शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

चिखलमय पांदण रस्त्यामुळे शेतकऱ्यांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 06:00 IST

रस्त्याबाबत शेतकऱ्यांनी अनेकदा लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला तरी हे आश्वासन फोल ठरत ठरले आहे. पालकमंत्री पांदन रस्ता अंतर्गत जिल्ह्यातील पांदन रस्त्यांना न्याय देण्याचा शब्द न पाळल्याने यांत्रीकीकरणाच्या युगातही शेतकरी चिखलातूनच स्वत: बैलगाडी काढण्याची नामुष्की ओढवली आहे.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : खराशी पुलाच्या बांधकामाने त्रासात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर (चौ.) : शेतकऱ्यांना रस्त्याची पायाभूत सुविधादेखील मिळत नसल्याने पालांदूरातील शेतकºयांचा शासनाविरोधात संताप अनावर होत आहे. शेतात जाण्यासाठी चांगला रस्ताच नसल्याने लाखनी तालुक्यातील पालांदूर शेतशिवारात खराशी पुलाजवळील दोन किलोमीटर पांदन रस्त्याच्या चिखलातून प्रवास करणे शेतकऱ्यांना मुश्कील झाले आहे.रस्त्याबाबत शेतकऱ्यांनी अनेकदा लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला तरी हे आश्वासन फोल ठरत ठरले आहे. पालकमंत्री पांदन रस्ता अंतर्गत जिल्ह्यातील पांदन रस्त्यांना न्याय देण्याचा शब्द न पाळल्याने यांत्रीकीकरणाच्या युगातही शेतकरी चिखलातूनच स्वत: बैलगाडी काढण्याची नामुष्की ओढवली आहे.खराशी रस्ता ते नारायण कडूकार गुरुजींंच्या शेतापर्यंत दोन किलोमीटर पांदन रस्ता मागील कित्येक वर्षापासून चिखलमय आहे. या चिखलात शेतकरी स्वत: बंडी ओढून शेतीत जाण्यासाठी कसरत करतो आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती दूर अंतरापर्यत असल्याने बंडीशिवाय शेतीसाहित्य शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोहचवता येत नाही. त्यामुळे अनेकदा बैलांना देखील येथून चालणे शक्य होत नाही.त्यामुळे अनेकदा एकमेकांची मदत घेवून एकमेकांची चिखलात रुतलेली बैलबंडी शेतकऱ्यांना बाहेर काढावी लागते. पावसाची संततधार सतत सुरु असल्याने येथील चिखल वाढला असल्याने बंडीला अर्धा -एक फुटातून चिखल कापत रस्ता पार करावा लागतो आहे. यासाठी शेतकºयांनी वारंवार याविषयी बांधकाम विभाग लाखांदूर येथे तक्रार केली आहे.त्यावरच न थांबता क्षेत्रातील आमदार, पालकमंत्री, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, उपसरपंच, सरपंच तथा सामाजिक कार्यकर्त्यांना वारंवार भेटून शेतकऱ्यांनी पांदन रस्त्याच्या कामाची मागणी केली आहे.या पांदन रस्त्यावर चार ठिकाणी मोळी सीडीवर्कचे थातूर मातूर काम झाल्याचे रस्त्याने त्रस्त झालेले शेतकरी प्रभू कडूकार यांनी बोलताना सांगितले. वर्षभर शेतकरी या पांदन रस्त्याने जाणेयेणे करीत असल्याने महत्वाच्या खरीप हंगामात तरी शासनासह, लोकप्रतिनिधींकडे शेतकऱ्यांनी पांदन रस्त्याच्या कामाची त्वरीत मागणी केली आहे. या पांदन रस्त्यावरुन दररोज किमान १५० शेतकरी या पांदन रस्त्याने आवागमन करतात.खराशी पुलाच्या बांधकामामुळे पांदन रस्ता चिखलमय झाल्याची गावकºयांची तक्रार आहे. रस्त्यावर कंत्राटदाराने बांधकाम विभागाच्या आशीर्वादाने जेसीपीच्या सहाय्याने पांदन रस्त्यात खडी मुरमाचा वापर न करता मातीची भरण दिल्याने रस्ता चिखलमय झाला आहे. त्यानंतर रस्त्याचे कोणतेही काम न केल्याने हा पांदन रस्ता जाण्यासाठी शेतकऱ्यांना अडसर ठरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.खराशी रस्त्यापासून माझ्या शेतापर्यंतच्या पांदन रस्त्याकरिता वारंवार प्रामाणिक प्रयत्न केले. स्वत:ही काही मलबा टाकला. पण चिखल खूप असल्याने संपूर्ण पांदन चिखलात आहे. शासनाने पांदन रस्ता अंतर्गत शेतकऱ्यांना रस्त्याची सुविधा देणे गरजेचे आहे.-मंगेश येवले,शेतकरी, पालांदूर (चौ.)

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती