शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

रेल्वे रुळाच्या प्रश्नावर खासदार-आमदार आमनेसामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 05:00 IST

स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता हे काम सुरु करण्यात आले होते. येथील खात रोडवर आपल्या कार्यकर्त्यांसह जाऊन आमदार भोंडेकरांनी याबाबत जाब विचारला. शहरातून गेलेल्या रेल्वे रुळाचे आयुध निर्माणीला कोणतेच काम नसले तरी त्यावरून भंडारा शहरात शटल रेल्वे सुरु करण्यात यावी, भंडारा शहरात रॅक पॉइंट सुरु करण्याची मागण्या असताना थेट रेल्वे रुळ उखडण्याचे काम सुरु करण्यात आले.

ठळक मुद्देजवाहरनगर ते वरठी रेल्वे मार्ग : केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना पाठविले पत्र, तीस वर्षापासून वापरात नाही रेल्वे लाईन

आमदारांनी रेल्वे रुळ उखडण्याचे काम थांबविलेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जवाहरनगर आयुध निर्माणी ते वरठी रेल्वे स्टेशनपर्यंत असलेले रेल्वे रुळ उखडण्याचे काम सुरु होताच आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आक्रमक पवित्रा घेत येथील खात रोडवरील सदर काम थांबविले. या संदर्भात त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना निवेदन पाठविले आहे.रेल्वे रुळ उखडण्याचे काम सुरु करण्यात आले होते. स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता हे काम सुरु करण्यात आले होते. येथील खात रोडवर आपल्या कार्यकर्त्यांसह जाऊन आमदार भोंडेकरांनी याबाबत जाब विचारला. शहरातून गेलेल्या रेल्वे रुळाचे आयुध निर्माणीला कोणतेच काम नसले तरी त्यावरून भंडारा शहरात शटल रेल्वे सुरु करण्यात यावी, भंडारा शहरात रॅक पॉइंट सुरु करण्याची मागण्या असताना थेट रेल्वे रुळ उखडण्याचे काम सुरु करण्यात आले. जिल्ह्यावर अन्याय असल्याचे या निवेदनात त्यांनी म्हटले आहे.खासदार म्हणतात, हा निर्णय जुनाचलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गत ३० वर्षापासून वापरात नसलेली रेल्वे लाईन काढून टाकण्याचा निर्णय हा रेल्वे विभागाचा असून तो जुनाच आहे. मात्र काही लोक त्याचा संबंध माझ्याशी जोडू पाहत आहे. अशांनी अभ्यास करावा आणि नंतरच बोलावे असा सल्ला खासदार सुनील मेंढे यांनी दिला.जवाहरनगर आयुध निर्माणी ते वरठी रोड रेल्वे स्टेशन ही १३ किमीची लाईन १९६० मध्ये तयार करण्यात आली होती. आॅर्डनन्स फॅक्टरीला लागणारा कच्चा माल आणण्यासाठी व उत्पादीत माल पाठविण्यासाठी भारतीय रेल्वेने ही सोय करून दिली होती. परंतु संरक्षण खात्याने या रेल्वे मार्गाचा उपयोग १९९० पासून बंद केला. तेव्हापासून रेल्वेच्या जागेचा दुरुपयोग व मालमत्तेचा नुकसान होत आहे. हे जुने रेल्वे रुळ कालबाह्य झाले असून वापरण्याजोगे राहिले नाही. मालमत्तेचा दुरुपयोग व नुकसान टाळण्यासाठी रेल्वे लाईन काढून घेण्याचे रेल्वेने २०१३-१४ मध्ये ठरविले होते. तो निर्णय यावर्षी अंमलात आला.काही जण विनाकारण राजकारण करुन स्वत:ला चर्चेत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. अशांनी वस्तुस्थिती जाणून व अभ्यास करुन बोलावे, आपल्या अज्ञानाचे प्रदर्शन करु नये असे ते म्हणाले.

टॅग्स :railwayरेल्वे