शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

एक पीकपद्धती शेती धोकादायक; संमिश्र पिकांची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 17:47 IST

Bhandara : मानवी आरोग्यासाठी चक्री पीक पद्धत वापराचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : संमिश्र पीक पद्धतीचा अवलंब केल्यास आवश्यक अन्नद्रव्य घटक आहारात मिळून आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. परंतु, सध्या शेतकरी एकाच शेतात एकाच पिकाचे वाण वारंवार घेत आहेत. ही एक पीकपद्धती शेती, शेतकरी आणि मानवी आरोग्याचे संतुलन बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. शेतकऱ्यांनी शेतीचे आरोग्य व पीक क्षमता सुदृढ ठेवण्यासाठी संमिश्र पीकपद्धतीचा अवलंब करणे काळाची गरज आहे. सतत एकच वाण पुन्हा पुन्हा पेरणे शेतीची उत्पादनक्षमता घटण्यास कारणीभूत ठरत आहे. 

यांत्रिकीकरण आणि आधुनिक संकरीत वाण आल्याने एकाच जमिनीवर दोनपेक्षा अधिक वेळा उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. धान, सोयाबीन, तूर, ऊस, कापूस, उडिद हेच पीक वारंवार घेतले जातात. परंतु, शेतीची प्रत आणि मानवी आरोग्यासाठी आवश्यक इतर पिके घेणे गरजेचे आहे. त्यासाठी चक्री पीक पद्धतीचा वापर करावा, असे आवाहन कृषी अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.

जिल्ह्यात मका, धान, कापूस आदी मुख्य पिकांचे उत्पादन घेतले जाते. मूग, मटकी, चवळी, मसूर, वटाणा आदी पिकेही घेतली जातात. परंतु, तेलबिया पीक जवस, करडी, मोहरी, सोयाबीन, भुईमूग याकडे अद्यापही अनेक शेतकऱ्यांकडून पाठ फिरवली जाते. भाजीपाल्यात कारले, भोपळा, दोडका, गवार, वाल, तोंडली तसेच पालेभाज्या उगविल्या जातात. तसेच फळ पीक आंबा, पेरू, चिकू, जांभूळ, सीताफळ, मोसंबी, रामफळ, बोरे आदींचे उत्पादन फारसे उत्पादन होत नाही.

तेलबिया उत्पादनाकडे होतेय दुर्लक्षअन्नघटकात आरोग्याच्या दृष्टीने तृणधान्य, द्विदलधान्य, एकदल धान्य, तेलबिया, फळ आदींचे महत्त्वाचे स्थान असते. मात्र, याकडे सरळ तेलबिया उत्पादनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. संमिश्र पीक पद्धतीचा अवलंब केल्यास आवश्यक ते सर्व अन्नद्रव्य घटक आहारात मिळून आरोग्य सुदृढ राहण्यास फायदेशीर ठरेल तसेच शेतीची प्रतसुद्धा संतुलित राहण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

"शेतकरीबांधवांनी आपली आणि शेतीची गरज म्हणून चक्री पद्धतीने पिकांची लागवड करावी. अन्नधान्य, कडधान्य पिकांसह तेलबिया, फळ उत्पादनांकडेही लक्ष द्यावे. रानभाज्यांचे महत्त्व ओळखून त्यादेखील जतन कराव्यात."- सुनील भडके, तालुका कृषी अधिकारी, मोहाडी.

टॅग्स :bhandara-acभंडाराfarmingशेती