शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
2
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
3
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
4
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
5
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
6
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
7
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
8
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
9
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
10
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
11
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
12
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
13
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
14
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
15
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
16
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
17
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
18
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
19
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
20
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
Daily Top 2Weekly Top 5

नाक्याचे ‘बॅरियर’ गायब

By admin | Updated: March 10, 2016 00:47 IST

तुमसर-वारासिवनी आंतरराज्यीय मार्गावर तुमसर वनपरिक्षेत्रांतर्गत हरदोली तपासणी नाका मागील अनेक महिन्यांपासून मोकाट आहे.

हरदोली येथील प्रकार : वाहनांच्या तपासणीवर प्रश्नचिन्हमोहन भोयर तुमसर तुमसर-वारासिवनी आंतरराज्यीय मार्गावर तुमसर वनपरिक्षेत्रांतर्गत हरदोली तपासणी नाका मागील अनेक महिन्यांपासून मोकाट आहे. येथील बॅरियर (अडवणूक खांब) कार्यालयाशेजारी जंगलेल्या स्थितीत पडून आहे. येथील वनक्षेत्र सहायकांचे कार्यालयाची वास्तू शेवटची घटका मोजत आहे. कागदी दस्ताऐवज कुजलेल्या स्थितीत आहे. तुमसर मुख्यालय केवळ पाच कि.मी. अंतरावर असूनही वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांचे येथे लक्ष दिसत नाही. उर्वरित जंगलाचे रक्षण करण्यासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित होतो.तुमसर-वारासिवनी या आंतरराज्यीय महामार्गावर हरदोली येथे वनविभागाचे तपासणी नाका आहे. या तपासणी नाका व क्षेत्राकरिता एक वनक्षेत्र सहाय्यक तपासणी नाका कर्मचारी तीन, बीट गार्ड पाच वनमजूर चार स्थायी, एक अस्थायी अशी कर्मचाऱ्यांची फौज आहे. मध्य प्रदेशला जोडणारा हा महामार्ग आहे. रस्त्यावर बॅरियर (अडवणूक खांब) असणे अत्यावश्यक आहे. त्याशिवाय वाहनांची तपासणी करता येणे शक्य नाही. वाहने थांब्याकरिता बॅरीअर लावण्यात येते. येथील बॅरियर तुटल्यावर त्याला कार्यालयाशेजारी ठेवण्यात आले आहे. जमिनीवर ठेवल्याने त्याची दुर्दशा होऊन जंगलेल्या स्थितीत ते आले आहे. परंतु वनविभागाने त्यास दुरुस्त करण्याची तसदी घेतली नाही. मागील अनेक महिन्यांपासून ही स्थिती येथे आहे.निश्चितच येथे वाहनांची तपासणी होते काय, असा प्रश्न उपस्थित होतो. या तपासणी नाक्यावर कर्मचारीसुद्धा कर्तव्यावर सहसा दिसत नाही. तपासणी नाकासुद्धा मोडकळीस आला आहे. इमारत जर्जर झाली आहे. तपासणी नाक्याच्या मागेच कौलारू वनक्षेत्र सहायकांचे कार्यालय आहे. कार्यालयाला लाकडी दांड्याची मदत घ्यावी लागत आहे. छतावरील कौले फुटलेली आहेत. वनकर्मचाऱ्यांच्या कार्यालयाच्या खोलीतून आभाळाचे दर्शन होते. एका रॅकवर वनविभागाचे अत्यंत महत्वपूर्ण दस्तऐवज ठेवले आहे. दस्तऐवज कुजलेल्या स्थितीत येऊन पोहोचले आहे. येथील दस्तऐवज सुरक्षित नाही. येथील वनक्षेत्र सहायक मात्र मुख्यालयी राहतात. वनविभागाचा कारभार मात्र येथे वाऱ्यावर दिसतो. तुमसर मुख्यालयापासून केवळ पाच किलोमीटरवर हा तपासणी नाका असूनही या तपासणी नाक्याकडे वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांचे दुर्लक्ष दिसत आहे. हा तपासणी नाका महत्वपूर्ण असून येथे २४ तास सुसज्ज यंत्रणा उभारण्याची गरज आहे.