शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
3
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
4
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
5
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
6
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
7
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
8
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
9
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
10
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
11
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
12
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
13
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
14
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
15
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
16
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
17
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
18
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
19
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
20
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?

पीयूसीविना धावताहेत लाखो वाहने

By admin | Updated: December 23, 2015 00:30 IST

वाढत्या नागरिकरणाने रहदारीची समस्या बळावली आहे. त्यात दिवसेंगणिक वाहनांच्या संख्येने भर घातली असताना प्रदूषणाच्या स्तरातही वाढ होत आहे.

इंद्रपाल कटकवार भंडारावाढत्या नागरिकरणाने रहदारीची समस्या बळावली आहे. त्यात दिवसेंगणिक वाहनांच्या संख्येने भर घातली असताना प्रदूषणाच्या स्तरातही वाढ होत आहे. जिल्ह्यात दोन लाखांच्या घरात वाहनांची संख्या असली तरी वाहन वायु प्रदूषणमुक्त करण्याच्या (पीयूसी) नियमांना नागरिकांनीच ‘खो’ दिला आहे. विशेष म्हणजे एकूण वाहनांपैकी किती वाहनधारकांनी नियमितपणे ‘पीयूसी’ केली आहे, याची रीतसर नोंद आरटीओमध्ये नाही.आपण चालवित असलेल्या वाहनाद्वारे प्रदूषण होत आहे किंवा नाही हे ठरविण्याचे मानक शासनाने जारी केले असले तरी आजही भंडारा जिल्ह्यातील हजारो वाहनधारक ‘पीयूसी’ प्रमाणपत्राविनाच वाहन चालवित आहेत. यासाठी वाहनचालकांच्या मानसिकतेत बदल घडून येणे महत्त्वाचे आहे. आधीच प्रदूषणामुळे मानवी आरोग्याला फटका बसत असताना दुसरीकडे वाहनचालकांकडून नियमांना तिलांजली देण्याचा प्रकार सुरू आहे. ४.१८ लाखांचा दंड वसूलपीयुसी काढल्यानंतर सोबत न बाळगणे अथवा पीयुसी न काढणे या दोन बाबींच्या अनुषंगाने भंडारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने वर्षभरात २,७२० वाहनधारकांची तपासणी केली. यापैकी २५४ वाहनधारकांनी पीयूसी काढली परंतु सोबत बाळगली नसल्याने त्यांच्याकडून १०,६२० हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याशिवाय पीयूसी नसलेल्या ४१७ वाहनधारकांकडून ३ लाख ९८ हजार ५०० रूपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.वाहनसंख्या पाऊणेदोन लाखावर भंडारा जिल्ह्यात एक लक्ष ८२ हजार २८९ वाहनांची नोंद आहे. जिल्ह्यात एकूण १,२१९ आॅटोरिक्षा आहेत. मोटारसायकल १ लाख ५,१००, स्कूटर २६,४८६, मोपेड २०,६७१, मोटारकार ७,६८९, जिप ७,६८९, स्कूल बसेस १५० ट्रक व लॉरी १,११३, टँकर्स ६७, मालवाहतूक चारचाकी गाडी १,७१७, तीन चाकी मालवाहतूक गाडी ५७१, ट्रॅक्टर ८,८३९ आहेत.अद्याप ठोस कारवाई नाही!केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांना पुढे पाठविण्याचे काम प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून होत असते. प्रदूषण नियंत्रणासाठी कोणताही उपक्रम नाही. विशेष म्हणजे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून तपासणी व दंड आकरणी केल्याशिवाय कुठलीच ठोस कारवाई होत नाही. काय म्हणतो ‘पीयृूसी’ कायदा ?केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ च्या नियम ११५ व ११६ नुसार मोटार वाहनांकरिता पेट्रोल ंिधनावर चालणाऱ्या वा डिझेल इंधनावर चालणाऱ्या वाहनाकरिता वायु प्रदूषण प्रमाणपत्र हे बंधनकारक आहे. याकरिता वाहनातून उत्सर्जित होणाऱ्या प्रदूषक घटकाचे प्रमाण कायद्याने निश्चित केले आहे. त्यामुळे वाहन चालकांनी आपल्या वाहन धूर सोडणारे आहे का? याची तपासणी करणे महत्त्वाचे आहे. वाहन रस्यावर चालविण्यापूर्वी प्रदूषण नियंत्रित मर्यादेत असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. याकरिता प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र जारी करण्याऱ्या खाजगी केंद्रांना मोटार वाहन विभागाने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार त्या-त्या ठिकाणी वाहनांच्या प्रदूषणाची तपासणी करून ‘पीयूसी’ प्रमाणपत्र देण्याची तरतुद आहे.नवीन वाहनांकरिता वाहनाचे नोंदणीनंतर एक वर्ष वायु प्रदूषण प्रमाणपत्र आवश्यक नाही. मात्र त्यानुसार निकषानुसार वाहनांची पीयूसी काढणे महत्त्वाचे आहे. एखाद्या वाहनधारकाकडे पीयूसी नसेल तर १००० रूपये व असेल पण सोबत बाळगला नसेल तर १०० रूपये दंड आकारला जातो. मोटार वाहनांद्वारे होणाऱ्या वायु प्रदूषणाबाबतच्या तरतुदी मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १९० तसेच केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ११५ व ११६ मध्ये समाविष्ट आहेत.