शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

केंद्र सरकारविरोधात ‘आयटक’चे मोहाडीत आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 21:27 IST

केंद्रातील भाजपचे सरकार विविध पातळीवर अपयशी झाले आहे. आभास, स्वप्नाचा जगात भुरळ पाडण्यात यशस्वी झाली. मोदी सरकारचे धोरण किसान, कामगार, कर्मचारी, मजूर आदींच्या विरोधी आहे. त्या धोरणांचा विरोध करण्यासाठी किसान सभेच्या मागणी दिवसानिमित्त मोहाडी येथे आयटक व किसान सभेच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. मागण्याचे निवेदन तहसीलदार सुर्यकांत पाटील यांच्याद्वारे राष्टÑपती रामनाथ कोविंद यांना पाठविण्यात आले.

ठळक मुद्देशेतकरी मागणी दिवस : तहसीलदारांना सोपविले विविध मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : केंद्रातील भाजपचे सरकार विविध पातळीवर अपयशी झाले आहे. आभास, स्वप्नाचा जगात भुरळ पाडण्यात यशस्वी झाली. मोदी सरकारचे धोरण किसान, कामगार, कर्मचारी, मजूर आदींच्या विरोधी आहे. त्या धोरणांचा विरोध करण्यासाठी किसान सभेच्या मागणी दिवसानिमित्त मोहाडी येथे आयटक व किसान सभेच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. मागण्याचे निवेदन तहसीलदार सुर्यकांत पाटील यांच्याद्वारे राष्टÑपती रामनाथ कोविंद यांना पाठविण्यात आले.अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने दरवर्षी १ सप्टेंबर ‘किसान मागणी’ दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्त संपूर्ण देशव्यापारी शेतकऱ्यांच्या मागण्यांना घेवून मोर्चा, निदर्शने किसान सभेने ठरविले होते. त्या अनुषंगाने शेतकरी, कामगार, कर्मचारी आदींचा मागण्यासाठी किसान सभा व आयटक यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार बाजार मोहाडी येथून मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाचे नेतृत्व किसान सभेचे सचिव माधवराव बांते, सदानंद इलमे, शिवकुमार गणवीर, अल्का बोरकर, गौतमी धवसे, शालू कापसे आदीनी केले.तहसील कचेरीसमोर मोर्च्याचे रुपांतर सभेत करण्यात आले. यावेळी सभेला आयटकचे कार्याध्यक्ष शिवकुमार गणवीर, माधवराव बांते, सदानंद इलमे, अल्का बोरकर यांची भाषणे झाली. भाषणातून भाजपाच्या कामगार विरोधी धोरणाचा समाचार घेण्यात आला. नोटाबंदीने लहान व्यापारी मागे गेले, बेरोजगार नोकरीच्या शोधात आहेत. शेतकरी आत्महत्या करीत आहेत, अंगणवाडी बंद करण्याचा डाव आहे असे अनेक विषय सामान्यांच्या हिताचे नाहीत, असे भाषणातून नेत्यांनी सांगितले. निवेदनात, केंद्र शासनाने कामगार विरोधी धोरण बदलावे, असंघटीत कर्मचारी अंगणवाडी सेविका, सहायीका, आशा कामगार, शालेय पोषण आहार शिजविणारे कर्मचारी, ग्रा.पं. कर्मचारी यांना १८ हजार वेतन दिला जावा, नोकरीची शाश्वती देण्यात यावी, पेंशन, ग्रॅच्युईटी, बोनस, जीपीएफ व सामाजिक संरक्षण देण्यात यावे, अंगणवाडीच्या संबंधातील १६ जूनचा परिपत्रक रद्द करावा, विना अट कर्जमाफी द्यावे, धान उत्पादकांना तीन हजार रुपये प्रति क्विंटल किंमत द्यावी, १ आॅक्टोंबरपासून धान खरेदी केंद्र सुरु करावे, धान केंद्रावर तात्काळ पैसा व बारदाना देण्यात यावा, स्वामीनाथन शिफारशी लागू करा, ६० वर्षीय शेतकऱ्यांना पाच हजार पेन्शन द्या, शेतकऱ्यांच्या हिताची पीक विमा सुरु करा आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.मोर्च्यात गजानन लाडसे, राजकुमार बोंद्रे, गौरीशंकर धुमनखेडे, शेवंती खापरीकर, कल्पना झोडे, विजया नंदनवार, नितीन मोहारे, जयप्रकाश मसरके, हेमराज बिरणवार, उमेश दमाहे, संतोष शिदोरे, जयसिंग कस्तुरे, उमेश लिल्हारे, छत्रपती कस्तुरे आदी किसान सभा व आयटकचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.