शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

पारदर्शक प्रशासनासाठी माहिती अधिकाराची गरज

By admin | Updated: February 21, 2017 00:21 IST

माहिती अधिकाराचा कायदा हा केवळ भ्रष्टाचाराला विरोध करण्यासाठी नसून राज्य कारभार लोकाभिमुख होऊन पारदर्शक प्रशासनासाठी आहे, ...

नितीन कारेमोरे : माहितीच्या अधिकारावर रंगली महाचर्चाभंडारा : माहिती अधिकाराचा कायदा हा केवळ भ्रष्टाचाराला विरोध करण्यासाठी नसून राज्य कारभार लोकाभिमुख होऊन पारदर्शक प्रशासनासाठी आहे, असे प्रतिपादन नितीन कारेमोरे यांनी केले.सार्वजनिक वाचनालय, नगर विकास परिषद , गांधी विचार मंच, भंडारा शहर संघर्ष सुधार समिती, ग्रीन हेरिटेज व सिटीबीटी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माहितीचा अधिकारावर महाचर्चेत ते बोलत होते. उदघाटन सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष धनंजय दलाल यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी अप्पर पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर होत्या. अतिथी म्हणून निवासी पोलिस उपअधीक्षक कुळकर्णी उपस्थित होते. यावेळी कारेमोरे म्हणाले, माहितीचा अधिकार कायदा हे लोकशाहीतील प्रभावी शस्त्र आहे. कारण लोकशाहीत जनता ही सार्वभौम आहे. शासकीय विभागातून माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती दिली जात नाही. माहिती देताना मार्गदर्शक तत्वे न पाळता अवास्तव शुल्क आकारले जाते. हा कायदा लागू होऊन १२ वर्ष होत आली तरी, अजूनही जनता व प्रशासन यांच्यात उदासीनता दिसून येते. यावेळी धनंजय दलाल म्हणाले, कायदा चांगला आहे. पण त्याचा योग्य वापर केला गेला पाहिजे. चुकीच्या कामासाठी, व्यक्तीगत स्तरावर त्रास देण्यासाठी याचा वापर होऊ नये. अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर म्हणाल्या, कायदे चांगले असतात त्याचा योग्य वापर झाला पाहिजे. पोलीस विभागाकडून जनतेला सर्वतोपरी सहकार्य मिळते. माहितीचा अधिकारातही सहकार्य केले जाईल. कुलकर्णी म्हणाले, पोलिस विभागाकडून माहितीच्या अधिकाराच्या कायद्याची पायमल्ली कधीही होणार नाही. प्रास्ताविक डॉ.नितीन तुरस्कर यांनी केले. संचालन प्रा.पितांबर उरकुडे यांनी तर आभारप्रदर्शन मिलिंद हळवे यांनी केले. कार्यक्रमासाठी उमेश जांगळे, दिशांत भोंगाडे, निशिकांत श्रीवास्तव, सईद शेख, चित्रा चिचखेडे, तृप्ती तिरपुडे आदींनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)