शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

धान शेतीसाठी यांत्रिकीकरण अत्याआवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 5:00 AM

महाराष्ट्र राज्य कृषी विभाग व आत्मा यंत्रणेच्या वतीने भंडारा तालुक्यातील जाख येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन व कृषी संजीवनी सप्ताहात यांत्रिकीकरण योजनेतून धान लागवडीसाठी यांत्रिकीकरण प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण व श्री पद्धतीने धान लागवड प्रात्यक्षिके अधिकाऱ्यांतर्फे दाखवण्यात आली.

ठळक मुद्देहिंदुराव चव्हाण : भंडारा तालुक्यातील जाख येथे प्रात्यक्षिकातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सध्या शेतकऱ्यांना धान शेतीसाठी अधिक खर्च येत असल्याने धानाची शेती परवडेनासी झाली आहे. अनेक कारणांमुळे शेतकरी हतबल होत आहेत. शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत धान शेती फायदेशीर होण्यासाठी विविध पर्याय शोधले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून भातशेतीत यांत्रिकीकरण करणे आज काळाची गरज असून यांत्रिकीकरणाचा वापर शेतीत वाढल्यास धानशेती शेतकऱ्यांना नक्कीच फायदेशीर ठरणार आहे असे मत भंडाराचे जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र राज्य कृषी विभाग व आत्मा यंत्रणेच्या वतीने भंडारा तालुक्यातील जाख येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन व कृषी संजीवनी सप्ताहात यांत्रिकीकरण योजनेतून धान लागवडीसाठी यांत्रिकीकरण प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण व श्री पद्धतीने धान लागवड प्रात्यक्षिके अधिकाऱ्यांतर्फे दाखवण्यात आली.यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, तंत्र अधिकारी आरे साहेब, गणेशपुर प्रोड्यूसर कंपनीचे डॉ. संजय एकापूरे, खर्शीपार मुख्यालयाचे कृषी सहाय्यक आनंद मोहतूरे, यांच्यासह जाख परिसरातील शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांशी बोलताना कृषी सहाय्यक आनंद मोहतुरे यांनी शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणातून धान लागवड केल्यास बियाण्याची बचत होऊन आर्थिक तसेच वेळेची बचत झाल्याने उत्पादनात दुपटीने वाढ होत असून शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असल्याचे सांगितले. यावेळी यांत्रिकीकरण धान लागवडीची प्रात्यक्षिके दाखवली.प्रोडूसर कंपनीचे संजय एकापुरे यांनी ऐन खरीप हंगमात मजुरांचा भासणारा तुटवडा तसेच धान कापणीच्या वेळी ट्रॅक्टर सह मजूर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अनेक शेतकरी धान लागवड यांत्रिकीकरणाने करणार असल्याचे सांगितले.कृषी विभागाच्या वतीने प्रोडूसर कंपनीच्या मदतीने शासनाच्या विविध योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी मिळत असलेल्या कृषि विभाग व शेतकऱ्यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी परिसरातील शेतकरी तसेच स्थानिक पदाधिकारी व कृषी विभागाचे भंडारा तालुक्यातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.मजुरांच्या समस्येवर करता येणार मातकृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना पीक लागवडीच्या तसेच पीक काढणीच्या वेळी मजुरांचा भासणारा तुटवडा यावर मात करण्यासाठी यांत्रिकीकरणाने धान लागवड केल्यास मजुरांच्या तुटवड्यावर मात करता येणार आहे. एकाच वेळी अनेक हेक्टर क्षेत्रावर रोवणी तसेच धानाची मशागत व धान कापणी करणे सहज शक्य असल्याने यांत्रिकीकरणाद्वारे धान लागवड केल्यास शेतकऱ्यांना मजुरांच्या समस्येवर मात करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे . त्यामुळे हा आधुनिक प्रयोग पाहण्यासाठी अनेक शेतकरी जमा झाले होते.

टॅग्स :agricultureशेती