शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

एक पीकपद्धती शेती धोकादायक; संमिश्र पिकांची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 17:47 IST

Bhandara : मानवी आरोग्यासाठी चक्री पीक पद्धत वापराचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : संमिश्र पीक पद्धतीचा अवलंब केल्यास आवश्यक अन्नद्रव्य घटक आहारात मिळून आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. परंतु, सध्या शेतकरी एकाच शेतात एकाच पिकाचे वाण वारंवार घेत आहेत. ही एक पीकपद्धती शेती, शेतकरी आणि मानवी आरोग्याचे संतुलन बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. शेतकऱ्यांनी शेतीचे आरोग्य व पीक क्षमता सुदृढ ठेवण्यासाठी संमिश्र पीकपद्धतीचा अवलंब करणे काळाची गरज आहे. सतत एकच वाण पुन्हा पुन्हा पेरणे शेतीची उत्पादनक्षमता घटण्यास कारणीभूत ठरत आहे. 

यांत्रिकीकरण आणि आधुनिक संकरीत वाण आल्याने एकाच जमिनीवर दोनपेक्षा अधिक वेळा उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. धान, सोयाबीन, तूर, ऊस, कापूस, उडिद हेच पीक वारंवार घेतले जातात. परंतु, शेतीची प्रत आणि मानवी आरोग्यासाठी आवश्यक इतर पिके घेणे गरजेचे आहे. त्यासाठी चक्री पीक पद्धतीचा वापर करावा, असे आवाहन कृषी अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.

जिल्ह्यात मका, धान, कापूस आदी मुख्य पिकांचे उत्पादन घेतले जाते. मूग, मटकी, चवळी, मसूर, वटाणा आदी पिकेही घेतली जातात. परंतु, तेलबिया पीक जवस, करडी, मोहरी, सोयाबीन, भुईमूग याकडे अद्यापही अनेक शेतकऱ्यांकडून पाठ फिरवली जाते. भाजीपाल्यात कारले, भोपळा, दोडका, गवार, वाल, तोंडली तसेच पालेभाज्या उगविल्या जातात. तसेच फळ पीक आंबा, पेरू, चिकू, जांभूळ, सीताफळ, मोसंबी, रामफळ, बोरे आदींचे उत्पादन फारसे उत्पादन होत नाही.

तेलबिया उत्पादनाकडे होतेय दुर्लक्षअन्नघटकात आरोग्याच्या दृष्टीने तृणधान्य, द्विदलधान्य, एकदल धान्य, तेलबिया, फळ आदींचे महत्त्वाचे स्थान असते. मात्र, याकडे सरळ तेलबिया उत्पादनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. संमिश्र पीक पद्धतीचा अवलंब केल्यास आवश्यक ते सर्व अन्नद्रव्य घटक आहारात मिळून आरोग्य सुदृढ राहण्यास फायदेशीर ठरेल तसेच शेतीची प्रतसुद्धा संतुलित राहण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

"शेतकरीबांधवांनी आपली आणि शेतीची गरज म्हणून चक्री पद्धतीने पिकांची लागवड करावी. अन्नधान्य, कडधान्य पिकांसह तेलबिया, फळ उत्पादनांकडेही लक्ष द्यावे. रानभाज्यांचे महत्त्व ओळखून त्यादेखील जतन कराव्यात."- सुनील भडके, तालुका कृषी अधिकारी, मोहाडी.

टॅग्स :bhandara-acभंडाराfarmingशेती