शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच

By admin | Updated: August 18, 2016 00:16 IST

तालुक्यातील कृषीपंपाचे भारनियमन बंद करण्यात यावे यासाठी शेतकरी दोन महिन्यापासून वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहेत.

ऊर्जामंत्र्यांशी बैठक रद्द : भारनियमन मात्र ‘जैसे थे’साकोली : तालुक्यातील कृषीपंपाचे भारनियमन बंद करण्यात यावे यासाठी शेतकरी दोन महिन्यापासून वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहेत. एवढेच नाही तर शेतकऱ्यांनी उर्जामंत्री बावनकुळे यांच्याशी प्रत्यक्षात भेट घेऊन चर्चा केली. मात्र त्यातही तोडगा निघाला नाही. शेवटी शेतकऱ्यांनी काल मंगळपासून वीज वितरण कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. यावर्षी पावसाळ्यापूर्वीपासूनच कृषी पंपाचे १६ तासांचे भारनियमन सुरु आहे. हे भारनियमन सुरु असल्यामुळे शेतकऱ्यांची रोवणी खोळंबली. तर कशीबशी केली. त्या शेतकऱ्यांसमोर आता पाणी कुठून आणायचे असा प्रश्न निर्माण झाला. कारण १६ तासांच्या भारनियमनामुळे फक्त ८ तास वीज पुरवठा मिळत आहे व या आठ तासात शेतीला पाणीपुरवठा होऊ शकत नाही. परिणामी शेतातील धानाचे काय होईल या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.१६ तासांचे भारनियमन बंद करण्यात यावे यासाठी शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीला निवेदन दिले. प्रत्यक्षात कार्यकारी अभियंता यांना या संदर्भात माहिती दिली. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. अखेर दि. १४ ला शेतकऱ्यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रत्यक्षात भेट घेऊन चर्चा केली. यावर बावनकुळे यांनी १६ ला सकाळी संबंधित अधिकारी व खासदार, आमदार व शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ यांची बैठक बोलाविली होती. मात्र ती आज रद्द करण्यात आली. मात्र जोपर्यंत हे भारनियमन बंद होणार नाही. तोपर्यंत आंदोलन करू अशी भूमिका शेतकऱ्यांची असल्याने आजपासून हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. अशोक कापगते, अविनाश ब्राम्हणकर, मदन रामटेके, प्रभाकर सपाटे, केवळराम लांजेवार, नरेंद्र वाडीभस्मे, शैलेश गजभिये, बोरकर यांच्यासह तालुक्यातील हजारो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. (तालुका प्रतिनिधी)