शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

रेल्वे रुळाच्या प्रश्नावर खासदार-आमदार आमनेसामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 05:00 IST

स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता हे काम सुरु करण्यात आले होते. येथील खात रोडवर आपल्या कार्यकर्त्यांसह जाऊन आमदार भोंडेकरांनी याबाबत जाब विचारला. शहरातून गेलेल्या रेल्वे रुळाचे आयुध निर्माणीला कोणतेच काम नसले तरी त्यावरून भंडारा शहरात शटल रेल्वे सुरु करण्यात यावी, भंडारा शहरात रॅक पॉइंट सुरु करण्याची मागण्या असताना थेट रेल्वे रुळ उखडण्याचे काम सुरु करण्यात आले.

ठळक मुद्देजवाहरनगर ते वरठी रेल्वे मार्ग : केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना पाठविले पत्र, तीस वर्षापासून वापरात नाही रेल्वे लाईन

आमदारांनी रेल्वे रुळ उखडण्याचे काम थांबविलेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जवाहरनगर आयुध निर्माणी ते वरठी रेल्वे स्टेशनपर्यंत असलेले रेल्वे रुळ उखडण्याचे काम सुरु होताच आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आक्रमक पवित्रा घेत येथील खात रोडवरील सदर काम थांबविले. या संदर्भात त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना निवेदन पाठविले आहे.रेल्वे रुळ उखडण्याचे काम सुरु करण्यात आले होते. स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता हे काम सुरु करण्यात आले होते. येथील खात रोडवर आपल्या कार्यकर्त्यांसह जाऊन आमदार भोंडेकरांनी याबाबत जाब विचारला. शहरातून गेलेल्या रेल्वे रुळाचे आयुध निर्माणीला कोणतेच काम नसले तरी त्यावरून भंडारा शहरात शटल रेल्वे सुरु करण्यात यावी, भंडारा शहरात रॅक पॉइंट सुरु करण्याची मागण्या असताना थेट रेल्वे रुळ उखडण्याचे काम सुरु करण्यात आले. जिल्ह्यावर अन्याय असल्याचे या निवेदनात त्यांनी म्हटले आहे.खासदार म्हणतात, हा निर्णय जुनाचलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गत ३० वर्षापासून वापरात नसलेली रेल्वे लाईन काढून टाकण्याचा निर्णय हा रेल्वे विभागाचा असून तो जुनाच आहे. मात्र काही लोक त्याचा संबंध माझ्याशी जोडू पाहत आहे. अशांनी अभ्यास करावा आणि नंतरच बोलावे असा सल्ला खासदार सुनील मेंढे यांनी दिला.जवाहरनगर आयुध निर्माणी ते वरठी रोड रेल्वे स्टेशन ही १३ किमीची लाईन १९६० मध्ये तयार करण्यात आली होती. आॅर्डनन्स फॅक्टरीला लागणारा कच्चा माल आणण्यासाठी व उत्पादीत माल पाठविण्यासाठी भारतीय रेल्वेने ही सोय करून दिली होती. परंतु संरक्षण खात्याने या रेल्वे मार्गाचा उपयोग १९९० पासून बंद केला. तेव्हापासून रेल्वेच्या जागेचा दुरुपयोग व मालमत्तेचा नुकसान होत आहे. हे जुने रेल्वे रुळ कालबाह्य झाले असून वापरण्याजोगे राहिले नाही. मालमत्तेचा दुरुपयोग व नुकसान टाळण्यासाठी रेल्वे लाईन काढून घेण्याचे रेल्वेने २०१३-१४ मध्ये ठरविले होते. तो निर्णय यावर्षी अंमलात आला.काही जण विनाकारण राजकारण करुन स्वत:ला चर्चेत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. अशांनी वस्तुस्थिती जाणून व अभ्यास करुन बोलावे, आपल्या अज्ञानाचे प्रदर्शन करु नये असे ते म्हणाले.

टॅग्स :railwayरेल्वे