शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

एक एकरातील मिरची पिकात एक लाखांचा निव्वळ नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 06:00 IST

भंडारा हा भात उत्पादक पट्टा. येथील वातावरण धानासाठी उपयुक्त. मात्र अलिकडे निसर्गाच्या अवकृपेने धान उत्पादनातून शेतकऱ्यांच्या हाती काहीच उरले नाही. अनेक शेतकरी भाजीपाला पिकाकडे वळले. पालांदूर परिसरातही चुलबंद नदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला शेती केली जाते. त्यातच पालांदूर येथील अरुण पडोळे यांनी भाजीपाला शेती करण्याचा निर्धार केला.

ठळक मुद्देपालांदुरचा शेतकरी : अरुण पडोळे ठरले शेतकऱ्यांसाठी आदर्श

मुखरु बागडे।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर (चौ.) : शेती म्हणजे आतबट्ट्याचा व्यवहार. कितीही मेहनत घेतली तरी हाती काहीच उरत नाही, असा शेतकऱ्यांचा अनुभव. मात्र या सर्वांना फाटा देत मेहनतीच्या जोरावर पालांदुरच्या एका शेतकऱ्याने एक एकर मिरची पिकातून एक लाख रुपयांचा निव्वळ नफा कमाविला. त्यामुळेच अरुण पडोळे आता पालांदूर परिसरातील शेतकºयांसाठी आदर्श ठरले आहेत. दररोज त्यांच्या शेतावर मार्गदर्शनासाठी शेतकऱ्यांची गर्दी असते.भंडारा हा भात उत्पादक पट्टा. येथील वातावरण धानासाठी उपयुक्त. मात्र अलिकडे निसर्गाच्या अवकृपेने धान उत्पादनातून शेतकऱ्यांच्या हाती काहीच उरले नाही. अनेक शेतकरी भाजीपाला पिकाकडे वळले. पालांदूर परिसरातही चुलबंद नदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला शेती केली जाते. त्यातच पालांदूर येथील अरुण पडोळे यांनी भाजीपाला शेती करण्याचा निर्धार केला. मेहनत घेत त्यांनी मिरचीची लागवड केली. मजूर समस्येला तिलांजली देत हाती कुदळ, फावडे घेत शेती कसली. हवामानातील बदल, पाण्याची टंचाई आदींचा अभ्यास करून त्यांनी मिरचीची लागवड केली. १५ आॅगस्टला रोप टाकून सप्टेंबर महिन्यात मिरचीची लागवड केली. डिसेंबरमध्ये पहिला तोडा हाती आला. भंडाराच्या बीटीबीमध्ये त्यांना योग्य भाव मिळाला. अवघ्या एक एकरात त्यांनी चार तोड्यातून एक लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळविला. आणखी तीन चार तोडे शक्य असल्याचे अरुण पडोळे यांनी सांगितले. चुलबंद खोऱ्यात मिरचीची शेती करणारा अरुण पडोळे हा शेतकरी इतरांसाठी आदर्श ठरला आहे.पालांदूर परिसरातील मिरची उत्तम दर्जाची म्हणून प्रसिद्ध आहे. त्या मिरचीला बाजारात इतरांच्या तुलनेत चांगला भाव मिळतो. एकट्याने शेती करण्यापेक्षा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेती करावी.-बंडू बारापात्रे, अध्यक्ष बीटीबी भंडारा

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती