शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
2
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
3
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
4
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
5
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
6
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
7
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
8
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
9
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
12
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
13
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
14
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
15
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
16
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
17
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
18
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
19
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
20
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य

पारंपरिक लग्नपद्धतीत नवीन प्रथा होताहेत रूढ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 13:57 IST

अनेक प्रथांचे इव्हेंट झाल्याने पैशाची उधळपट्टी: अनावश्यक व खर्च टाळण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्ककिटाडी : आजकाल विवाह सोहळ्यामध्ये नवनवीन विधी उद्यास आल्या आहेत. त्यात नव्याने रूढ झालेली मेहंदी व हजारो रुपये खर्च हळदी समारंभात करून विशेष सजावट केली जाते. त्या दिवशी हिरवे- पिवळे कपडे (ड्रेसकोड) घालतात. पूर्वी मेहंदी व हळदी विधीची प्रथा ग्रामीण भागात कुठेही दिसून येत नव्हती. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांपासून ग्रामीण भागात ही प्रथा झपाट्याने वाढल्याचे चित्र आहे.

पूर्वी मेहंदी व हळदी विधीच्या मागे कोणताही दिखावा नव्हता. उलट त्यामागे धार्मिक व शास्त्रीय तर्क होते. पूर्वी ग्रामीण भागात आजच्यासारखे साबण, शाम्पू, आणि इतर साधनेही नव्हती. ब्यूटी पार्लरही नव्हते. त्यामुळे वधू-वरांच्या चेहऱ्यावर उजळपणा येण्यासाठी आणि चेहरा मुलायम व चमकदार करण्यासाठी हळद, चंदन, मैदा आणि दुधापासून तयार केलेल्या मिश्रणाचा वापर करून चेहरा व शरीर रगडून काढले जात होते. जेणेकरून, वधू-वर सुंदर दिसतील. पूर्वी या कामाची जबाबदारी महिलांची होती; पण आजकाल हळदीचा विधी बदललेला असून दिखाऊ आणि महाग झालेला आहे. समारंभात ड्रेसकोड घातले जातात.

वधू-वर किंवा परिवार फक्त यांचेच ड्रेसकोड नसतात, तर सोबतच मामा, मावशी, आत्या, बहिणी, जावई, मेहुणे, पाहुणे आदी गोतावळा यांचेसुद्धा वेगवेगळ्या फॅशनचे निरनिराळे कपडे असतात. सोबतच नृत्य व गीतांचा कार्यक्रमही आयोजित केला जातो. जुन्याकाळी वधू-वर कोणताही गाजावाजा न करता भक्कमपणे आपले जीवन आनंदाने सुरू करीत असत; परंतु आज दृढ हेतू व कृत्रिमता अधिक आहे. कृत्रिमतेत अडकून कुटुंबावर अतिरिक्त आर्थिक बोजा वाढवीत आहेत.

डीजेशिवाय होतच नाहीम्हटली म्हणजे त्यात बँड, धुमाल व डीजे पाहिजेच. त्याशिवाय वराच्या मित्रांना नाचण्याचा जोशच येत नाही. पैसेवाले सर्वच प्रकारचे वाद्य व वरातीची रोषणाई करून घेतात. हीच प्रथा आता ग्रामीण भागातही दिसून येत आहे. गावात जरी वरात काढली जाणार असली, तरी त्यांनाही डीजे, बँड, धुमाल हवाच. 

अनावश्यक खर्च करायला भाग पाडतातकुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही वर-वधू पालकांकडे आग्रह धरून त्यांना अनावश्यक खर्च करायला भाग शहरात वरात काढायचीपाडतात. मुला-मुलींच्या इच्छेखातर पालकही आपले मन मारून त्यांची इच्छा पुरवीत आहेत. यासाठी मात्र त्यांना कर्ज काढावे लागले तरी चालेल, अशी स्थिती आहे. सध्याची युवा पिढी या अनाठाई खर्चाला बळी पडत आहे. त्यामुळे पालकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या अशा नवीन रुजू होणाऱ्या प्रथा थांबविल्या पाहिजेत, अशी अपेक्षा समाजात व्यक्त्त होत आहे.

 

टॅग्स :marriageलग्नMONEYपैसाInflationमहागाईfashionफॅशन