शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर; e-KYC साठी मुदतवाढ, जाणून घ्या नवीन तारीख...
2
सुरक्षा दलाचे सर्वांत मोठे यश ! ५०० जवानांचा बळी घेणारा जहाल नक्षल कमांडर 'हिडमा'चा खात्मा ; १० कोटींचे होते इनाम
3
"...याची जाणीव ठेवणं गरजेचं होतं"; ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसने सुनावले, अग्रलेखाला सणसणीत उत्तर
4
चौकशीत आरोपी डॉक्टरांचे मोठे खुलासे; सिग्नल App चा वापर, i-20 ची खरेदी अन्..., अनेक गोष्टी झाल्या उघड
5
VIRAL : आयुष्यातील पहिलीच नोकरी अन् अवघ्या तीन तासांनंतरच दिला राजीनामा! असं नेमकं झालं काय? 
6
Shiv Sena BJP: "थोडी नाराजी तयार झाली असेल, पण आजच्या..."; शिंदेंचे मंत्री नाराज असल्याच्या चर्चेवर बावनकुळे काय म्हणाले?
7
मुंबईकरांची धावपळ! शहरात CNG पुरवठा अचानक ठप्प; ऑटो-टॅक्सीची लांबच लांब रांग, कधीपर्यंत दुरुस्त होणार?
8
"मी तशी नाही…" वादग्रस्त प्रकरणावर व्यक्त होताना बांगलादेशी कर्णधाराने घेतलं हरमनप्रीतचं नाव
9
रेखा झुनझुनवालांनी 'या' बँकेतील हिस्सा वाढवला, शेअर्सनं गाठला नवा उच्चांक; किंमत २४५ रुपयांच्या पार
10
Mumbai Traffic: एलबीएस मार्गावर आता 'गेम चेंजर' पूल; ४० मिनिटांचे अंतर अवघ्या १० मिनिटांत पार होणार!
11
Mumbai Indians मधून बाहेर पडताच Arjun Tendulkar ची धडाकेबाज कामगिरी, साकारलं अनोखं शतक
12
Stray Dogs: लाखभर भटक्या श्वानांसाठी निवारा केंद्रे उभारणार कुठे? पालिकेसमोर मोठे आव्हान
13
SIP मध्ये 'ही' चूक कराल तर मोठं नुकसान! फक्त ३ पेमेंट मिस झाल्यास १.५ लाख रुपये बुडतील; पाहा गणित
14
Stock Market Bull Run: तयार राहा! शेअर बाजारात येणार आणखी एक बूल रन; सेन्सेक्स पोहोचणार १,०७,००० पर्यंत?
15
‘साधी एक चिपही बनवता येत नाही, अमेरिकन नागरिक काय कामाचे?’, डोनाल्ड ट्रम्प संतापले, ‘या’ देशाकडून शिकण्याचा दिला सल्ला 
16
अमित शाहांनी दिलेली 30 नोव्हेंबरची डेडलाइन; त्यापूर्वीच सुरक्षा दलांनी हिडमाला संपवले..!
17
आधी बोगस डॉक्टर, नंतर जादूटोण्यावर ठेवला विश्वास; तापाने फणफणलेल्या ३ मुलांनी गमावला जीव
18
Vegetable Rates: भाजीपाल्याने गाठली शंभरी; गवार १६०, मटार १३० रुपये किलो!
19
भारताचा मध्यमवर्ग संकटाच्या उंबरठ्यावर; २ कोटी लोकांच्या नोकऱ्या जाण्याचा धोका
20
त्याच्या चेहऱ्यावर ना पश्चात्ताप ना कसली चिंता; दिल्ली स्फोटातील आरोपीला भेटल्यानंतर वकील म्हणाले.. 
Daily Top 2Weekly Top 5

चिखलमय पांदण रस्त्यामुळे शेतकऱ्यांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 06:00 IST

