शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
5
२ हेल्थ इन्शुन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
6
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
7
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
8
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
9
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
10
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
11
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
12
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
13
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
14
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
15
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
16
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
17
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
18
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
19
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
20
गावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी

वंचितांच्या आयुष्यात संपन्नता आणा

By admin | Updated: April 9, 2015 00:38 IST

वंचित, दुर्बल घटकांना समान न्याय मिळावा, त्यांच्यापर्यंत शिक्षणाच्या, विकासाच्या आणि आर्थिक संपन्नतेच्या संधी पोहोचाव्या, ..

सामाजिक सप्ताहाचा शुभारंभ : जिल्हाधिकारी खोडे यांचे प्रतिपादन भंडारा : वंचित, दुर्बल घटकांना समान न्याय मिळावा, त्यांच्यापर्यंत शिक्षणाच्या, विकासाच्या आणि आर्थिक संपन्नतेच्या संधी पोहोचाव्या, यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी संवेदनशीलपणे काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने सामाजिक समता सप्ताह बुधवारपासून १४ एप्रिलपर्यंत राबविण्यात येत आहे. या सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या सप्ताहाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समाज कल्याण सहायक आयुक्त डी.एन. धारगावे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी ए.आर. रामटेके उपस्थित होते.समाजाच्या विशिष्ट घटकातील लोकांप्रती अजूनही चांगली भावना जनतेमध्ये दिसत नाही. या सप्ताहाच्या माध्यमातून सर्व समाजामध्ये सद्भावना आणि समता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केले.राज्य घटनेतील कलम ४६ मधील निर्देशांची अंमलबजावणी व्यवस्थितपणे करून राज्यातील अनुसूचित जाती, जमाती आणि वंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगिण विकासाचे ध्येय ठेवून सामाजिक न्याय विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहे. या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताह साजरा करण्याचा निर्णय शासनाने यावर्षीपासून घेतलेला आहे. या सप्ताहात विविध महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या कर्जाचे लाभार्थ्यांना वाटप, रक्तदान शिबिराचे आयोजन तसेच व्यसनमुक्तीसाठी प्रचार व प्रसिद्धी आदी कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त डी.एन. धारगावे यांनी केले. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, वीज वितरणचे अधीक्षक अभियंता सतीश मेश्राम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आडे तसेच विभागप्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)