शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अखेर मिलर्सनी भरडाईसाठी धानाची केली उचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:49 IST

नोव्हेंबर महिन्यापासून २३ लाख क्विंटल धानाची खरेदी झाली होती. मिलर्सनी आपल्या मागण्यांसाठी भरडाईसाठी धान न उचलण्याचा निर्णय घेतला ...

नोव्हेंबर महिन्यापासून २३ लाख क्विंटल धानाची खरेदी झाली होती. मिलर्सनी आपल्या मागण्यांसाठी भरडाईसाठी धान न उचलण्याचा निर्णय घेतला होता. संपूर्ण गोदाम हाऊसफुल्ल झाले होते. भरडाईसाठी धान जात नसल्याने धान खरेदीचा प्रश्न निर्माण झाला होता. हा प्रश्न सोडविण्यासाठी सुमारे २ महिन्यांपर्यंत वरिष्ठ पातळीवर बैठका घेण्यात आल्या. परंतु अपेक्षित तोडगा निघत नव्हता. त्यामुळे धान खरेदी प्रभावित होऊन शेतकऱ्यांना फटका बसत होता. अनेक धान खरेदी केंद्रावर उघड्यावर धान ठेवण्यात आला होता. अवकाळी पावसाचा फटकाही या धानाला बसला होता. वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊनही मिलर्सचे समाधान होत नव्हते. अखेर राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. शासन आणि मिलर्स यांच्यात योग्य शिष्टाई करून भरडाईचा प्रश्न तात्पुरता निकाली काढला. ३१ मार्चपर्यंत मिलर्सच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले. तोपर्यंत तुम्ही भरडाई करा असे खासदार पटेल यांनी मिलर्सला सांगितले. मिलर्स संघटनेने खासदार पटेल यांच्या शब्दाला मान देत बुधवारपासून भरडाईला प्रारंभ केला. यामुळे जिल्ह्यातील धान भरडाईचा तिढा संपला. आता धानाची उचल होऊन गोदाम खाली होतील आणि खरेदी वेगाने होईल.

या आहेत मिलर्सच्या मागण्या

सीएमआर अंतर्गत केंद्र सरकारच्या अखत्यारीतील खरेदी केंद्रावरील धान उचलून मिलर्सच्या माध्यमातून भरडाई केली जाते. यात केंद्र सरकार भरडाईसाठी ३० रुपये व राज्य सरकार १० रुपये असे ४० रुपये प्रतिक्विंटल मिलर्सना दिले जातात. १०० किलो धानाचा उतारा ६७ किलो तांदूळ बंधनकारक असतो. यात काही टक्के खंडा अर्थात तुकडा तांदूळ समाविष्ट असतो. अशी ही गतवर्षीपर्यंत चालत आलेली पद्धत होती. परंतु मिलर्सचे गत तीन वर्षांपासून भरडाईचे पैसे थकीत होते. काही जाचक अटीही लादल्या होत्या. तसेच भरडाईच्या दरवाढीचीही मागणी होती. यासाठी शासनस्तरावर अनेकदा चर्चाही झाल्यात.

तात्पुरत्या स्वरूपात का होईना काही मिलर्सनी धानाची उचल केली आहे. संपूर्ण जिल्ह्यात सुमारे ९५ टक्के धान खरेदी आटोपली आहे. भरडाईकरिता धान मिलर्सनी उचल केल्याने बाहेर मोजलेल्या धानाला प्रथम प्राधान्य देण्यात येईल. शेतकऱ्यांनी आपल्याकडील धान केंद्रावरच विकावा.

-गणेश खर्चे,

जिल्हा पणन अधिकारी, भंडारा.