शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

केंद्र सरकारविरोधात ‘आयटक’चे मोहाडीत आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 21:27 IST

केंद्रातील भाजपचे सरकार विविध पातळीवर अपयशी झाले आहे. आभास, स्वप्नाचा जगात भुरळ पाडण्यात यशस्वी झाली. मोदी सरकारचे धोरण किसान, कामगार, कर्मचारी, मजूर आदींच्या विरोधी आहे. त्या धोरणांचा विरोध करण्यासाठी किसान सभेच्या मागणी दिवसानिमित्त मोहाडी येथे आयटक व किसान सभेच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. मागण्याचे निवेदन तहसीलदार सुर्यकांत पाटील यांच्याद्वारे राष्टÑपती रामनाथ कोविंद यांना पाठविण्यात आले.

ठळक मुद्देशेतकरी मागणी दिवस : तहसीलदारांना सोपविले विविध मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : केंद्रातील भाजपचे सरकार विविध पातळीवर अपयशी झाले आहे. आभास, स्वप्नाचा जगात भुरळ पाडण्यात यशस्वी झाली. मोदी सरकारचे धोरण किसान, कामगार, कर्मचारी, मजूर आदींच्या विरोधी आहे. त्या धोरणांचा विरोध करण्यासाठी किसान सभेच्या मागणी दिवसानिमित्त मोहाडी येथे आयटक व किसान सभेच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. मागण्याचे निवेदन तहसीलदार सुर्यकांत पाटील यांच्याद्वारे राष्टÑपती रामनाथ कोविंद यांना पाठविण्यात आले.अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने दरवर्षी १ सप्टेंबर ‘किसान मागणी’ दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्त संपूर्ण देशव्यापारी शेतकऱ्यांच्या मागण्यांना घेवून मोर्चा, निदर्शने किसान सभेने ठरविले होते. त्या अनुषंगाने शेतकरी, कामगार, कर्मचारी आदींचा मागण्यासाठी किसान सभा व आयटक यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार बाजार मोहाडी येथून मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाचे नेतृत्व किसान सभेचे सचिव माधवराव बांते, सदानंद इलमे, शिवकुमार गणवीर, अल्का बोरकर, गौतमी धवसे, शालू कापसे आदीनी केले.तहसील कचेरीसमोर मोर्च्याचे रुपांतर सभेत करण्यात आले. यावेळी सभेला आयटकचे कार्याध्यक्ष शिवकुमार गणवीर, माधवराव बांते, सदानंद इलमे, अल्का बोरकर यांची भाषणे झाली. भाषणातून भाजपाच्या कामगार विरोधी धोरणाचा समाचार घेण्यात आला. नोटाबंदीने लहान व्यापारी मागे गेले, बेरोजगार नोकरीच्या शोधात आहेत. शेतकरी आत्महत्या करीत आहेत, अंगणवाडी बंद करण्याचा डाव आहे असे अनेक विषय सामान्यांच्या हिताचे नाहीत, असे भाषणातून नेत्यांनी सांगितले. निवेदनात, केंद्र शासनाने कामगार विरोधी धोरण बदलावे, असंघटीत कर्मचारी अंगणवाडी सेविका, सहायीका, आशा कामगार, शालेय पोषण आहार शिजविणारे कर्मचारी, ग्रा.पं. कर्मचारी यांना १८ हजार वेतन दिला जावा, नोकरीची शाश्वती देण्यात यावी, पेंशन, ग्रॅच्युईटी, बोनस, जीपीएफ व सामाजिक संरक्षण देण्यात यावे, अंगणवाडीच्या संबंधातील १६ जूनचा परिपत्रक रद्द करावा, विना अट कर्जमाफी द्यावे, धान उत्पादकांना तीन हजार रुपये प्रति क्विंटल किंमत द्यावी, १ आॅक्टोंबरपासून धान खरेदी केंद्र सुरु करावे, धान केंद्रावर तात्काळ पैसा व बारदाना देण्यात यावा, स्वामीनाथन शिफारशी लागू करा, ६० वर्षीय शेतकऱ्यांना पाच हजार पेन्शन द्या, शेतकऱ्यांच्या हिताची पीक विमा सुरु करा आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.मोर्च्यात गजानन लाडसे, राजकुमार बोंद्रे, गौरीशंकर धुमनखेडे, शेवंती खापरीकर, कल्पना झोडे, विजया नंदनवार, नितीन मोहारे, जयप्रकाश मसरके, हेमराज बिरणवार, उमेश दमाहे, संतोष शिदोरे, जयसिंग कस्तुरे, उमेश लिल्हारे, छत्रपती कस्तुरे आदी किसान सभा व आयटकचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.