शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्राच्या ऐक्यासाठी झटणे काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2016 00:27 IST

राष्ट्रीय एकात्मता म्हणजे राष्ट्रातील भिन्न भिन्न व्यक्तीची मने जोडण्याची प्रक्रिया होय.

राहुल डोंगरे यांचे प्रतिपादन : तुमसरात माजी सैनिकांचा मेळावातुमसर : राष्ट्रीय एकात्मता म्हणजे राष्ट्रातील भिन्न भिन्न व्यक्तीची मने जोडण्याची प्रक्रिया होय. राष्ट्राच्या नागरिकांच्या मनात सुख दु:खाच्या समान भावना असायला पाहिजेत. पारतंत्राच्या ज्या तन्मयतेने, एकजुटीने त्या काळाची तरुण पिढी काढली. त्याच तन्मयतेने, जिद्दीने व त्यागाने देशाचे अखंडत्व कायमस्वरुपी टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी लढले पाहिजे. आपला धर्म हा आपल्या घरापुरताच मर्यादित ठेवून राष्ट्रधर्म हा श्रेष्ठ धर्म आहे असे यातून राष्ट्राच्या ऐक्यासाठी भारतीयांनी झटणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष राहुल डोंगरे यांनी केले. दिव्य ज्योती माजी सैनिक बहुउद्देशिय संस्था तुमसर - मोहाडीच्या विद्यमाने महिला महाविद्यालय तुमसर येथे आयोजित माजी सैनिक मेळाव्याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मेजर सुभाष सेलोकर, उद्घाटक के.के. पंचबुद्धे, जि.प. सदस्य तर प्रमुख अतिथी म्हणून माजी नायब सुभेदार भोला कांबळे, माजी कॅप्टन कुंडलिक आगाशे मंचकावर उपस्थित होते.डोंगरे पुढे बोलताना सांगितले की, विविधतेत एकता असलेले आपले राष्ट्र आहे. आंबेडकरांनी निर्माण केलेल्या राज्यघटनेमुळे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूलभूत तत्त्वासाठी आंबेडकरांनी जनतेस शिका, संघटित व्हा व संघर्ष करा असा संदेश दिला. त्या संदेशाला प्रत्यक्ष कृती आणणे काळाची गरज ठरली आहे. शहीद लान्स नायक हनुमंतच्या सारखे वीरपुत्र या भारतमातीला लाभलेले आहेत. याच जवानांमुळे आपण सुरक्षित आहोत. भारतीयांनी सम्राट अशोक, छत्रपती शिवायी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले यांचे पुरोगामी विचार अंगिकारले पाहिजे असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामकृष्णा तितीरमारे यांनी तर संचालन व आभार शंकरलाल रुंधे यांनी केले. यशस्वितेकरिता मनोहर तुरकर, अर्जुन हिंगे, सुरेश सेलोकर, सावित्रीबाई महिला बचत गट, जिजामाता माजी सैनिक, महिला बचत गट व दिव्य ज्योती माजी सैनिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)