शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

रबी पिकाची पेरणी उद्दिष्टापेक्षा अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 22:56 IST

जिल्हा प्रशासनाने उन्हाळी धानपीक घेऊ नये असा फतवा काढला असला तरी रबी पिकाच्या पेरणीत उद्दिष्टापैकी अधिक पीक पेरणी झाल्याचे दिसून येत आहे. ४७ हजार ४०२ हेक्टर क्षेत्रात रबी पिकाची पेरणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे४७ हजार हेक्टर क्षेत्र वाढले : उन्हाळी पिकांवर संकट कायम, कमी पावसाचा शेतकऱ्यांना फटका

इंद्रपाल कटकवार ।आॅनलाईन लोकमतभंडारा : जिल्हा प्रशासनाने उन्हाळी धानपीक घेऊ नये असा फतवा काढला असला तरी रबी पिकाच्या पेरणीत उद्दिष्टापैकी अधिक पीक पेरणी झाल्याचे दिसून येत आहे. ४७ हजार ४०२ हेक्टर क्षेत्रात रबी पिकाची पेरणी करण्यात आली आहे.भंडारा जिल्ह्यात भात हे मुख्य पीक आहे. खरीप हंगामानंतर शेतकरी रबी पिकाकडे वळतो. यात रब्बी पिकांतर्गत गहू यासह इतर कडधान्य अंतर्गत हरभरा, लाख, लाखोळी, पोपट, वाटाणा, उडीद, मुग, मसूर, चवळी, मोट व अन्य धान्याचा समावेश आहे. यासह गळीतधान्यांतर्गत जवस सूर्यफुल, मोहरी, तीळ, एरंडी (सोयाबीन) आदी पीके घेतली जातात. तसेच भाजीपाला पीके घेण्यात येतात.जिल्ह्यात सातही तालुक्यांमध्ये गहू पिकाची रबी पिकांतर्गत ९ हजार ७३८ हेक्टरमध्ये लागवड करण्यात आली आहे. याशिवाय कडधान्याची ३१ हजार ४३८ हेक्टरमध्ये पेरणी करण्यात आली असून गळीत धान्यांतर्गत १५६१ हेक्टरमध्ये पिकांची पेरणी करण्यात आली आहे. यावर्षी कमी पर्जन्यमानामुळे जिल्हा प्रशासनाने उन्हाळी धान पीक घेण्यास मनाई करण्यात आली आहे. रबी पीक पेरणीचे ४५ हजार हेक्टरमध्ये लागवडीचे उद्दीष्ट असले तरी यावर्षी ते त्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. २ हजार ४०२ हेक्टराने वाढ झालेली आहे. दुसरीकडे बागायती शेतीकडे शेतकऱ्यांचा कल कमीच आहे. परिणामी योजना असुनही त्याचा लाभ घेतला जात नसल्याचे शासकीय आकडेवारी सांगते.२९६३ हेक्टरमध्ये भाजीपाल्याचे उत्पादनरबी हंगामात भाजीपाला उत्पादनाकडे शेतकऱ्यांनी हव्या त्या प्रमाणात लक्ष दिल्याचे दिसून येत नाही. २९६३ हेक्टरमध्ये भाजीपाला पिकाची लागवड केली असून उत्पादनाअभावी भाजीपाल्याची दुसºया जिल्ह्यातून आयात करावी लागत आहे. परिणामी ऐन हंगामातही भाजीपाल्यांचे भाव गगनाला भिडतात. रबी पीक पेरणीचे ४५ हजार हेक्टरमध्ये लागवडीचे उद्दीष्ट होते, हे येथे उल्लेखनीय.अशी आहे तालुकानिहाय रबीची पेरणीजिल्ह्यातील भंडारा तालुक्यातील एकूण रबी पिकाखाली क्षेत्रांतर्गत भंडारा तालुक्यात एकुण सर्वसाधारण क्षेत्रापैकी पेरणी क्षेत्र ६१९३ हेक्टर, मोहाडी ३१४४ हेक्टर, तुमसर ५५७१ हेक्टर, पवनी १३८६४ हेक्टर, साकोली ३७७० हेक्टर, लाखनी ६३२९ हेक्टर तर लाखांदूर तालुक्यात ८८३० हेक्टरमधे रबी पिकाची पेरणी करण्यात आली आहे. मात्र कडधान्याच्या पेरणीत वाढ दिसून येते.