शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचे साखळी उपोषण

By admin | Updated: May 8, 2015 00:45 IST

एलोरा पेपरमिल देव्हाडा येथे दि.१५ मार्च पासून विविध मागण्यांसाठी ७३ कामगारांचे साखळी उपोषण सुरु होते.

भंडारा : एलोरा पेपरमिल देव्हाडा येथे दि.१५ मार्च पासून विविध मागण्यांसाठी ७३ कामगारांचे साखळी उपोषण सुरु होते. परंतु अजनूपर्यंत कंपनी मालकांनी दखल घेतलेली नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कंपनी मालकाविरोधात हल्लाबोलचा इशारा दिला आहे.एलोरा पेपरमिल कंपनीची सन १९७३-७४ मध्ये स्थापना झाली. स्थानिक लोकांना रोजगार मिळावा हा उद्दात हेतू ठेवून देव्हाडा ग्रामपंचायतने १०० एकर जमीन कंपनीला दिली. त्यामुळे कंपनी ४०० स्थानिक लोकांना रोजगार मिळाला. त्यावेळी इन्क्रीमेंट वेतनश्रेणी वाढ, प्रमोशन, घरभाडा, धुलाई भत्ता, रात्रकालीन भत्ता, डस्ट भत्ता, वाहन भत्ता, ओव्हरटाईम या सुविधा वेळोवेळी देण्याचे ठरले होते. परंतु या सगळ्या सुविधांपासून कर्मचारी वंचित राहिले. कंपनी विरोधात आंदोलन करण्याचे प्रयत्न केले असता त्यांना वेळोवेळी काढण्यात आले. आजच्या तारखेत फक्त ७३ कर्मचारी वंचित राहिले. कंपनी विरोधात आंदोलन करण्याचे प्रयत्न केले असता त्यांना वेळोवेळी काढण्यात आले. आजच्या तारखेत फक्त ७३ कर्मचारी कार्यरत असून त्यांच्याकडून ४०० कर्मचाऱ्यांचे कामे करवून घेतले जात आहे. ७३ कर्मचाऱ्यांना उर्वरीत सन २०१३-१४-१५ चा ओव्हरटाईमचा पैसा अद्यापपर्यंत मिळालेला नाही. सन २००४-०८ पर्यंतचा एरियस मिळालेला नाही. न्यायालयात खटला न्याय प्रविष्ठ असताना सुद्धा ५ कर्मचाऱ्यांना सेवेतून काढण्यात आले. त्यांच्या घराचे इलेक्ट्रीक कनेक्शनसुद्धा कंपनीने बंद केले.कंपनी कोटी रुपयांनी फायद्यात असल्यावरही कंपनीमार्फत कंपनी बंद करण्याची धमकी १५ वर्षापासून देत आहे. कंपनी व्यवस्थापन उपोषणकर्त्यांबरोबर चर्चेसाठी व शिष्टमंडळाबरोबर बसण्यास टाळाटाळ करीत असतात अशा उर्मट मालकांची मस्ती उतरविण्यासाठी उपोषणावर बसलेल्या कामगारांना न्याय मिळावा अन्यथा कंपनी मालकाविरोधात कंपनीवर हल्ला बोल करण्याचा इशारा मनसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय शहारे व कार्यकत्यांनी दिला आहे. (नगर प्रतिनिधी)