शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
4
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
5
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
6
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
7
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
8
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
9
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
10
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
11
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
12
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
13
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
14
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
15
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
16
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
17
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
18
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
19
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
20
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...

मालगुजारी तलावाचे अस्तित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2016 01:20 IST

जलव्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या माजी मालगुजारी तलावाची वेळोवेळी देखभाल दुरुस्ती करण्यात आली नाही.

आरोग्य धोक्यात : प्रशासनाचे उदासीन धोरण, दुर्गंधीयुक्त वातावरणविशाल रणदिवे अड्याळ जलव्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या माजी मालगुजारी तलावाची वेळोवेळी देखभाल दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे गोंडराजाच्या काळात बांधण्यात आलेल्या माजी मालगुजारी तलावाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. या तलावाचा उपयोग शेती उत्पादनासोबतच मासेमारी, सिंगाडे उत्पादन, जनावरांना पिण्याचे पाणी, कपडे दुधे आदी कामासाठी हे तलाव उपयुक्त होते. मामा तलाव निर्मिती करणाऱ्यांनी दूरदृष्टिकोन ठेऊवूाच यांची निर्मिती केली. मात्र आधुनिकी करणाच्या नावाखाली होत असलेला सरकारचा दुर्लक्षीतपणा यामुळे या तलावांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. मोठे सिंचन प्रकल्प तयार करण्याच्या मानसिकतेतुन या तलावावर दुरुस्ती करण्यात आली नाही. मागील कित्येक वर्षापासुन गोसे प्रकल्प, नेरला उपसा सिंचन पुर्णत्वास आणण्याचे काम सुरु आहे आणि त्यासाठी शेकडो, हजारोंच्या संख्येत कामगार वर्ग काम करीत आहेत. परंतु पुर्ण आजही झाले नाही. या गोसे प्रकल्पामुळे व नेरला उपसा सिंचनामुळे शेतजमीनीला सिंचन उपलब्ध होणार आहे. अड्याळ व परिसरात जेव्हा जेव्हा शेतजमीनीला एका पाण्याची गरज भासते तेव्हा या मामा तलावाची गरज भासते. ते काही प्रमाणात पुर्णही होते. शेतकऱ्यांचाही दुर्लक्षा होत असला तरी पदाधिकारी, समाजसेवक, नेतेमंडळी कुणीतरी याकडे लक्ष द्यायला पाहिजे. प्रकल्प जेव्हा पूर्ण होणार तेव्हा लाभ होणारच पंरतु जो आहे जो कधीही कुणाच्याही कामात पडू शकतो त्याकडे दुर्लक्ष करणे बरोबर नाहीच!अड्याळ येथील बाजार ग्राउंडकडे जाणाऱ्या मार्गाच्या बाजुकडील हा तलाव दुर्गंधीयुक्त आहे. शाळेत जाणारे विद्यार्थी व सभोवताल राहणारे ग्रामस्थ या दुर्गंधीचा रोजच त्रास सहन करवा लागतो. कित्येक वर्षापासुन मूर्तीचे विसर्जन होत असते. परंतु आजपावेतो या तलावातील गाळ उपसण्यात आला नाही. आजुबाजुला आता पक्के घरे बनली पंरतु त्या तलावाची सिमा रेषा रेकार्डवर दिसते प्रत्यक्षात दिसत नाही. याचे एकमेव कारण म्हणजे दुर्लक्ष. प्रशासनाला तेथील पदाधिकाऱ्याचे दुर्लक्ष होत आहे. अड्याळमध्ये या तलावांची संख्या चार आहे. यावर जिल्हा परिषदेचे हक्क असल्याचे बोलले जाते. परंतु याची सीमारेषा नसल्यामुळे येथेही अतिक्रमण आल्यासारखेच आहे. जिल्हा परिषदेने याकडे गांभीर्याने लक्ष घालुन ज्या तलावाची स्थिती दयनीय आहे किंवा ज्या तलावामुळे तेथील दुर्गंधीमुळे ग्रामस्थाचें आरोग्य धोक्यात आले आहे. अशा तलावातील गाट उपसा करणे, साफसफाई करणे, सुशोभीकरण करणे महत्त्वाचे झाले आहे. त्यामुळे या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.