शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

संतांच्या आशीर्वादात घरीच ध्यानसाधना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 05:01 IST

१५ ऑगस्टपासून सुरू झालेल्या पर्युषण पर्व सप्ताहाची सांगता २२ ऑगस्ट रोजी होणार आहे. सदर आठ दिवसात जैन धर्मीयाच्या श्वेतांबर पंथाअंतर्गत भगवान महावीरांनी दिलेल्या अनमोल वचनांचे व उपदेशांचे वाचन, अनुकरण व पालन केले जाते. या आठ दिवसात प्राप्त केलेल्या सत्कर्माच्या बाबीवरच वर्षभर जैन धर्मीय जीवनयापन करीत असतात.

ठळक मुद्देपर्युषण पर्वाला प्रारंभ : जैन धर्मीयांतर्फे विविध धार्मिक अनुष्ठानाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : क्रोध, मान, माया, लोभ यापासून स्वत:ला परावृत्त करीत क्षमागुण अंगिकारण्याचा योग म्हणजे पर्युषण पर्व होय. या पर्वाला जैन धर्मात अनन्य साधारण महत्व आहे. गत तीन दिवसांपासून सुरू झालेल्या पर्युषण पर्व सप्ताहात जिल्ह्यातील जैन धर्मीय विविध धार्मिक अनुष्ठानाचे आयोजन करीत आहे. विशेष म्हणजे कोरोना संकटकाळामुळे संतांचे आशीर्वाद प्राप्त करीत घरीच ध्यान, साधना व प्रार्थना पूर्ण करीत आहेत.१५ ऑगस्टपासून सुरू झालेल्या पर्युषण पर्व सप्ताहाची सांगता २२ ऑगस्ट रोजी होणार आहे. सदर आठ दिवसात जैन धर्मीयाच्या श्वेतांबर पंथाअंतर्गत भगवान महावीरांनी दिलेल्या अनमोल वचनांचे व उपदेशांचे वाचन, अनुकरण व पालन केले जाते. या आठ दिवसात प्राप्त केलेल्या सत्कर्माच्या बाबीवरच वर्षभर जैन धर्मीय जीवनयापन करीत असतात. यासाठी जैन मुनींचे व संतांनी दिलेल्या वचनांचे पालन केले जाते. पर्युषण पर्वात उपवास, नवकारसी, पतीकमन, प्रार्थना याला विशेष महत्व आहे. जिल्ह्यात श्वेतांबर पंथीय असलेल्या कुटुंबियांची संख्या ४० च्या जवळपास आहे. भंडारा शहरासह जिल्ह्यात पर्युषण पर्वानिमित्त विविध धार्मिक अनुष्ठानांचे आयोजन करण्यात आले आहे.भंडारात दोन संताचे आगमनभंडारा शहरात पर्युषण पर्वानिमित्त दोन संतांचे आगमन झाले आहे. यात संत अक्षय मुनी व दिनेश मुनी यांच्या समावेश आहे. या सप्ताहात त्यांनी दिलेल्या उपदेशांचेही पालन जैन धर्मीय करीत आहेत. यात सायंकाळी ६ वाजतानंतर कुणीही जेवण करीत नाही. सकाळ सत्रात पूजा, मांगलीक पाठ, ध्यान, साधना केली जात आहे. याशिवाय सायंकाळी ६.३० ते ७.३० या कालावधीत ध्यान केले जाते. यात मौन धारण करून भगवान महावीरांचे स्मरण केले जाते. आठ दिवसात ज्यांना जसे शक्य होईल ती व्यक्ती निरंकार उपवास करीत असते. सध्या या संतांचे रामदासी मठात वास्तव्य असून पर्युषण पर्वाच्या समाप्तीनिमित्त ते अनुयायांना विशेष मार्गदर्शनही करणार आहे.पर्युषण पर्व हे जैन धर्मियांसाठी अलौकीक पर्वणी आहे. यात प्रत्येक समाज बांधव भगवान महावीरांनी दिलेल्या उपदेशांचे पालन करून जीवनयापन करण्याचा प्रयत्न करीत असतो. २२ आॅगस्ट रोजी या पर्वाची समाप्ती होणार आहे.- रमेशकुमार जैन, भंडारा.

टॅग्स :Socialसामाजिक