शहरं
Join us  
Trending Stories
1
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
2
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
3
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
4
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
7
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
8
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
11
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
12
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
13
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
14
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
15
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
16
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
17
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
18
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
19
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
20
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल

नवोदय विद्यालय बंद होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 21:52 IST

१८ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जिल्ह्याच्या वाट्याला आलेले नवोदय विद्यालय वर्षभरातच बंद होण्याच्या मार्गावर आहे. जिल्हा प्रशासनासह केंद्र शासनाची उदासीनता विद्यालयाच्या अस्मितेवर वार करणारी ठरली आहे.

ठळक मुद्देइमारत सोडण्याचे निर्देश : विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात, पालकांची वाढली चिंता

इंद्रपाल कटकवार/ देवानंद नंदेश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : १८ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जिल्ह्याच्या वाट्याला आलेले नवोदय विद्यालय वर्षभरातच बंद होण्याच्या मार्गावर आहे. जिल्हा प्रशासनासह केंद्र शासनाची उदासीनता विद्यालयाच्या अस्मितेवर वार करणारी ठरली आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात येण्याची शक्यता असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.१९९९ मध्ये भंडारा-गोंदिया जिल्ह्याची विभागणी झाल्यानंतर नवेगावबांध येथील जवाहर नवोदय विद्यालय गोंदिया जिल्ह्याच्या वाट्याला गेले. त्यानंतर सातत्याने भंडारा जिल्ह्यासाठी स्वतंत्र जवाहर नवोदय विद्यालय व्हावे यासाठी लढा सुरू होता. जिल्ह्यातील नागरिकांच्या मागणीला न्याय मिळाला. सत्र २०१७ पासून भंडारा जिल्ह्याला नवोदय विद्यालय सुरु होत असल्याची घोषणा होऊन विद्यालय ही सुरुझाले. यात प्रथम सहाव्या वर्गात ४० विद्यार्थ्यांची नोंदणी होवून नियमित अभ्यासक्रमालाही सुरुवात झाली. नवोदय विद्यालयाची प्रशस्त व सर्व सुविधायुक्त जागा मोहाडी तालुक्यातील पाचगाव येथे निश्चित करण्यात आली आहे. मात्र जागा हस्तांतरण अभावी अजूनही बांधकाम सुरु झालेले नाही. परिणामी जि.प. च्या मालकीमध्ये असलेल्या जकातदार विद्यालयाच्या परिसरातील जुन्या इमारतीला डागडुजी करुन त्याठिकाणी नवोदय विद्यालय सुरु करण्यात आले. मात्र शनिवारी बांधकाम विभाग भंडाराने सदर इमारत जिर्ण असून वापरण्यास अयोग्य आहे, ती इमारत खाली करावी, असे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत संबंधित जकातदार विद्यालयाच्या प्राचार्याना कळविला आहे. त्यामुळे नवोदय विद्यालयातील विद्यार्थी तथा पालकांसमोर आता काय करावे? असा मुख्य प्रश्न येवून ठेपला आहे.पाच कोटींचा निधी मंजूरमोहाडी तालुक्यातील पाचगाव येथे नवोदय विद्यालयाच्या बांधकामासाठी २२ एकर जागा अधिकृत करण्यात आली आहे. मात्र जिल्हा प्रशासन (महसूल) व विभागीय आयुक्त यांच्या शासकीय दस्ताऐवजात जागा हस्तांतरणाचे काम रखडलेले आहे. परिणामी वर्षभरापासून शाळा सुरु होवूनही जागेची मालकीयत न मिळाल्याने बांधकामालाही सुरुवात झालेली नाही. त्यामुळे प्राथमिक व पहिल्या टप्प्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी खितपत पडून आहे.विद्यमान इमारतीत सुविधांचा अभावज्या ठिकाणी नवोदय विद्यालय सुरु आहे, तिथे मुलभूत सुविधांचा अभाव आहे. तात्पूरत्या स्वरुपात का असेना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संपूर्ण सुविधा उपलब्ध करुन देणे शासनाचे ध्येय आहे.मात्र येथे या उद्दिष्टाला तिलांजली मिळत आहे. शाळा परिसरात कचरा, गवत व अन्य झाडीझूडपी वाढलेली आहेत. अशावेळी विषारी श्वापदांचा विचरण होणे स्वाभाविक गोष्ट आहे. मागील वर्षीची इयत्ता सहावीची बॅच व यावर्षीची नविन बॅच असे मिळून ८० मुलांची सोय या इमारतीत होवू शकत नाही.जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनतात्पूरत्या स्वरुपात जवाहर नवोदय विद्यालय सुरु असलेल्या जे. के. शाळेच्या सहा वर्गखोल्या आणि त्यासोबत असलेल स्वच्छता गृहांची दुरुस्ती करण्यात यावी, जेणेकरुन मागील व विद्यमान बॅच मधील विद्यार्थ्यांची सोय होवू शकेल. इमारत निकामी करण्याचे निर्देश मिळाल्याने वास्तु दुरुस्तीऐवजी सोडावी लागणार आहे.पालक-प्राचार्यांमध्ये बैठक निष्फळएकीकडे सुविधांचा अभाव तर दुसरीकडे सुविधा देण्यात प्रशासनाची उदासिनता याचा सरळसरळ फटका विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सत्रावर जाणवू शकतो. अशा स्थितीत शाळेच्या पहिल्या दिवशी पालक व प्राचार्यांमध्ये बैठक झाली. प्राचार्य विजय अंबोरे यांनी वस्तुस्थिती पालकांसमक्ष सांगितली. यावर पालकांनी, पाल्यांना परत घेवून जावे की पर्यायी व्यवस्था होणार आहे. असा प्रश्न विचारताच प्राचार्य ही या प्रश्नाचे उत्तर द्यायला हतबल दिसले. जिल्हाधिकारी या समस्येवर तोडगा काढू शकतात व त्यासाठी पालकांचीही महत्वाची भुमिका आहे असे मत प्राचार्य अंबोरे यांनी पालकांसमोर व्यक्त केले. य्पालकांनीही बैठकीत समाधानकारक तोडगा न निघाल्याने पाल्यांबाबत चिंता व्यक्त केली. पाल्यांना तेथून घेवून जाणार नाही अशी भूमिका घेवून यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींना दाद मागू असा पावित्रा घेतला. दरम्यान खासदार मधुकर कुकडे सोमवारी विद्यालयाची पाहणी करणार आहेत.

टॅग्स :Schoolशाळाeducationशैक्षणिक