शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
3
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
4
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
5
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
6
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
7
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
8
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
9
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
10
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
11
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
12
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
13
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
14
छत्रपतींच्या किल्ल्यांकडे पाहण्याची नजर आता बदलेल?
15
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
16
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
17
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
18
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
19
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
20
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर

योजनांचा लाभ पोहोचविण्याासाठी पुढाकाराची गरज

By admin | Updated: October 6, 2015 00:49 IST

फक्त घोषणा करून विकास होत नाही तर विकास साध्य करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आवश्यक आहे.

बाळा काशीवार यांचे प्रतिपादन : पिटेझरी येथे समाधान शिबिरसाकोली : फक्त घोषणा करून विकास होत नाही तर विकास साध्य करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आवश्यक आहे. यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी प्रत्येक लोकप्रतिनिधी व जागृत नागरिकांची आहे. असे प्रतिपादन आ.बाळा काशीवार यांनी केले.राजस्व विभागाच्या वतीने आयोजित महाराजस्व सुवर्णजयंती राजस्व अभियान अंतर्गत विस्तारीत स्वरुपातील समाधान योजना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत रोगनिदान शिबिराचे अध्यक्षीय स्थानावरून ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हाधिकारी धीरजकुमार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.चाचेरकर, उपविभागीय अधिकारी डी.पी. तलमले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम.एच. आळे, उपसभापती लखन बर्वे, जि.प. सदस्य रेखा वासनिक, मंदा गणवीर, नेपाल रंगारी, अशोक कापगते, सरपंच कविता भलावी, पं.स. सदस्य छाया पटले, उषा डोंगरवार, चेतना सोनवाने, धनवंता राऊत, जयश्री पर्वते, उपविभागीय कृषी अधिकारी सांगळे, डॉ.संजय गडकुल, डॉ.उषा डोंगरवार, खंडविकास अधिकारी डॉ.शबाना मोकाशी, डॉ.सुखदेवे उपस्थित होते.आ. बाळा काशीवार म्हणाले, नकारात्मक विचारामुळे आपण आपले कर्तव्य विसरतो. भावी पिढीला सक्षम करण्यासाठी शासनाने विविध योजना अमलात आणल्या आहेत. या समाधान शिबिराचा उद्देश खऱ्या अर्थाने विविध शासकीय योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहचविणे असा असून नागरिकांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन आ.काशीवार यांनी केले. तर यावेळी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी सांगितले की, नागरिकांनी आपल्या इच्छाशक्तीचा वापर करून बीपीएल यादीतून आपले नाव वगळण्यासाठी प्रयत्न करून आर्थिकरित्या सक्षम व्हावे. शासनाने नागरिकांच्या विकासाचे सर्व अधिकारी ग्रामसभेच्या माध्यमाने नागरिकांना दिले आहेत. त्या दृष्टीने गावकऱ्यांची सर्वसम्मतीने निर्णय घेऊन शासनाच्या योजना गावात राबविण्याचे आवाहन धीरजकुमार यांनी केले. डॉ.चाचेरकर यांनी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना विषयी मार्गदर्श नकेले. यावेळी शिबिरात नागरिकांना विविध प्रमाणपत्र, शिधा पत्रिका, वितरीत करण्यात आल्या. आरोग्य योजनेअंतर्गत पाचशे रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबिरात नागरिकांच्या मार्गदर्शनासाठी विविध विभागाचे प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे संचालन तहसीलदार शोभाराम मोटघरे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन मंडळ अधिकारी राजेंद्र निंबार्ते यांनी तर आभार प्रदर्शन तलाठी शेखर ठाकरे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)