शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे रुळाच्या प्रश्नावर खासदार-आमदार आमनेसामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 05:00 IST

स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता हे काम सुरु करण्यात आले होते. येथील खात रोडवर आपल्या कार्यकर्त्यांसह जाऊन आमदार भोंडेकरांनी याबाबत जाब विचारला. शहरातून गेलेल्या रेल्वे रुळाचे आयुध निर्माणीला कोणतेच काम नसले तरी त्यावरून भंडारा शहरात शटल रेल्वे सुरु करण्यात यावी, भंडारा शहरात रॅक पॉइंट सुरु करण्याची मागण्या असताना थेट रेल्वे रुळ उखडण्याचे काम सुरु करण्यात आले.

ठळक मुद्देजवाहरनगर ते वरठी रेल्वे मार्ग : केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना पाठविले पत्र, तीस वर्षापासून वापरात नाही रेल्वे लाईन

आमदारांनी रेल्वे रुळ उखडण्याचे काम थांबविलेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जवाहरनगर आयुध निर्माणी ते वरठी रेल्वे स्टेशनपर्यंत असलेले रेल्वे रुळ उखडण्याचे काम सुरु होताच आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आक्रमक पवित्रा घेत येथील खात रोडवरील सदर काम थांबविले. या संदर्भात त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना निवेदन पाठविले आहे.रेल्वे रुळ उखडण्याचे काम सुरु करण्यात आले होते. स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता हे काम सुरु करण्यात आले होते. येथील खात रोडवर आपल्या कार्यकर्त्यांसह जाऊन आमदार भोंडेकरांनी याबाबत जाब विचारला. शहरातून गेलेल्या रेल्वे रुळाचे आयुध निर्माणीला कोणतेच काम नसले तरी त्यावरून भंडारा शहरात शटल रेल्वे सुरु करण्यात यावी, भंडारा शहरात रॅक पॉइंट सुरु करण्याची मागण्या असताना थेट रेल्वे रुळ उखडण्याचे काम सुरु करण्यात आले. जिल्ह्यावर अन्याय असल्याचे या निवेदनात त्यांनी म्हटले आहे.खासदार म्हणतात, हा निर्णय जुनाचलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गत ३० वर्षापासून वापरात नसलेली रेल्वे लाईन काढून टाकण्याचा निर्णय हा रेल्वे विभागाचा असून तो जुनाच आहे. मात्र काही लोक त्याचा संबंध माझ्याशी जोडू पाहत आहे. अशांनी अभ्यास करावा आणि नंतरच बोलावे असा सल्ला खासदार सुनील मेंढे यांनी दिला.जवाहरनगर आयुध निर्माणी ते वरठी रोड रेल्वे स्टेशन ही १३ किमीची लाईन १९६० मध्ये तयार करण्यात आली होती. आॅर्डनन्स फॅक्टरीला लागणारा कच्चा माल आणण्यासाठी व उत्पादीत माल पाठविण्यासाठी भारतीय रेल्वेने ही सोय करून दिली होती. परंतु संरक्षण खात्याने या रेल्वे मार्गाचा उपयोग १९९० पासून बंद केला. तेव्हापासून रेल्वेच्या जागेचा दुरुपयोग व मालमत्तेचा नुकसान होत आहे. हे जुने रेल्वे रुळ कालबाह्य झाले असून वापरण्याजोगे राहिले नाही. मालमत्तेचा दुरुपयोग व नुकसान टाळण्यासाठी रेल्वे लाईन काढून घेण्याचे रेल्वेने २०१३-१४ मध्ये ठरविले होते. तो निर्णय यावर्षी अंमलात आला.काही जण विनाकारण राजकारण करुन स्वत:ला चर्चेत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. अशांनी वस्तुस्थिती जाणून व अभ्यास करुन बोलावे, आपल्या अज्ञानाचे प्रदर्शन करु नये असे ते म्हणाले.

टॅग्स :railwayरेल्वे