शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मध्यम प्रकल्प तळाला, मामा तलावातही पाणीसाठा घटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 15:51 IST

Bhandara : पाणी पातळीत लक्षणीय घट; जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट बळावणार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गत आठवडाभरापासून ऊन-पावसाचा खेळ सुरू असला, तरी दहा ते बारा दिवसांपूर्वी पारा ४४ अंशांवर पोहोचला होता. उष्ण तापमानामुळे जिल्ह्यातील जलस्तरात मोठ्या प्रमाणात घट होण्यास सुरुवात झाली. 

सध्या जिल्ह्याच्या मध्यम आणि लघु प्रकल्पातील जलस्तर तळाला गेलेला असून, माजी मालगुजारी तलावातही पाणी फारच कमी झाले आहे. पाणीपातळीत लक्षणीय घट झालेली आहे. जिल्ह्यात दोन मोठे धरण, मध्यम चार, ३१ लघु प्रकल्प, तर मामा तलाव २८ आहेत. सध्या लघु प्रकल्पातील जलस्तर तळाला पोहोचणार की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मामा तलावात ३२ टक्के जलसाठा आहे. मे महिन्याला आता सुरुवात झाली असल्याने तलाव व लघु प्रकल्पात आवश्यक प्रमाणात पाणी राहणार नाही, अशी चिन्हे आहेत.

जिल्ह्यात वैनगंगासह बावनथडी, चुलबंद, सुर नद्या आहेत. मात्र बावनथडीचा तुमसरातील प्रवास वगळता ही नदी कोरडी आहे. वैनगंगेतही धरणातील पाण्याच्या साठ्यामुळे पाणी मुबलक प्रमाणात आहे. मात्र मोहाडी, तुमसर, साकोली, लाखांदुर व लाखनी परिसरातील नदीचे पात्र कोरडे पडले आहे. हर घर नल ही मोहीम पुर्णतः कार्यान्वित झालेली नाही. परिणामी जिल्ह्यात जलसंकट कायम आहे. 

प्रकल्पांमध्ये पाणीसाठाजिल्ह्यातील मध्यम प्रकल्प असलेल्या चांदपूर, बघेडा, बेटेकर बोथली व सोरणा जलायश प्रकल्पात एकूण उपयुक्त जलसाठा १०.२३३ दलघमी एवढा आहे. ही आकडेवारी १ मे रोजीपर्यंतची आहे. गाव तलावांमध्ये पाणी थोडेफार शिल्लक आहे. डिसेंबर २०२४ पासूनच प्रकल्पांमधील पाणी पातळी झपाट्याने घटली. उन्हाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा यात मोठी घट झाली.

७ तालुकेजिल्ह्यात असुन पाणीटंचाईच्या समस्या कायम आहेत. ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गतही आराखडा तयार करण्यात आला. 

भंडारा शहरासह अन्य शहरांमध्ये पाणीटंचाईभंडारा शहरासह अन्य शहरांमध्ये पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. यात ग्रामीण क्षेत्रही अपवाद नाही. दुसरीकडे नागरिकांना अनियमित पाणीपुरवठा केला जात आहे. यावर्षीसुद्धा ही समस्या कायम आहे. 

नगर पालिका क्षेत्रात टँकरने पाणीपुरवठाभंडारा असो की पवनी अथवा साकोली. येथे काही ठिकाणी आजही टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नवीन वस्ती असलेल्या ठिकाणी पाण्याची टंचाई असल्याने नागरिकांना आवश्यक प्रमाणात पाणीपुरवठा सुरू आहे.

टॅग्स :bhandara-acभंडाराwater scarcityपाणी टंचाई