शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

खोट्या आश्वासनांमुळेच शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात : सुनील मेंढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2021 17:51 IST

वारेमाप आश्वासने व घोषणांचा पाऊस पाडून एकही घोषणा कृतीत न आणणाऱ्या राज्य सरकारने जनतेची व शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी सपशेल माफी मागावी, अशी मागणी खासदार सुनील मेंढे यांनी केली आहे.

भंडारा : महाराष्ट्रातील जनतेने दिलेला निर्णय लाथाडून तीन पक्षांचे हे महाभकास आघाडी सरकार दोन वर्षांपूर्वी सत्तेवर आले आहे. भाजपसोबतच्या युतीला तोडून सत्तेच्या लोभासाठी हे सरकार स्थापन झाले आहे. शेतकरी, मजूर, सर्व सामान्य जनतेच्या समस्या या सरकारच्या कानात शिरत नाही. याशिवाय खोट्या आश्वासनामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली आहे, असा आरोप खासदार सुनील मेंढे यांनी पत्रपरिषदेतून केला.

अंमली पदार्थांविरुद्धच्या कारवाई मध्ये राजकारण आणून “हर्बल तंबाखूचा” व्यापार करणाऱ्याच्या बाजूने बोलण्याची, जबाबदार मंत्री व सत्ताधारी नेत्यांमध्ये स्पर्धा लागलेली आहे. अंमली पदार्थाच्या विळख्यात युवा पिढी सापडू नये या साठी कठोर कार्यवाही व अधिकाऱ्यांना पाठिंबा देण्याची आवश्यकता खा. मेंढे यांनी व्यक्त केली.

राज्यातील काही भागात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. पीक विम्याचा मोबदलासुद्धा ह्या राज्य सरकारमुळे शेतकऱ्याना मिळालेला नाही. राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अंधार पसरला असून शेतकऱ्याची दिवाळी काळी करण्यास राज्य सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे. वारेमाप आश्वासने व घोषणांचा पाऊस पाडून एकही घोषणा कृतीत न आणणाऱ्या राज्य सरकारने जनतेची व शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी सपशेल माफी मागावी, अशी मागणी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे यांनी पत्रकार परिषदेत केली. कोकण आणि विदर्भातील धानाच्या पिकाचीही प्रचंड हानी झाली आहे.

भंडारा-गोंदिया जिल्ह्यात धानाचे पिक मोठ्या प्रमाणावर होते. धान पीक खरेदी केंद्रे जाणून बुजून उशिरा सुरू करण्यात आली. शेतकऱ्याना तो माल कमी किमतीत व्यापाऱ्यांना विकावा लागला व शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. राज्यातील शेतकऱ्याचे धान न घेता परराज्यातील व्यापाऱ्याचा धान खरेदी करण्यात आला. खरेदी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. सरकारी अधिकारी, व्यापारी व दलालांनी हात मिळवणी करून शेतकऱ्यांची फसवणूक केली. ठाकरे सरकारने ७०० रुपये बोनस जाहीर केला. परंतु अर्धा बोनस ९ महिन्यांनंतर व बाकी अर्धा बोनस ११ महिन्यानंतर शेतकऱ्यांना देण्यात आला. धान उत्पादकांना धानाचा चुकारासुद्धा वेळेवर देण्यात आला नाही.

ऊसाबाबत सरकारचे धोरण कारखानदारांच्या धार्जिणे असल्याने राज्यातील ऊस उत्पादकांनाही सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. लखीमपूरच्या घटनेनंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शोक व्यक्त करून महाराष्ट्र बंदला पाठिंबा देणाऱ्या महाविकास आघाडीला राज्यात अतिवृष्टीच्या संकटात सापडलेल्या आणि नैराश्यातून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांविषयी द्वेष का? संकटग्रस्त शेतकऱ्यास सहानुभूती दाखविणारा एक शब्दही मंत्रिमंडळाच्या बैठकीत का काढला जात नाही? असा सवालही खासदार मेंढे यांनी केला.

टॅग्स :FarmerशेतकरीPoliticsराजकारण