शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांनी मैदानी खेळाकडे वळणे काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 00:15 IST

व्यायामामुळे शारीरिक कष्ट करण्याची क्षमता अर्थात स्टॅमीना वाढतो. तुम्ही जर मोबाईल चार्जींग केले नाही तर तुमचा मोबाईल फोन चालेल का? अगदी तसेच शरीराला मनाला डोक्याला रिचार्ज करण्यासाठी कमीत कमी दररोज ३० मिनिटे गावातील आखाडा किंवा व्यायाम शाळेला भेट देणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देदेवीदास वैरागडे : चिचाळ येथे कुस्त्यांची आमदंगल, ३० पहेलवानांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कचिचाळ : तरुणांनी ग्रामीण भागातील मैदानी खेळ कुस्त्यांकडे वळले पाहिजे. शरीराला स्थिरता प्राप्त करण्यासाठी शरीर मजबूत बनविण्यासाठी बल वाढविण्यासाठी केल्या जाणाऱ्या क्रियेस व्यायाम म्हणतात. व्यायामामुळे शारीरिक कष्ट करण्याची क्षमता अर्थात स्टॅमीना वाढतो. तुम्ही जर मोबाईल चार्जींग केले नाही तर तुमचा मोबाईल फोन चालेल का? अगदी तसेच शरीराला मनाला डोक्याला रिचार्ज करण्यासाठी कमीत कमी दररोज ३० मिनिटे गावातील आखाडा किंवा व्यायाम शाळेला भेट देणे आवश्यक आहे. एकदा व्यायामाची सवय लागली की व्यायाम हा दैनंदिन जीवनाचा भाग होऊन जाईल, असे प्रतिपादन अ‍ॅड. देवीदास वैरागडे यांनी केले.चिचाळ येथे आयोजित कुस्त्यांचे आमदंगल उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जयराम दिघोरे, सोमा लोहकर, रामकृष्ण वैरागडे, शंकर मांडवकर, देवनाथ वैद्य, मुखळू वैद्य, वासुदेव लेंडे, देवराव वाघधरे, ईश्वर वैद्य, मनोज वैरागडे, जगतराम गभणे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी वैरागडे म्हणाले, आखाड्यातील व्यायामाने शरीरातील सांधे लवचिक बनविण्यासाठी शरीर निरोगी राखण्यासाठी, शरीराचा आकार, बांधेसुद राखण्यासाठी आणि मन शांत व एकाग्र करण्यासाठी केलेली शरीराची विशिष्ट प्रकारची आकृती म्हणजे योगासन. आखाड्यात नियमित सराव केल्याने शारीरिक हालचालींना उपयोगी पडणारे स्नायू सक्षम होतात. योगासने, प्राणायाम आणि व्यायाम, ध्यान, धारणा ही सर्व मानसिक ताण तणाव नाहिसा करण्यास उपयुक्त ठरत असल्याचे म्हणाले.या आखाड्यात पंचक्रोशीतील व परजिल्ह्यातील ३० मल्लांच्या कुस्तीचे प्रदर्शन दाखविण्यात आले. यामध्ये दिनेश घोडके, सात्वीक जिभकाटे, निकेश हातेल, कमलेश काटेखाये, सौरभ घोनमोडे, वैभव बिलवणे, अरविंद ठाकरे, कार्तीक चाचेरे, अभय सार्वे, साहिल जिभकाटे, ताराचंद्र पडोळे, ढेकल डायरे आदी मल्लांनी हजेरी लावली होती.विजयी मल्लांना स्मृतीचिन्ह, बनियान, टॉवेल व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. पंच म्हणून जयराम दिघोरे, ईश्वर वैद्ये, देवराम वाघधरे यांनी सांभाळले. कार्यक्रमाचे संचालन यशवंत लोहकर व आभार परशुराम दिघोरे यांनी केले. यावेळी कुस्तीशौकीनांनी एकच गर्दी केली होती.

टॅग्स :Socialसामाजिक