शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

आईचे नाव बंधनकारक पण अंमलबजावणी कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 13:32 IST

Bhandara : आता सर्व महत्वाच्या कागदपत्रांवर लागणार आईचे सुद्धा नाव

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासनाने १ मेपासून कागदपत्रांमध्ये आईचे नाव लावणे बंधनकारक केले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आलेले असले तरी अद्याप जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयांमधून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली नाही. सर्व कार्यालयांनी शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्य सरकारने निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी १४ मार्च २०२४ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार, आईचे नाव दस्तऐवजांमध्ये लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. १ मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात यावी, असे आदेश शासनाने दिले होते. मात्र, या निर्णयामुळे अनेक कार्यालयांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झालेली असल्याचे दिसून येत आहे.

१ मेनंतर जन्मलेल्यांसाठी नियम लागू■ शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, सद्यःस्थितीला जे कागदपत्र आहे त्याच्यावर आईचे नाव लावणे बंधनकारक राहणार नाही.■ सध्याच्या कागदपत्रात कोणताच बदल करण्याची गरज नाही. १ मे २०२४ नंतर ज्या बालकांचा जन्म होईल, त्यांनाच हा निर्णय लागू असणार आहे.

कोणत्या कागदपत्रांवर आईचे नाव लावणे बंधनकारक राहणार?सरकारने कोणत्या शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव लावणे बंधनकारक राहणार आहे, याची माहिती देण्यात आलेली आहे. यामध्ये जन्माचा दाखला, शाळेत अॅडमिशन घेताना भरलेला अर्ज, सर्व शैक्षणिक कागदपत्रे, जमिनीचा सातबारा उतारा, प्रॉपर्टीशी संबंधित डॉक्युमेंट, शासकीय तथा निमशासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक, शासकीय तथा निमशासकीय कर्मचाऱ्यांची सॅलरी स्लिप, रेशन कार्ड आणि मृत्यूचा दाखला या शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव लावणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.

प्रशासनाकडून सूचना■ शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत.■ प्रशासनाकडून विविध विभागांना पत्र पाठवण्यात येत आहेत.

टॅग्स :bhandara-acभंडाराGovernmentसरकार