शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
3
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
4
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
5
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
6
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
7
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
8
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
9
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
10
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
11
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
12
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
13
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
14
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
15
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
16
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
17
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
18
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
19
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
20
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!

एक पीकपद्धती शेती धोकादायक; संमिश्र पिकांची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 17:47 IST

Bhandara : मानवी आरोग्यासाठी चक्री पीक पद्धत वापराचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : संमिश्र पीक पद्धतीचा अवलंब केल्यास आवश्यक अन्नद्रव्य घटक आहारात मिळून आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. परंतु, सध्या शेतकरी एकाच शेतात एकाच पिकाचे वाण वारंवार घेत आहेत. ही एक पीकपद्धती शेती, शेतकरी आणि मानवी आरोग्याचे संतुलन बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. शेतकऱ्यांनी शेतीचे आरोग्य व पीक क्षमता सुदृढ ठेवण्यासाठी संमिश्र पीकपद्धतीचा अवलंब करणे काळाची गरज आहे. सतत एकच वाण पुन्हा पुन्हा पेरणे शेतीची उत्पादनक्षमता घटण्यास कारणीभूत ठरत आहे. 

यांत्रिकीकरण आणि आधुनिक संकरीत वाण आल्याने एकाच जमिनीवर दोनपेक्षा अधिक वेळा उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. धान, सोयाबीन, तूर, ऊस, कापूस, उडिद हेच पीक वारंवार घेतले जातात. परंतु, शेतीची प्रत आणि मानवी आरोग्यासाठी आवश्यक इतर पिके घेणे गरजेचे आहे. त्यासाठी चक्री पीक पद्धतीचा वापर करावा, असे आवाहन कृषी अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.

जिल्ह्यात मका, धान, कापूस आदी मुख्य पिकांचे उत्पादन घेतले जाते. मूग, मटकी, चवळी, मसूर, वटाणा आदी पिकेही घेतली जातात. परंतु, तेलबिया पीक जवस, करडी, मोहरी, सोयाबीन, भुईमूग याकडे अद्यापही अनेक शेतकऱ्यांकडून पाठ फिरवली जाते. भाजीपाल्यात कारले, भोपळा, दोडका, गवार, वाल, तोंडली तसेच पालेभाज्या उगविल्या जातात. तसेच फळ पीक आंबा, पेरू, चिकू, जांभूळ, सीताफळ, मोसंबी, रामफळ, बोरे आदींचे उत्पादन फारसे उत्पादन होत नाही.

तेलबिया उत्पादनाकडे होतेय दुर्लक्षअन्नघटकात आरोग्याच्या दृष्टीने तृणधान्य, द्विदलधान्य, एकदल धान्य, तेलबिया, फळ आदींचे महत्त्वाचे स्थान असते. मात्र, याकडे सरळ तेलबिया उत्पादनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. संमिश्र पीक पद्धतीचा अवलंब केल्यास आवश्यक ते सर्व अन्नद्रव्य घटक आहारात मिळून आरोग्य सुदृढ राहण्यास फायदेशीर ठरेल तसेच शेतीची प्रतसुद्धा संतुलित राहण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

"शेतकरीबांधवांनी आपली आणि शेतीची गरज म्हणून चक्री पद्धतीने पिकांची लागवड करावी. अन्नधान्य, कडधान्य पिकांसह तेलबिया, फळ उत्पादनांकडेही लक्ष द्यावे. रानभाज्यांचे महत्त्व ओळखून त्यादेखील जतन कराव्यात."- सुनील भडके, तालुका कृषी अधिकारी, मोहाडी.

टॅग्स :bhandara-acभंडाराfarmingशेती