शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

केंद्र सरकारविरोधात ‘आयटक’चे मोहाडीत आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 21:27 IST

केंद्रातील भाजपचे सरकार विविध पातळीवर अपयशी झाले आहे. आभास, स्वप्नाचा जगात भुरळ पाडण्यात यशस्वी झाली. मोदी सरकारचे धोरण किसान, कामगार, कर्मचारी, मजूर आदींच्या विरोधी आहे. त्या धोरणांचा विरोध करण्यासाठी किसान सभेच्या मागणी दिवसानिमित्त मोहाडी येथे आयटक व किसान सभेच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. मागण्याचे निवेदन तहसीलदार सुर्यकांत पाटील यांच्याद्वारे राष्टÑपती रामनाथ कोविंद यांना पाठविण्यात आले.

ठळक मुद्देशेतकरी मागणी दिवस : तहसीलदारांना सोपविले विविध मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : केंद्रातील भाजपचे सरकार विविध पातळीवर अपयशी झाले आहे. आभास, स्वप्नाचा जगात भुरळ पाडण्यात यशस्वी झाली. मोदी सरकारचे धोरण किसान, कामगार, कर्मचारी, मजूर आदींच्या विरोधी आहे. त्या धोरणांचा विरोध करण्यासाठी किसान सभेच्या मागणी दिवसानिमित्त मोहाडी येथे आयटक व किसान सभेच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. मागण्याचे निवेदन तहसीलदार सुर्यकांत पाटील यांच्याद्वारे राष्टÑपती रामनाथ कोविंद यांना पाठविण्यात आले.अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने दरवर्षी १ सप्टेंबर ‘किसान मागणी’ दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्त संपूर्ण देशव्यापारी शेतकऱ्यांच्या मागण्यांना घेवून मोर्चा, निदर्शने किसान सभेने ठरविले होते. त्या अनुषंगाने शेतकरी, कामगार, कर्मचारी आदींचा मागण्यासाठी किसान सभा व आयटक यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार बाजार मोहाडी येथून मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाचे नेतृत्व किसान सभेचे सचिव माधवराव बांते, सदानंद इलमे, शिवकुमार गणवीर, अल्का बोरकर, गौतमी धवसे, शालू कापसे आदीनी केले.तहसील कचेरीसमोर मोर्च्याचे रुपांतर सभेत करण्यात आले. यावेळी सभेला आयटकचे कार्याध्यक्ष शिवकुमार गणवीर, माधवराव बांते, सदानंद इलमे, अल्का बोरकर यांची भाषणे झाली. भाषणातून भाजपाच्या कामगार विरोधी धोरणाचा समाचार घेण्यात आला. नोटाबंदीने लहान व्यापारी मागे गेले, बेरोजगार नोकरीच्या शोधात आहेत. शेतकरी आत्महत्या करीत आहेत, अंगणवाडी बंद करण्याचा डाव आहे असे अनेक विषय सामान्यांच्या हिताचे नाहीत, असे भाषणातून नेत्यांनी सांगितले. निवेदनात, केंद्र शासनाने कामगार विरोधी धोरण बदलावे, असंघटीत कर्मचारी अंगणवाडी सेविका, सहायीका, आशा कामगार, शालेय पोषण आहार शिजविणारे कर्मचारी, ग्रा.पं. कर्मचारी यांना १८ हजार वेतन दिला जावा, नोकरीची शाश्वती देण्यात यावी, पेंशन, ग्रॅच्युईटी, बोनस, जीपीएफ व सामाजिक संरक्षण देण्यात यावे, अंगणवाडीच्या संबंधातील १६ जूनचा परिपत्रक रद्द करावा, विना अट कर्जमाफी द्यावे, धान उत्पादकांना तीन हजार रुपये प्रति क्विंटल किंमत द्यावी, १ आॅक्टोंबरपासून धान खरेदी केंद्र सुरु करावे, धान केंद्रावर तात्काळ पैसा व बारदाना देण्यात यावा, स्वामीनाथन शिफारशी लागू करा, ६० वर्षीय शेतकऱ्यांना पाच हजार पेन्शन द्या, शेतकऱ्यांच्या हिताची पीक विमा सुरु करा आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.मोर्च्यात गजानन लाडसे, राजकुमार बोंद्रे, गौरीशंकर धुमनखेडे, शेवंती खापरीकर, कल्पना झोडे, विजया नंदनवार, नितीन मोहारे, जयप्रकाश मसरके, हेमराज बिरणवार, उमेश दमाहे, संतोष शिदोरे, जयसिंग कस्तुरे, उमेश लिल्हारे, छत्रपती कस्तुरे आदी किसान सभा व आयटकचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.