शहरं
Join us  
Trending Stories
1
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
2
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
3
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
4
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
5
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
6
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
7
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
8
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
9
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
10
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
11
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
12
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
13
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
15
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
16
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
17
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
18
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
19
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
20
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार

मोहाडीत तीन घरे आगीत भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 01:09 IST

येथील सुभाष वॉर्डात तीन घरांना लागलेल्या आगीत जवळपास दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारला दुपारच्या सुमारास घडली. आगीत तीन घरांपैकी दोन घरे पूर्णपणे जळालेली आहे तर एका घरातील एक भाग जळालेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाड़ी : येथील सुभाष वॉर्डात तीन घरांना लागलेल्या आगीत जवळपास दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारला दुपारच्या सुमारास घडली. आगीत तीन घरांपैकी दोन घरे पूर्णपणे जळालेली आहे तर एका घरातील एक भाग जळालेला आहे.सुभाष वॉर्डातील शेवटच्या टोकावर असलेले देवराम शेंडे, सुखदेव शेंडे व रामप्रसाद शेंडे यांच्या घराला लागून असलेल्या शेतीच्या धुऱ्यावरील गवत जाळण्यासाठी कोणीतरी आग लावली.हवेमुळे ती आग या घराला लागली, असा अंदाज आहे, परिसरातील आकाश पिकलमुंडे, बादल सोनवाने, जितु सोनवाने, गुरुदेव बांते यांनी घराला लागलेली आग आटोक्यात आणण्याचे विशेष प्रयत्न केले.तसेच चेतन गोपीचंद शेंडे या युवकाने जिवाची पर्वा न करता घरात असलेले गॅस सिलेंडर बाहेर काढले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या आगीत घरातील सर्व साहित्य जळून नष्ट झाले, आग लागल्याची सूचना प्राप्त होताच ठाणेदार शिवाजी कदम पोलीस कर्मचारी विनोद सेलोकर, पवन राऊत, मिथुन चांदेवार, आशीष तिवारी, ज्ञानेश्वर हाके, संजय बडवाईक, संजय वाकलकर, राजेश गजभिये यांनी घटनास्थळावर धाव घेवून मदत कार्यात सहभाग घेतला, तुमसर नगर परिषदेची अग्निशमन बंब येत पर्यंत वॉर्डातील युवकांनी आग आटोक्यात आणली होती.यात आशिष पात्रे यांच्या पाण्याच्या टँकरने वेळीच घटनास्थळावर पोहोचून फार मोठी कामगिरी बजावली. या घटनेत देवांगणा सुखदेव शेंडे यांनी पेटीत ठेवलेले चार हजार रुपये तसेच मंगळसूत्र व दोन नथ वितळून नष्ट झाल्या तर कविता देवराम शेंडे यांनी पेटीत ठेवलेले आठ हजार रुपये नगदी व त्यांच्या सासूचे आठ हजार रुपये जळून नष्ट झाले, याशिवाय घरातील संपूर्ण साहित्य ची राखरांगोळी झाली.घरातील अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तु, कपडे, इतर साहित्य जळून खाक झाले असल्याने त्यांच्यावर मोठेच संकट कोसळलेले आहे. शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आहे.

टॅग्स :fireआग