शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

बुद्ध व आंबेडकरांच्या विचारांची जगाला गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 01:10 IST

विश्व शांती दूत तथागत गौतम बुद्धांनी सबंध विश्वात प्रज्ञा, शील, करुणा, दया, क्षमा, शांती आणि अहिंसेचा पुरस्कार करून विश्वशांतीचे आवाहन केले. तर भारतीय संविधानाचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रात जागतिक क्रांती केली.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विश्व शांती दूत तथागत गौतम बुद्धांनी सबंध विश्वात प्रज्ञा, शील, करुणा, दया, क्षमा, शांती आणि अहिंसेचा पुरस्कार करून विश्वशांतीचे आवाहन केले. तर भारतीय संविधानाचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रात जागतिक क्रांती केली. या दोन्ही महामानवांच्या विचारांची गरज आज देशाला असल्याचे प्रतिपादन माजी सामाजिक न्याय मंत्री तथा भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत हांडोरे यांनी केले.लाखांदूर तालुक्यातील जैतपूर येथे भीमशक्ती संघटनेच्या जिल्हास्तरीय प्रबोधन विचार कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष यशवंत मेश्राम होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश उपाध्यक्ष एन.पी. पिंपळे, राजेंद्र देशभ्रतार, बाबा बन्सोड, अनिल दहिवले, राजेश नंदागवळी, पुनवटकर, दलितमित्र बाळकृष्ण शेंडे, वामन कांबळे, हर्षवर्धन हुमणे, अंबादास नागदेवे, प्रकाश देशपांडे, विलास मेश्राम, हरिदास बोरकर, दामोधर सूर्यवंशी उपस्थित होते. कार्यक्रमात पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या शूरवीरांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बोलताना अ‍ॅड. यशवंत मेश्राम म्हणाले, भीम शक्ती संघटनेच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी संघटीत होऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सम्यक विचारांचा प्रसार करावा असे आवाहन केले. यावेळी बाळकृष्ण शेंडे यांनी तयार केलेल्या डॉ.आंबेडकरांच्या जीवनावरील प्रदर्शनाचे निरीक्षण पाहुण्यांनी केले. यशस्वीतेसाठी हर्षवर्धन हुमणे, महेंद्र मेश्राम, भगवान दामले, माधव बोरकर, रवींद्र गणवीर, जयेंद्र सुखदेवे, बादशाह मेश्राम, अरुण ठवरे, हरिदास बोरकर, काशिनाथ हुमणे, रतन मेश्राम, शांताराम खोब्रागडे, फाल्गुन वंजारी, नरेंद्र कांबळे, खुशाल फुल्लूके, मच्छिंद्र टेंभुर्णे, रवी शिंगाडे, रत्नदीप रंगारी, सुनील बांबोर्डे यांनी सहकार्य केले.