शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

चिखलमय पांदण रस्त्यामुळे शेतकऱ्यांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 06:00 IST

रस्त्याबाबत शेतकऱ्यांनी अनेकदा लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला तरी हे आश्वासन फोल ठरत ठरले आहे. पालकमंत्री पांदन रस्ता अंतर्गत जिल्ह्यातील पांदन रस्त्यांना न्याय देण्याचा शब्द न पाळल्याने यांत्रीकीकरणाच्या युगातही शेतकरी चिखलातूनच स्वत: बैलगाडी काढण्याची नामुष्की ओढवली आहे.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : खराशी पुलाच्या बांधकामाने त्रासात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर (चौ.) : शेतकऱ्यांना रस्त्याची पायाभूत सुविधादेखील मिळत नसल्याने पालांदूरातील शेतकºयांचा शासनाविरोधात संताप अनावर होत आहे. शेतात जाण्यासाठी चांगला रस्ताच नसल्याने लाखनी तालुक्यातील पालांदूर शेतशिवारात खराशी पुलाजवळील दोन किलोमीटर पांदन रस्त्याच्या चिखलातून प्रवास करणे शेतकऱ्यांना मुश्कील झाले आहे.रस्त्याबाबत शेतकऱ्यांनी अनेकदा लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला तरी हे आश्वासन फोल ठरत ठरले आहे. पालकमंत्री पांदन रस्ता अंतर्गत जिल्ह्यातील पांदन रस्त्यांना न्याय देण्याचा शब्द न पाळल्याने यांत्रीकीकरणाच्या युगातही शेतकरी चिखलातूनच स्वत: बैलगाडी काढण्याची नामुष्की ओढवली आहे.खराशी रस्ता ते नारायण कडूकार गुरुजींंच्या शेतापर्यंत दोन किलोमीटर पांदन रस्ता मागील कित्येक वर्षापासून चिखलमय आहे. या चिखलात शेतकरी स्वत: बंडी ओढून शेतीत जाण्यासाठी कसरत करतो आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती दूर अंतरापर्यत असल्याने बंडीशिवाय शेतीसाहित्य शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोहचवता येत नाही. त्यामुळे अनेकदा बैलांना देखील येथून चालणे शक्य होत नाही.त्यामुळे अनेकदा एकमेकांची मदत घेवून एकमेकांची चिखलात रुतलेली बैलबंडी शेतकऱ्यांना बाहेर काढावी लागते. पावसाची संततधार सतत सुरु असल्याने येथील चिखल वाढला असल्याने बंडीला अर्धा -एक फुटातून चिखल कापत रस्ता पार करावा लागतो आहे. यासाठी शेतकºयांनी वारंवार याविषयी बांधकाम विभाग लाखांदूर येथे तक्रार केली आहे.त्यावरच न थांबता क्षेत्रातील आमदार, पालकमंत्री, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, उपसरपंच, सरपंच तथा सामाजिक कार्यकर्त्यांना वारंवार भेटून शेतकऱ्यांनी पांदन रस्त्याच्या कामाची मागणी केली आहे.या पांदन रस्त्यावर चार ठिकाणी मोळी सीडीवर्कचे थातूर मातूर काम झाल्याचे रस्त्याने त्रस्त झालेले शेतकरी प्रभू कडूकार यांनी बोलताना सांगितले. वर्षभर शेतकरी या पांदन रस्त्याने जाणेयेणे करीत असल्याने महत्वाच्या खरीप हंगामात तरी शासनासह, लोकप्रतिनिधींकडे शेतकऱ्यांनी पांदन रस्त्याच्या कामाची त्वरीत मागणी केली आहे. या पांदन रस्त्यावरुन दररोज किमान १५० शेतकरी या पांदन रस्त्याने आवागमन करतात.खराशी पुलाच्या बांधकामामुळे पांदन रस्ता चिखलमय झाल्याची गावकºयांची तक्रार आहे. रस्त्यावर कंत्राटदाराने बांधकाम विभागाच्या आशीर्वादाने जेसीपीच्या सहाय्याने पांदन रस्त्यात खडी मुरमाचा वापर न करता मातीची भरण दिल्याने रस्ता चिखलमय झाला आहे. त्यानंतर रस्त्याचे कोणतेही काम न केल्याने हा पांदन रस्ता जाण्यासाठी शेतकऱ्यांना अडसर ठरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.खराशी रस्त्यापासून माझ्या शेतापर्यंतच्या पांदन रस्त्याकरिता वारंवार प्रामाणिक प्रयत्न केले. स्वत:ही काही मलबा टाकला. पण चिखल खूप असल्याने संपूर्ण पांदन चिखलात आहे. शासनाने पांदन रस्ता अंतर्गत शेतकऱ्यांना रस्त्याची सुविधा देणे गरजेचे आहे.-मंगेश येवले,शेतकरी, पालांदूर (चौ.)

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती