शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
6
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
7
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
8
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
9
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
10
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
11
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
12
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
13
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
14
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
15
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
16
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
17
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
18
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
19
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
20
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार

तरुणांनी मैदानी खेळाकडे वळणे काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 00:15 IST

व्यायामामुळे शारीरिक कष्ट करण्याची क्षमता अर्थात स्टॅमीना वाढतो. तुम्ही जर मोबाईल चार्जींग केले नाही तर तुमचा मोबाईल फोन चालेल का? अगदी तसेच शरीराला मनाला डोक्याला रिचार्ज करण्यासाठी कमीत कमी दररोज ३० मिनिटे गावातील आखाडा किंवा व्यायाम शाळेला भेट देणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देदेवीदास वैरागडे : चिचाळ येथे कुस्त्यांची आमदंगल, ३० पहेलवानांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कचिचाळ : तरुणांनी ग्रामीण भागातील मैदानी खेळ कुस्त्यांकडे वळले पाहिजे. शरीराला स्थिरता प्राप्त करण्यासाठी शरीर मजबूत बनविण्यासाठी बल वाढविण्यासाठी केल्या जाणाऱ्या क्रियेस व्यायाम म्हणतात. व्यायामामुळे शारीरिक कष्ट करण्याची क्षमता अर्थात स्टॅमीना वाढतो. तुम्ही जर मोबाईल चार्जींग केले नाही तर तुमचा मोबाईल फोन चालेल का? अगदी तसेच शरीराला मनाला डोक्याला रिचार्ज करण्यासाठी कमीत कमी दररोज ३० मिनिटे गावातील आखाडा किंवा व्यायाम शाळेला भेट देणे आवश्यक आहे. एकदा व्यायामाची सवय लागली की व्यायाम हा दैनंदिन जीवनाचा भाग होऊन जाईल, असे प्रतिपादन अ‍ॅड. देवीदास वैरागडे यांनी केले.चिचाळ येथे आयोजित कुस्त्यांचे आमदंगल उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जयराम दिघोरे, सोमा लोहकर, रामकृष्ण वैरागडे, शंकर मांडवकर, देवनाथ वैद्य, मुखळू वैद्य, वासुदेव लेंडे, देवराव वाघधरे, ईश्वर वैद्य, मनोज वैरागडे, जगतराम गभणे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी वैरागडे म्हणाले, आखाड्यातील व्यायामाने शरीरातील सांधे लवचिक बनविण्यासाठी शरीर निरोगी राखण्यासाठी, शरीराचा आकार, बांधेसुद राखण्यासाठी आणि मन शांत व एकाग्र करण्यासाठी केलेली शरीराची विशिष्ट प्रकारची आकृती म्हणजे योगासन. आखाड्यात नियमित सराव केल्याने शारीरिक हालचालींना उपयोगी पडणारे स्नायू सक्षम होतात. योगासने, प्राणायाम आणि व्यायाम, ध्यान, धारणा ही सर्व मानसिक ताण तणाव नाहिसा करण्यास उपयुक्त ठरत असल्याचे म्हणाले.या आखाड्यात पंचक्रोशीतील व परजिल्ह्यातील ३० मल्लांच्या कुस्तीचे प्रदर्शन दाखविण्यात आले. यामध्ये दिनेश घोडके, सात्वीक जिभकाटे, निकेश हातेल, कमलेश काटेखाये, सौरभ घोनमोडे, वैभव बिलवणे, अरविंद ठाकरे, कार्तीक चाचेरे, अभय सार्वे, साहिल जिभकाटे, ताराचंद्र पडोळे, ढेकल डायरे आदी मल्लांनी हजेरी लावली होती.विजयी मल्लांना स्मृतीचिन्ह, बनियान, टॉवेल व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. पंच म्हणून जयराम दिघोरे, ईश्वर वैद्ये, देवराम वाघधरे यांनी सांभाळले. कार्यक्रमाचे संचालन यशवंत लोहकर व आभार परशुराम दिघोरे यांनी केले. यावेळी कुस्तीशौकीनांनी एकच गर्दी केली होती.

टॅग्स :Socialसामाजिक