शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

गणेशपुरात माकडांचा उच्छाद

By admin | Updated: February 28, 2017 00:29 IST

शहरालगत असलेल्या गणेशपूर येथे मागील काही दिवसांपासून माकडांनी उच्छाद मांडला आहे. माकडांच्या दोन गटात सुरु असलेल्या अंतर्गत वादात चार माकडांचा जीव गेला असून ...

सात जखमी : वनविभागाची असहकाराची भूमिका, ग्रामस्थांमध्ये संतापभंडारा : शहरालगत असलेल्या गणेशपूर येथे मागील काही दिवसांपासून माकडांनी उच्छाद मांडला आहे. माकडांच्या दोन गटात सुरु असलेल्या अंतर्गत वादात चार माकडांचा जीव गेला असून संतप्त माकडांनी येथील नागरिकांवर हल्ला करुन सात नागरिकांना जखमी केले आहे. याप्रकरणी वनविभागाने असहकाराची भूमिका घेतल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.गणेशपूर येथे मागील काही दिवसांपासून मर्कटलिलांमुळे नागरिक अक्षरश: हैराण झाले आहे. माकडांचे दोन गट या गावात एकमेकांवर आक्रमण करुन माकडांनाच जखमी करीत आहेत. एका घरावरुन दुसऱ्या घरावर उड्या मारुण या माकडांनी ग्रामस्थांना त्रस्त केले आहे. माकड्यांचा या कृत्यांमुळे अनेक कौलारु घरांचे नुकसान झाले आहेत. माकडांचा दोन गटात सुरु असलेल्या तंट्यात चार माकडांना जखमी होऊन जीव गमवावा लागला आहे. माकडांच्या या कृत्याची व माकडांच्या मृत्यूची माहिती गणेशपूर ग्रामपंचायतीने वनविभागाला दिली. मात्र वनविभागाने या बाबीकडे दुर्लक्ष केले असून ग्रामपंचायतीला माकड पकडण्यासाठी मदत करण्याऐवजी असहकार्याची भूमिका घेतली आहे. याबाबत प्रशासनाने वनविभागाकडून असहकार्य मिळत असल्याने संताप व्यक्त केला आहे. नागरिकांनी वन्यप्राण्यांच्या जीविताला धोका पोहचवू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल असा नियम आहे. जर नागरिकांना वन्यप्राण्यांचा त्रास होत असल्यास याची जबाबदारी वनविभागाने का घेवू नये, असा संतप्त सवाल गणेशपूर वासीय करीत आहे. (शहर प्रतिनिधी)वनविभागाचे नियम वन्यप्राण्यांसदर्भात सुरक्षेचे आहे. मग नागरिकांच्या आयुष्याची जोखीम वनविभागाने घ्यायला पाहिजे. वनविभागाने माकडांचा बंदोबस्त करण्याकरिता ग्रामपंचायतीला सहकार्य करावे.-वनिता भुरे, सरपंच, ग्रा. पं. गणेशपूरमी आता महत्वाच्या कामात आहे. याबाबत सकाळी वनविभागाच्या कार्यालयात या सविस्तर चर्चा करु.-निलय भोगे, वनपरिक्षेत्राधिकारी भंडारा