढल्याचे चित्र आहे.

पूर्वी मेहंदी व हळदी विधीच्या मागे कोणताही दिखावा नव्हता. उलट त्यामागे धार्मिक व शास्त्रीय तर्क होते. पूर्वी ग्रामीण भागात आजच्यासारखे साबण, शाम्पू, आणि इतर साधनेही नव्हती. ब्यूटी पार्लरही नव्हते. त्यामुळे वधू-वरांच्या चेहऱ्यावर उजळपणा येण्यासाठी आणि चेहरा मुलायम व चमकदार करण्यासाठी हळद, चंदन, मैदा आणि दुधापासून तयार केलेल्या मिश्रणाचा वापर करून चेहरा व शरीर रगडून काढले जात होते. जेणेकरून, वधू-वर सुंदर दिसतील. पूर्वी या कामाची जबाबदारी महिलांची होती; पण आजकाल हळदीचा विधी बदललेला असून दिखाऊ आणि महाग झालेला आहे. समारंभात ड्रेसकोड घातले जातात.

वधू-वर किंवा परिवार फक्त यांचेच ड्रेसकोड नसतात, तर सोबतच मामा, मावशी, आत्या, बहिणी, जावई, मेहुणे, पाहुणे आदी गोतावळा यांचेसुद्धा वेगवेगळ्या फॅशनचे निरनिराळे कपडे असतात. सोबतच नृत्य व गीतांचा कार्यक्रमही आयोजित केला जातो. जुन्याकाळी वधू-वर कोणताही गाजावाजा न करता भक्कमपणे आपले जीवन आनंदाने सुरू करीत असत; परंतु आज दृढ हेतू व कृत्रिमता अधिक आहे. कृत्रिमतेत अडकून कुटुंबावर अतिरिक्त आर्थिक बोजा वाढवीत आहेत.

डीजेशिवाय होतच नाहीम्हटली म्हणजे त्यात बँड, धुमाल व डीजे पाहिजेच. त्याशिवाय वराच्या मित्रांना नाचण्याचा जोशच येत नाही. पैसेवाले सर्वच प्रकारचे वाद्य व वरातीची रोषणाई करून घेतात. हीच प्रथा आता ग्रामीण भागातही दिसून येत आहे. गावात जरी वरात काढली जाणार असली, तरी त्यांनाही डीजे, बँड, धुमाल हवाच. 

अनावश्यक खर्च करायला भाग पाडतातकुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही वर-वधू पालकांकडे आग्रह धरून त्यांना अनावश्यक खर्च करायला भाग शहरात वरात काढायचीपाडतात. मुला-मुलींच्या इच्छेखातर पालकही आपले मन मारून त्यांची इच्छा पुरवीत आहेत. यासाठी मात्र त्यांना कर्ज काढावे लागले तरी चालेल, अशी स्थिती आहे. सध्याची युवा पिढी या अनाठाई खर्चाला बळी पडत आहे. त्यामुळे पालकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या अशा नवीन रुजू होणाऱ्या प्रथा थांबविल्या पाहिजेत, अशी अपेक्षा समाजात व्यक्त्त होत आहे.

 

टॅग्स :marriageलग्नMONEYपैसाInflationमहागाईfashionफॅशन