शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मालगुजारी तलावाचे अस्तित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2016 01:20 IST

जलव्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या माजी मालगुजारी तलावाची वेळोवेळी देखभाल दुरुस्ती करण्यात आली नाही.

आरोग्य धोक्यात : प्रशासनाचे उदासीन धोरण, दुर्गंधीयुक्त वातावरणविशाल रणदिवे अड्याळ जलव्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या माजी मालगुजारी तलावाची वेळोवेळी देखभाल दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे गोंडराजाच्या काळात बांधण्यात आलेल्या माजी मालगुजारी तलावाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. या तलावाचा उपयोग शेती उत्पादनासोबतच मासेमारी, सिंगाडे उत्पादन, जनावरांना पिण्याचे पाणी, कपडे दुधे आदी कामासाठी हे तलाव उपयुक्त होते. मामा तलाव निर्मिती करणाऱ्यांनी दूरदृष्टिकोन ठेऊवूाच यांची निर्मिती केली. मात्र आधुनिकी करणाच्या नावाखाली होत असलेला सरकारचा दुर्लक्षीतपणा यामुळे या तलावांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. मोठे सिंचन प्रकल्प तयार करण्याच्या मानसिकतेतुन या तलावावर दुरुस्ती करण्यात आली नाही. मागील कित्येक वर्षापासुन गोसे प्रकल्प, नेरला उपसा सिंचन पुर्णत्वास आणण्याचे काम सुरु आहे आणि त्यासाठी शेकडो, हजारोंच्या संख्येत कामगार वर्ग काम करीत आहेत. परंतु पुर्ण आजही झाले नाही. या गोसे प्रकल्पामुळे व नेरला उपसा सिंचनामुळे शेतजमीनीला सिंचन उपलब्ध होणार आहे. अड्याळ व परिसरात जेव्हा जेव्हा शेतजमीनीला एका पाण्याची गरज भासते तेव्हा या मामा तलावाची गरज भासते. ते काही प्रमाणात पुर्णही होते. शेतकऱ्यांचाही दुर्लक्षा होत असला तरी पदाधिकारी, समाजसेवक, नेतेमंडळी कुणीतरी याकडे लक्ष द्यायला पाहिजे. प्रकल्प जेव्हा पूर्ण होणार तेव्हा लाभ होणारच पंरतु जो आहे जो कधीही कुणाच्याही कामात पडू शकतो त्याकडे दुर्लक्ष करणे बरोबर नाहीच!अड्याळ येथील बाजार ग्राउंडकडे जाणाऱ्या मार्गाच्या बाजुकडील हा तलाव दुर्गंधीयुक्त आहे. शाळेत जाणारे विद्यार्थी व सभोवताल राहणारे ग्रामस्थ या दुर्गंधीचा रोजच त्रास सहन करवा लागतो. कित्येक वर्षापासुन मूर्तीचे विसर्जन होत असते. परंतु आजपावेतो या तलावातील गाळ उपसण्यात आला नाही. आजुबाजुला आता पक्के घरे बनली पंरतु त्या तलावाची सिमा रेषा रेकार्डवर दिसते प्रत्यक्षात दिसत नाही. याचे एकमेव कारण म्हणजे दुर्लक्ष. प्रशासनाला तेथील पदाधिकाऱ्याचे दुर्लक्ष होत आहे. अड्याळमध्ये या तलावांची संख्या चार आहे. यावर जिल्हा परिषदेचे हक्क असल्याचे बोलले जाते. परंतु याची सीमारेषा नसल्यामुळे येथेही अतिक्रमण आल्यासारखेच आहे. जिल्हा परिषदेने याकडे गांभीर्याने लक्ष घालुन ज्या तलावाची स्थिती दयनीय आहे किंवा ज्या तलावामुळे तेथील दुर्गंधीमुळे ग्रामस्थाचें आरोग्य धोक्यात आले आहे. अशा तलावातील गाट उपसा करणे, साफसफाई करणे, सुशोभीकरण करणे महत्त्वाचे झाले आहे. त्यामुळे या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.