शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

आरक्षणासाठी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 00:36 IST

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला भंडारा शहरासह जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद मिळाला. भंडारा शहरात दिवसभर सर्व व्यवहार सुरळीत होते. गुरुवारी सकाळी सकल मराठा समाजाच्यावतीने मोटरसायकल रॅली काढून येथील जिल्हा कचेरी परिसरात पाच तास ठिय्या देण्यात आला.

ठळक मुद्देसकल मराठा समाज : नागपूर मार्गावरील बससेवा काही काळ ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला भंडारा शहरासह जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद मिळाला. भंडारा शहरात दिवसभर सर्व व्यवहार सुरळीत होते. गुरुवारी सकाळी सकल मराठा समाजाच्यावतीने मोटरसायकल रॅली काढून येथील जिल्हा कचेरी परिसरात पाच तास ठिय्या देण्यात आला. तर भंडारा नागपूर मार्गावरील एसटी बससेवा दुपारपर्यंत ठप्प झाली होती. जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी गुरुवारी राज्यव्यापी बंदचे आवाहन करण्यात आले होते. भंडारा शहरातही सकल मराठा समाजाच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले. सकाळी १० वाजताच्या सुमारास शुक्रवारी येथून दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. हातात भगवा झेंडा घेतलेले शेकडो नागरिक यात सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून दुचाकी रॅली आणि मोर्चाला प्रारंभ झाला. व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन करण्यात आले. मात्र त्याला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान हा मोर्चा येथील जिल्हाधिकारी कार्यालय चौकात पोहचला. त्या ठिकाणी मोर्चेकºयांनी तब्बल पाच तास ठिय्या दिला. यावेळी मराठा आंदोलनात शहीद झालेल्या तरुणांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. यावेळी राजेंद्र लिमसे, विजय घाडगे, प्रकाश कोलते, अविनाश उन्हाळे, सुनिल कापसे, संजय तुपटे, सुशिल शिंदे, प्रवीण कापसे, सुधाकर घोरपडे, संजय मोहीते, ज्ञानेश्वर निकम, पराग पवार, दिलीप फुकटे, प्रमोद कोल्हे, सतीष घोरपडे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.नागपूर येथे काही बसेसवर दगडफेक झाल्याचे वृत्त धडकल्याने भंडारा ते नागपूर बससेवा सकाळी ९ वाजतापासून बंद करण्यात आली. दुपारी ३ वाजतानंतर ही बससेवा सुरू करण्यात आली. शहरातील संपूर्ण वाहतूक मात्र दिवसभर सुरळीत होती. ग्रामीण भागातील बससेवेवरही कोणताच परिणाम जाणवला नाही.आरक्षणाचा निर्णय लवकर घ्यामहाराष्ट्र राज्यात मराठा समाज कोट्यवधीच्या घरात आहे. मराठ्यांची कर्मभूमी सुद्धा महाराष्ट्र आहे. इतिहासात आपल्या प्राणांची आहुती या समाजाने स्वराज्याच्या रक्षणासाठी दिली. आजही संपूर्ण देशभर मराठा समाज आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्यामुळे आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्याही हा समाज मागे पडत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे अनेक जण उच्च शिक्षण घेऊ शकत नाही. त्यामुळे मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMorchaमोर्चा