शहरं
Join us  
Trending Stories
1
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
2
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
3
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
4
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
5
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
6
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
7
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
8
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
9
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
10
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
11
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
12
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
13
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
14
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
15
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
16
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
17
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
18
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
19
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
20
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं

‘दळणातही स्वत:ला दळतात बाया’

By admin | Updated: April 1, 2017 00:39 IST

कविता हा समाजमनाचा आरसा असतो. त्यात आपले प्रतिबिंब स्पष्टपणे दिसून येते.

स्वत:हून स्वत:ला वगळतात महिला : लाखनीत रंगले वासंतिक कविसंमेलनलाखनी : कविता हा समाजमनाचा आरसा असतो. त्यात आपले प्रतिबिंब स्पष्टपणे दिसून येते. तसेच अंतरातील दु:ख, वेदना, क्रोध, आवेशही आपापली पटले उघडत जातात. अर्थात थोडक्यात सांगायचेच झाल्यास अत्यंत कमी आणि भावगर्भ शब्दात मांडली जाणारी शब्दकृती म्हणजे कविता होय, त्याच कवितांचा सोहळा म्हणजे कविसंमेलन.गुढी पाडव्याचे औचित्य साधून अशाच प्रकारच्या कविसंमेलनाची वि.सा. संघ लाखनीच्या वतीने २९ वर्षापूर्वी मुहूर्तमेढ करणारे द.सा. बोरकर आज ह्यात नसले तरी त्यांनी आरंभ केलेल्या परपंरेनुसार स्व. रोकडे यांच्या स्मृतीस समर्पित असलेले कविसंमेलनच्या अध्यक्षस्थानी जयकृष्ण बावनकुळे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून झाडीबोली साहित्य संमेलनाचे यंदाचे अध्यक्ष नरेश देशमुख, महेश रोकडे व ज्ञा. म. नेवार यांची उपस्थिती लाभली होती. एकापेक्षा एक सरस व भावपूर्ण कवितांनी भावविभोर करणाऱ्या ह्या कविसंमेलनात सामाजिक राजकीय, प्रेम, आत्मकथन व विद्रोही स्वरुपाच्या कविता सादर करण्यात आल्या. ह्यात महिला सक्षमीकरणाच्या काळातही महिलांवर होणारे अत्याचार कुटुंबात व समाजातही होणारी त्यांची हेडसांड आणि दैनंदिन व्यवहारात होणारी त्यांची कुंचबना आपल्या कवितेतून विषद करतानी प्रा. डॉ. अनिल नितनवरे म्हणाले, दळणातही स्वत:ला दळतात बायास्वत:तून स्वत:ला वगळतात बायाझाडही न सोडी पिकल्याशिवाय पानेऐन बहरात अशा गळतात बायास्व विसरलेल्या महिलांच्या या भाव विवश आगनिकतेनंतर कवी राम महाजन, दयाराम बगमारे, दौलत पठान, दिनेश पंचबुद्धे, दुरूगकर, प्रतिक्षा कापगते, प्रा. डॉ. अल्का सोरदे यांच्या कवितांनाही श्रोत्यांनी मनमोकळी दाद दिली तर मृणाल शिवनकरच्या कवीतेने दाद मिळविली. शेतकऱ्यांच्या संघर्षशिल जिवनाची व्यथा प्रसंगी शेतीत राबता, राबताच शेतीत होणारा त्याचा शेवट कथन करून त्याच्या उद्धाराचे कार्य कोणी तरी करायला पाहिजे असा आशावाद व्यक्त केला तोच धागा पकडून मनोज बारसागडे यांची माझा शेतकरी ही कविता व नरेंद्र नागदेवे, निकेत हुमणे, डॉ. हेमकृष्ण कापगते, अस्मिता मेश्राम, सारीका दोनोडे यांच्या कविताही उल्लेखनीय ठरल्या. दाहक सामाजिक वास्तव मांडून समाजाच्या अधपतनास कारणीभूत घटक आणि आपण विसरत चाललेली सामाजिक बांधिलकी यामुळे होणाऱ्या परिणामाला तोंड देण्यासाठी समाजानेच भानावर यायला हवे अशी आशय कविता सादर केली. त्याचप्रमाणे डॉ. हरीश्चंद्र बोरकर, नामदेव कानेकर, संत डोमा कापगते, दिवाकर मोरकर, महेश रोकडे, सुधांशु धकाते यांच्या बहारदार कविता नंतर प्रल्हाद सोनवाने यांनी हिंडतो वेड्यापरी या वैन गंगेच्या तिरी जीव झाला बासरी या वैनगंगेच्या तिरी ही गजल सादर करून नैसर्गीक सामर्थ्याने नटलेले वैनातिर व तेथील समाजमनाचे सांगोपन चित्र चितारले तर तुलसीदास चौधरी यांच्या मला भेटले ते भिकाऱ्या प्रमाणे, तरी वार केले शिकाऱ्याप्रमाणे, जिथे माणसांची अरे कार्यशाळा, तिथे दंभ चाले निखाऱ्याप्रमाणे. या ओळींनी सामाजिक दांभीकतेवर प्रहार करीत सामाजिक वंटपणा व नात्यामधील कटूता समर्थक शब्दात उलगडून दाखिविली. बाबुराव निखाडे यांनी काय सांगू कस सांगू माणसाची व्यथा या आम्ही मानो मुक्तपणे जीवनाची कथा हा या कवितेने श्रोत्यांच्या मणधरणीस कविसंमेलनाचे दडपण थोड हलके केले. अध्यक्ष रामकृष्ण बावनकुळे व संचालन अक्षय मासूरकर व योगेश बोरकर यांनीही याप्रसंगी आपापल्या कविता सादर केल्या आहेत. (शहर प्रतिनिधी)