शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

रबी पिकाची पेरणी उद्दिष्टापेक्षा अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 22:56 IST

जिल्हा प्रशासनाने उन्हाळी धानपीक घेऊ नये असा फतवा काढला असला तरी रबी पिकाच्या पेरणीत उद्दिष्टापैकी अधिक पीक पेरणी झाल्याचे दिसून येत आहे. ४७ हजार ४०२ हेक्टर क्षेत्रात रबी पिकाची पेरणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे४७ हजार हेक्टर क्षेत्र वाढले : उन्हाळी पिकांवर संकट कायम, कमी पावसाचा शेतकऱ्यांना फटका

इंद्रपाल कटकवार ।आॅनलाईन लोकमतभंडारा : जिल्हा प्रशासनाने उन्हाळी धानपीक घेऊ नये असा फतवा काढला असला तरी रबी पिकाच्या पेरणीत उद्दिष्टापैकी अधिक पीक पेरणी झाल्याचे दिसून येत आहे. ४७ हजार ४०२ हेक्टर क्षेत्रात रबी पिकाची पेरणी करण्यात आली आहे.भंडारा जिल्ह्यात भात हे मुख्य पीक आहे. खरीप हंगामानंतर शेतकरी रबी पिकाकडे वळतो. यात रब्बी पिकांतर्गत गहू यासह इतर कडधान्य अंतर्गत हरभरा, लाख, लाखोळी, पोपट, वाटाणा, उडीद, मुग, मसूर, चवळी, मोट व अन्य धान्याचा समावेश आहे. यासह गळीतधान्यांतर्गत जवस सूर्यफुल, मोहरी, तीळ, एरंडी (सोयाबीन) आदी पीके घेतली जातात. तसेच भाजीपाला पीके घेण्यात येतात.जिल्ह्यात सातही तालुक्यांमध्ये गहू पिकाची रबी पिकांतर्गत ९ हजार ७३८ हेक्टरमध्ये लागवड करण्यात आली आहे. याशिवाय कडधान्याची ३१ हजार ४३८ हेक्टरमध्ये पेरणी करण्यात आली असून गळीत धान्यांतर्गत १५६१ हेक्टरमध्ये पिकांची पेरणी करण्यात आली आहे. यावर्षी कमी पर्जन्यमानामुळे जिल्हा प्रशासनाने उन्हाळी धान पीक घेण्यास मनाई करण्यात आली आहे. रबी पीक पेरणीचे ४५ हजार हेक्टरमध्ये लागवडीचे उद्दीष्ट असले तरी यावर्षी ते त्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. २ हजार ४०२ हेक्टराने वाढ झालेली आहे. दुसरीकडे बागायती शेतीकडे शेतकऱ्यांचा कल कमीच आहे. परिणामी योजना असुनही त्याचा लाभ घेतला जात नसल्याचे शासकीय आकडेवारी सांगते.२९६३ हेक्टरमध्ये भाजीपाल्याचे उत्पादनरबी हंगामात भाजीपाला उत्पादनाकडे शेतकऱ्यांनी हव्या त्या प्रमाणात लक्ष दिल्याचे दिसून येत नाही. २९६३ हेक्टरमध्ये भाजीपाला पिकाची लागवड केली असून उत्पादनाअभावी भाजीपाल्याची दुसºया जिल्ह्यातून आयात करावी लागत आहे. परिणामी ऐन हंगामातही भाजीपाल्यांचे भाव गगनाला भिडतात. रबी पीक पेरणीचे ४५ हजार हेक्टरमध्ये लागवडीचे उद्दीष्ट होते, हे येथे उल्लेखनीय.अशी आहे तालुकानिहाय रबीची पेरणीजिल्ह्यातील भंडारा तालुक्यातील एकूण रबी पिकाखाली क्षेत्रांतर्गत भंडारा तालुक्यात एकुण सर्वसाधारण क्षेत्रापैकी पेरणी क्षेत्र ६१९३ हेक्टर, मोहाडी ३१४४ हेक्टर, तुमसर ५५७१ हेक्टर, पवनी १३८६४ हेक्टर, साकोली ३७७० हेक्टर, लाखनी ६३२९ हेक्टर तर लाखांदूर तालुक्यात ८८३० हेक्टरमधे रबी पिकाची पेरणी करण्यात आली आहे. मात्र कडधान्याच्या पेरणीत वाढ दिसून येते.