शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
3
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
4
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
5
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
6
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
7
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
8
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
9
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
10
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
11
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
12
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
13
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
14
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
15
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
16
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
17
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
18
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
19
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
20
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानी भारतासाठी कृतिशीलतेची गरज

By admin | Updated: May 31, 2015 00:34 IST

लोक कल्याणाची भावना ठेवून ऋषिमुनी, साधूसंत, थोर पुरुष, क्रांतिकारक व समाजसुधारकांनी सुखी, स्वस्थ, समृद्ध, ...

दीपक तामशेट्टीवार यांचे प्रतिपादन : प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्गाचा समारोपभंडारा : लोक कल्याणाची भावना ठेवून ऋषिमुनी, साधूसंत, थोर पुरुष, क्रांतिकारक व समाजसुधारकांनी सुखी, स्वस्थ, समृद्ध, समर्थ आणि स्वाभीमानी भारताचे स्वप्न बघितले. आजपर्यंत त्या दृष्टीने प्रयत्न झाले. मात्र, असा भारत खऱ्या अर्थाने साकारायचा असेल तर देशातील प्रत्येकाने कृतिशील होण्याची गरज आहे. समृद्ध भारत घडविण्यासाठी कृतिशील होऊन प्रयत्नांची पराकाष्टा करणारी पिढी घडविण्याचे काम संघ करीत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत कार्यवाह दीपक तामशेट्टीवार यांनी व्यक्त केले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विदर्भ प्रांताच्या प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्गाचा समारोप शुक्रवारी येथील स्प्रिंग डेल शाळेत झाला. त्यामुळे प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. २२ दिवस चाललेल्या वर्गात विदर्भ प्रांतातीतल ३६० स्वयंसेवक सहभागी झाले होते. ९ मे रोजी प्रारंभ झालेल्या वर्गाचा समारोप २९ रोजी झाला. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून भरत भलगट, विदर्भ प्रांत संघचालक दादाराव भडके, विभाग संघचालक भानुदास वंजारी, वर्गधिकारी पुरुषोत्तम बोकडे उपस्थित होते. सुरुवातीला प्रांत संघचालक दादाराव भडके यांनी भंडारा नगर संघचालक म्हणून अनिल मेहर यांची घोषणा केली.स्वयंसेवकांना २२ दिवसात ग्रहण केलेल्या ज्ञानाच्या भरवशावर विविध गोष्टींचे प्रात्यक्षिक वर्गाधिकारी पुरुषोत्तम बोकडे यांनी केले. त्यांनी संघाचे कार्य आणि वर्गात झालेल्या कार्यक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी बोलताना प्रमुख अतिथी भलगट यांनी संघाच्या कार्याचे कौतूक करीत संघ करीत असलेल्या कार्यामुळे हिंदू समाजाला मजबुती प्राप्त होईल असे सांगितले., संघटित शक्तीतून समर्थ राष्ट्र घडू शकते, हे संघ कर्यातून सिद्ध होते असेही ते म्हणाले.आपल्या मार्गदर्शनात प्रमुख वक्ते पुढे म्हणाले, कुण्या एके काळी राजा, राजाश्रय नसतानाही माणसे सुख, समाधानाने जगायची, दंड आणि दंड देणारेही तेव्हा नव्हते. तरीही सर्वकाही सुरळीत होते. याचे कारण प्रत्येक जण धर्माने जगायचा. धर्म म्हणजे कर्तव्य. कर्तव्याची जाणीव ठेवून त्याच्या पूर्तीसाठी त्यांची धडपड असे. केवळ स्वत:साठीच न जगता दुसऱ्यांसाठी जगण्याची वृत्ती माणसाला सुखी, समाधानी बनवित होती. असा कृतज्ञतेचा भाव ठेवून आज जीवन जगले गेले तर नक्कीच पूर्वजांनी पाहिलेल्या समृद्ध राष्ट्राचा संकल्प पूर्ण होऊ शकेल.आमच्या पूर्वजांनी जी स्वप्ने बघितली ते पूर्ण करण्याचे कर्तव्य आहे. यासाठी प्रत्येकाला कृतीशील होऊन कठोर परिश्रम घेण्याची गरज आहे. संघ अशीच पिढी घडविण्याचे काम गत अनेक वर्षांपासून करीत आहे. संघाचा प्रत्येक स्वयंसेवक समृद्ध आणि स्वाभिमानी भारताचे स्वप्न साकारण्यासाठी धडपडत असताना प्रत्येकाने आपले कर्तव्य समजून यासाठी पुढे यावे, असे प्रतिपादन केले. (शहर प्रतिनिधी)