रस्त्याबाबत शेतकऱ्यांनी अनेकदा लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला तरी हे आश्वासन फोल ठरत ठरले आहे. पालकमंत्री पांदन रस्ता अंतर्गत जिल्ह्यातील पांदन रस्त्यांना न्याय देण्याचा शब्द न पाळल्याने यांत्रीकीकरणाच्या युगातही शेतकरी चिखलातूनच स्वत: बैलगाडी काढण्याची नामुष्की ओढवली आहे.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : खराशी पुलाच्या बांधकामाने त्रासात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर (चौ.) : शेतकऱ्यांना रस्त्याची पायाभूत सुविधादेखील मिळत नसल्याने पालांदूरातील शेतकºयांचा शासनाविरोधात संताप अनावर होत आहे. शेतात जाण्यासाठी चांगला रस्ताच नसल्याने लाखनी तालुक्यातील पालांदूर शेतशिवारात खराशी पुलाजवळील दोन किलोमीटर पांदन रस्त्याच्या चिखलातून प्रवास करणे शेतकऱ्यांना मुश्कील झाले आहे.रस्त्याबाबत शेतकऱ्यांनी अनेकदा लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला तरी हे आश्वासन फोल ठरत ठरले आहे. पालकमंत्री पांदन रस्ता अंतर्गत जिल्ह्यातील पांदन रस्त्यांना न्याय देण्याचा शब्द न पाळल्याने यांत्रीकीकरणाच्या युगातही शेतकरी चिखलातूनच स्वत: बैलगाडी काढण्याची नामुष्की ओढवली आहे.खराशी रस्ता ते नारायण कडूकार गुरुजींंच्या शेतापर्यंत दोन किलोमीटर पांदन रस्ता मागील कित्येक वर्षापासून चिखलमय आहे. या चिखलात शेतकरी स्वत: बंडी ओढून शेतीत जाण्यासाठी कसरत करतो आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती दूर अंतरापर्यत असल्याने बंडीशिवाय शेतीसाहित्य शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोहचवता येत नाही. त्यामुळे अनेकदा बैलांना देखील येथून चालणे शक्य होत नाही.त्यामुळे अनेकदा एकमेकांची मदत घेवून एकमेकांची चिखलात रुतलेली बैलबंडी शेतकऱ्यांना बाहेर काढावी लागते. पावसाची संततधार सतत सुरु असल्याने येथील चिखल वाढला असल्याने बंडीला अर्धा -एक फुटातून चिखल कापत रस्ता पार करावा लागतो आहे. यासाठी शेतकºयांनी वारंवार याविषयी बांधकाम विभाग लाखांदूर येथे तक्रार केली आहे.त्यावरच न थांबता क्षेत्रातील आमदार, पालकमंत्री, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, उपसरपंच, सरपंच तथा सामाजिक कार्यकर्त्यांना वारंवार भेटून शेतकऱ्यांनी पांदन रस्त्याच्या कामाची मागणी केली आहे.या पांदन रस्त्यावर चार ठिकाणी मोळी सीडीवर्कचे थातूर मातूर काम झाल्याचे रस्त्याने त्रस्त झालेले शेतकरी प्रभू कडूकार यांनी बोलताना सांगितले. वर्षभर शेतकरी या पांदन रस्त्याने जाणेयेणे करीत असल्याने महत्वाच्या खरीप हंगामात तरी शासनासह, लोकप्रतिनिधींकडे शेतकऱ्यांनी पांदन रस्त्याच्या कामाची त्वरीत मागणी केली आहे. या पांदन रस्त्यावरुन दररोज किमान १५० शेतकरी या पांदन रस्त्याने आवागमन करतात.खराशी पुलाच्या बांधकामामुळे पांदन रस्ता चिखलमय झाल्याची गावकºयांची तक्रार आहे. रस्त्यावर कंत्राटदाराने बांधकाम विभागाच्या आशीर्वादाने जेसीपीच्या सहाय्याने पांदन रस्त्यात खडी मुरमाचा वापर न करता मातीची भरण दिल्याने रस्ता चिखलमय झाला आहे. त्यानंतर रस्त्याचे कोणतेही काम न केल्याने हा पांदन रस्ता जाण्यासाठी शेतकऱ्यांना अडसर ठरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.खराशी रस्त्यापासून माझ्या शेतापर्यंतच्या पांदन रस्त्याकरिता वारंवार प्रामाणिक प्रयत्न केले. स्वत:ही काही मलबा टाकला. पण चिखल खूप असल्याने संपूर्ण पांदन चिखलात आहे. शासनाने पांदन रस्ता अंतर्गत शेतकऱ्यांना रस्त्याची सुविधा देणे गरजेचे आहे.-मंगेश येवले,शेतकरी, पालांदूर (चौ.)

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती