शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

आरक्षणासाठी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 00:36 IST

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला भंडारा शहरासह जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद मिळाला. भंडारा शहरात दिवसभर सर्व व्यवहार सुरळीत होते. गुरुवारी सकाळी सकल मराठा समाजाच्यावतीने मोटरसायकल रॅली काढून येथील जिल्हा कचेरी परिसरात पाच तास ठिय्या देण्यात आला.

ठळक मुद्देसकल मराठा समाज : नागपूर मार्गावरील बससेवा काही काळ ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला भंडारा शहरासह जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद मिळाला. भंडारा शहरात दिवसभर सर्व व्यवहार सुरळीत होते. गुरुवारी सकाळी सकल मराठा समाजाच्यावतीने मोटरसायकल रॅली काढून येथील जिल्हा कचेरी परिसरात पाच तास ठिय्या देण्यात आला. तर भंडारा नागपूर मार्गावरील एसटी बससेवा दुपारपर्यंत ठप्प झाली होती. जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी गुरुवारी राज्यव्यापी बंदचे आवाहन करण्यात आले होते. भंडारा शहरातही सकल मराठा समाजाच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले. सकाळी १० वाजताच्या सुमारास शुक्रवारी येथून दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. हातात भगवा झेंडा घेतलेले शेकडो नागरिक यात सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून दुचाकी रॅली आणि मोर्चाला प्रारंभ झाला. व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन करण्यात आले. मात्र त्याला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान हा मोर्चा येथील जिल्हाधिकारी कार्यालय चौकात पोहचला. त्या ठिकाणी मोर्चेकºयांनी तब्बल पाच तास ठिय्या दिला. यावेळी मराठा आंदोलनात शहीद झालेल्या तरुणांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. यावेळी राजेंद्र लिमसे, विजय घाडगे, प्रकाश कोलते, अविनाश उन्हाळे, सुनिल कापसे, संजय तुपटे, सुशिल शिंदे, प्रवीण कापसे, सुधाकर घोरपडे, संजय मोहीते, ज्ञानेश्वर निकम, पराग पवार, दिलीप फुकटे, प्रमोद कोल्हे, सतीष घोरपडे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.नागपूर येथे काही बसेसवर दगडफेक झाल्याचे वृत्त धडकल्याने भंडारा ते नागपूर बससेवा सकाळी ९ वाजतापासून बंद करण्यात आली. दुपारी ३ वाजतानंतर ही बससेवा सुरू करण्यात आली. शहरातील संपूर्ण वाहतूक मात्र दिवसभर सुरळीत होती. ग्रामीण भागातील बससेवेवरही कोणताच परिणाम जाणवला नाही.आरक्षणाचा निर्णय लवकर घ्यामहाराष्ट्र राज्यात मराठा समाज कोट्यवधीच्या घरात आहे. मराठ्यांची कर्मभूमी सुद्धा महाराष्ट्र आहे. इतिहासात आपल्या प्राणांची आहुती या समाजाने स्वराज्याच्या रक्षणासाठी दिली. आजही संपूर्ण देशभर मराठा समाज आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्यामुळे आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्याही हा समाज मागे पडत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे अनेक जण उच्च शिक्षण घेऊ शकत नाही. त्यामुळे मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMorchaमोर्चा