शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

लाखोंचा आर्थिक व्यवहार ठप्प

By admin | Updated: March 17, 2015 00:42 IST

जिल्ह्यातील २७० ग्रामीण डाक सेवकांनी सात दिवसांपासून संप पुकारला आहे. यामुळे

भंडारा : जिल्ह्यातील २७० ग्रामीण डाक सेवकांनी सात दिवसांपासून संप पुकारला आहे. यामुळे पोस्ट कार्यालयातील लाखोंचा आर्थिक व्यवहार ठप्प झाला आहे. याचा फटका सुकन्या योजनेवर पडला आहे. संपामुळे नवीन खाते उघडणे बंद करण्यात आले आहे. रेल्वेची परीक्षा दिलेल्या शेकडो परिक्षार्थींचे मुलाखत पत्र व दहावी-बारावीच्या परीक्षार्थींच्या उत्तरपत्रिका डाक कार्यालयात पडून आहेत. यामुळे अनेकांचे जीवन अंधकारमय होणार आहे. टपाल खात्यातील सर्व ग्रामीण भागातील डाक सेवकांनी १० मार्चपासून त्यांच्या विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. यात नागपूर ग्रामीण विभागातील १,१५० ज्यात भंडारा ग्रामीण विभागातील शाखा डाकपाल १२० व १५० पोस्टमनचा समावेश आहे. सात दिवसापासून संप सुरू असल्याने ग्रामीण डाक विभागाशी जुळलेल्या ग्रामस्थांना याचा जबर फटका बसला आहे. या मागणीकडे ना शासनाचे लक्ष गेले ना लोकप्रतिनिधीचे.डाक कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिका डाक कार्यालयात पडून आहेत. या वेळेत बोर्डात पोहचण्यास विलंब होत असल्याने त्याचा निकालावर परिणाम पडणार आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वे विभागाने विविध पदांसाठी परीक्षा घेण्यात आले होते. या परीक्षांचा निकाल लागलेला असून त्यात उत्तीर्ण झालेल्या परिक्षार्थींना रेल्वे प्रशासनाने मुलाखतीचे पत्र पाठविले आहे. हे मुलाखत पत्र डाक कार्यालयात पडून आहेत. परिणामी परिक्षार्थींना वेळेत वितरणासाठी विलंब होत आहे. त्यामुळे शेकडो परिक्षार्थी रेल्वे भरतीपासून वंचित राहण्याची चिन्हे बळावली आहे. पर्यायाने त्यांचे जीवन अंधकारमय होणार असल्याने पालकांची अस्वस्थता वाढलेली आहे. मात्र, संपामुळे नागरिकांचा जीव पूर्णत: मेटाकुटीस आला आहे. उद्या हे तरुण बेरोजगार नोकरीला मुकले तर याला जबाबदार कोण? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. या समस्येकडे शासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे झाले आहे. (शहर प्रतिनिधी)प्रमुख मागण्याग्रामीण डाक सेवकांना केंद्रीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, सातव्या वेतन आयोगाचा लाभ द्यावा, आठ तासाचे काम द्यावे, डाक सेवकांच्या मृतकांना अनुकंपावर नियुक्त करावे, सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती करावी, खात्यातील कर्मचाऱ्याप्रमाणे पदोन्नती वेतन द्यावे.लाखोंचा व्यवहार ठप्पडाक कार्यालयातून रोजगार हमी योजना मजुरांना मजुरी दिली जाते. त्यासोबतच डाक विभागाचे दैनंदिन व्यवहारात मुदत ठेव, मनिआॅर्डर, विद्युत बील, बचत खाते यांच्यासह नव्याने सुरू झालेल्या सुकन्या योजनेला फटका बसला आहे. यातून डाक विभाग रोज लाखोंचा व्यवहार करतो. मात्र, संपामुळे हे सर्व आर्थिक व्यवहार बंद पडले आहे.