शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

मांगलीबांध जलाशय बनू शकतो पर्यटनाचा केंद्रबिंदू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 5:00 AM

मांगली बांध आकर्षक व निसर्गरम्य वाटत आहे. बांधाच्या काठावरच श्रीरामाचे व हनुमंताचे मंदिर असून हिरवीगार वनराई डोळ्यांचे पारणे फेडते. रामनवमीला वर्षातून एकदा भव्य यात्रा भरत असते. जिल्ह्यातून भाविक, निसर्गप्रेमी या ठिकाणी गर्दी करतात. वड, चिंच, करंजी, आंबा हे विस्तीर्ण वनराई सुशोभित आकर्षक दिसत आहे. फळांची, फुलांची झाडे मंदिराच्या अगदी समोरासमोर देखण्या रूपात दिमाखात उभी आहेत.

ठळक मुद्देरात्रीला होते प्राण्यांचे दर्शन : काठावरच वसले हनुमंताचे मंदिर

मुखरू बागडे।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : निसर्गाच्या मुक्तहस्ताने उधळण ठरलेलं लाखनी तालुक्यातील मांगलीबांधचे नयनरम्य जलाशय पर्यटकांसाठी आवडते ठिकाण आहे. या परिसराच्या विकासावर अधिक भर देण्याची गरज निर्माण झाली आहे.या तलावात उन्हाळ्याच्या दाहकतेत तरुण मंडळी पोहण्याचा आनंद घेत असतात. तलावाशेजारी टेकड्या आहेत. ४८४ एकरात या तलावातून भात शेतीच्या सिंचन केले जाते आणि दरवर्षाला एक लक्ष रुपयांची मत्स्य शेती यातून निर्मिती केली जाते. या तलावात आजही वीस फूट पाणी आहे.वन विभागाचे या निसर्गरम्य वातावरणात नियंत्रण आहे. वन्यप्राण्यांची शिकार होऊ नये याकरिता वनविभागाचे कर्मचारी कर्तव्यरत आहेत. पर्यटन क्षेत्रांतर्गत जिल्हा परिषद सदस्य विनायक बुरडे यांनी या मंदिराचा शासकीय निधी अंतर्गत कायापालट करून रुबाबदार देखणा व पर्यटनासाठी मांगली बांध पात्र ठरला आहे.मांगली बांध आकर्षक व निसर्गरम्य वाटत आहे. बांधाच्या काठावरच श्रीरामाचे व हनुमंताचे मंदिर असून हिरवीगार वनराई डोळ्यांचे पारणे फेडते. रामनवमीला वर्षातून एकदा भव्य यात्रा भरत असते. जिल्ह्यातून भाविक, निसर्गप्रेमी या ठिकाणी गर्दी करतात. वड, चिंच, करंजी, आंबा हे विस्तीर्ण वनराई सुशोभित आकर्षक दिसत आहे. फळांची, फुलांची झाडे मंदिराच्या अगदी समोरासमोर देखण्या रूपात दिमाखात उभी आहेत.सरपंच प्रशांत मासूरकर व आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली गावातीलच तीन तरूणांना या मंदिरात क्वारंटाईन केले आहे. परिसराबाबत ज्येष्ठ नागरिक गजानन मानकर यांनी अभ्यासात्मक माहिती दिली.रात्रीच्या सुमारास वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी मांगलीबांध तलावात गर्दी करतात. संपूर्ण भंडारा जिल्ह्यात मांगली बांध हे परीचीत असून पर्यटनाच्या दृष्टीने अधिक लक्ष पुरविल्यास निश्चितच भविष्यात मोठे पर्यटन क्षेत्र उदयाला येऊ शकतो, यात शंका नाही.या तलावाशेजारी जंगलात मोर, लांडोर, बगळा, विदेशी पक्षी तसेच प्राण्यात वाघ हिरण नीलगाय अस्वल रानडुक्कर रानकुत्रे अशी विविध जातीचे प्राणी मुक्त संचार करीत आहेत. या जलाशयाचे व विस्तीर्ण वनराईचे सदस्य आहेत.मांगली बांध खासगी मालकीचे जलाशय असून या ठिकाणाहून भातशेतीला सिंचन करण्यात आले. वन्यप्राण्यांसाठी हा जलाशय अत्यंत महत्त्वाचा आहे. पर्यटन विकास अंतर्गत शासनाने व प्रशासनाने तसेच लोकप्रतिनिधींनी लक्ष घातल्यास पर्यटन स्थळाएवढे महत्त्व येऊ शकते.-प्रशांत मासूरकर,सरपंच, मांगलीबांध.

टॅग्स :tourismपर्यटन