शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
3
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
4
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
5
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
6
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
7
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
8
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
9
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
10
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
11
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
12
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
13
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
14
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
15
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
16
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
17
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
18
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
19
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
20
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...

खोट्या आश्वासनांमुळेच शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात : सुनील मेंढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2021 17:51 IST

वारेमाप आश्वासने व घोषणांचा पाऊस पाडून एकही घोषणा कृतीत न आणणाऱ्या राज्य सरकारने जनतेची व शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी सपशेल माफी मागावी, अशी मागणी खासदार सुनील मेंढे यांनी केली आहे.

भंडारा : महाराष्ट्रातील जनतेने दिलेला निर्णय लाथाडून तीन पक्षांचे हे महाभकास आघाडी सरकार दोन वर्षांपूर्वी सत्तेवर आले आहे. भाजपसोबतच्या युतीला तोडून सत्तेच्या लोभासाठी हे सरकार स्थापन झाले आहे. शेतकरी, मजूर, सर्व सामान्य जनतेच्या समस्या या सरकारच्या कानात शिरत नाही. याशिवाय खोट्या आश्वासनामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली आहे, असा आरोप खासदार सुनील मेंढे यांनी पत्रपरिषदेतून केला.

अंमली पदार्थांविरुद्धच्या कारवाई मध्ये राजकारण आणून “हर्बल तंबाखूचा” व्यापार करणाऱ्याच्या बाजूने बोलण्याची, जबाबदार मंत्री व सत्ताधारी नेत्यांमध्ये स्पर्धा लागलेली आहे. अंमली पदार्थाच्या विळख्यात युवा पिढी सापडू नये या साठी कठोर कार्यवाही व अधिकाऱ्यांना पाठिंबा देण्याची आवश्यकता खा. मेंढे यांनी व्यक्त केली.

राज्यातील काही भागात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. पीक विम्याचा मोबदलासुद्धा ह्या राज्य सरकारमुळे शेतकऱ्याना मिळालेला नाही. राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अंधार पसरला असून शेतकऱ्याची दिवाळी काळी करण्यास राज्य सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे. वारेमाप आश्वासने व घोषणांचा पाऊस पाडून एकही घोषणा कृतीत न आणणाऱ्या राज्य सरकारने जनतेची व शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी सपशेल माफी मागावी, अशी मागणी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे यांनी पत्रकार परिषदेत केली. कोकण आणि विदर्भातील धानाच्या पिकाचीही प्रचंड हानी झाली आहे.

भंडारा-गोंदिया जिल्ह्यात धानाचे पिक मोठ्या प्रमाणावर होते. धान पीक खरेदी केंद्रे जाणून बुजून उशिरा सुरू करण्यात आली. शेतकऱ्याना तो माल कमी किमतीत व्यापाऱ्यांना विकावा लागला व शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. राज्यातील शेतकऱ्याचे धान न घेता परराज्यातील व्यापाऱ्याचा धान खरेदी करण्यात आला. खरेदी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. सरकारी अधिकारी, व्यापारी व दलालांनी हात मिळवणी करून शेतकऱ्यांची फसवणूक केली. ठाकरे सरकारने ७०० रुपये बोनस जाहीर केला. परंतु अर्धा बोनस ९ महिन्यांनंतर व बाकी अर्धा बोनस ११ महिन्यानंतर शेतकऱ्यांना देण्यात आला. धान उत्पादकांना धानाचा चुकारासुद्धा वेळेवर देण्यात आला नाही.

ऊसाबाबत सरकारचे धोरण कारखानदारांच्या धार्जिणे असल्याने राज्यातील ऊस उत्पादकांनाही सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. लखीमपूरच्या घटनेनंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शोक व्यक्त करून महाराष्ट्र बंदला पाठिंबा देणाऱ्या महाविकास आघाडीला राज्यात अतिवृष्टीच्या संकटात सापडलेल्या आणि नैराश्यातून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांविषयी द्वेष का? संकटग्रस्त शेतकऱ्यास सहानुभूती दाखविणारा एक शब्दही मंत्रिमंडळाच्या बैठकीत का काढला जात नाही? असा सवालही खासदार मेंढे यांनी केला.

टॅग्स :FarmerशेतकरीPoliticsराजकारण