शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियानात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
5
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
6
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
7
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
8
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
9
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
10
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
11
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
12
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
13
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
14
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
15
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
16
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
17
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
18
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
19
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
20
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई

स्थायी करा अथवा मरण द्या!

By admin | Updated: January 18, 2017 00:18 IST

वारंवार पत्र व्यवहार, आंदोलने व मागणीकरूनही राज्य शासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले.

एल्गार वनमजुरांचा : एफडीसीएम कार्यालयासमोर सुरू केले आमरण उपोषणभंडारा : वारंवार पत्र व्यवहार, आंदोलने व मागणीकरूनही राज्य शासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. आता न्याय पालिकेने न्याय दिल्यावरही त्याची अंमलबजावणी होत नसेल तर किमान मरण तरी द्यावे, अशी करूण हाक रोजंदारी वनमजुरांनी केली आहे. येथील सामाजिक वनीकरण कार्यालयासमोर आजपासून या वनमजुरांनी कुटूंबियासह आमरण उपोषण सुरू केले असून शासन सेवेत स्थायी करा, अशी त्यांची मुख्य मागणी आहे.या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य वन व सामाजिक वनीकरण रोजंदारी मजुर कामगार संघटना करीत आहे. विशेष म्हणजे भंडारा जिल्ह्यातील विविध वनक्षेत्रातील १३ वनमजुरांना स्थायी करण्यासंदर्भात त्यांचा संघर्ष सुरू आहे. यासंदर्भात औद्योगीक न्यायालयाने (भंडारा बेंच) १७ डिसेंबर २०१६ रोजी या वनमजुरांना स्थायी करण्यासंदर्भात आॅर्डर दिल्याचे आदेश आहेत. परंतु याची अंमलबजावणी सन २०१२ पासून करावयाची असतानाही या वनमजुरांना स्थायी करण्याचे सोडा त्यांना तात्पुरत्या स्वरूपातही कामावर घेण्यात टाळाटाळ केली जात आहे. संघटनेच्या माध्यमातून बारमाही असलेल्या १४ वनमजुरांनी संदर्भीय पत्र तथा वैयक्तीक पत्र यानुसार सामाजिक वनीकरण विभागाकडे बारमाही वनमजूर म्हणून कामावर रूजू करून शासन सेवेत कायम करण्याबाबतची मागणी केली होती. तसेच याबाबत निर्णय घेतल्यानंतर त्याची माहिती संघटनेला कळविण्यात यावी, असेही अहवालांतर्गत मागविण्यात आले होते. सदर वनमजुरांना कामावर सुद्धा रूजू करून घेण्यात आले नाही. परिणामी या वनमजुरांसमोर उदरनिर्वाहाचा ज्वलंत प्रश्न निर्माण झाला आहे. जीवन जगावे तरी कसे ही समस्या उभी ठाकली असताना सामाजिक वनीकरणाचे वरिष्ठ अधिकारी या वनमजुरांना स्थायी करण्यासंदर्भात टाळाटाळ करीत असल्याचेही संघटनेचे म्हणणे आहे.वारंवार विनंतीकरूनही वनमजुरांसह संघटनेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने या १३ वनमजुरांनी कुटूंबियासमवेत आमरण उपोषण करण्याचा मानस व्यक्त केला होता. दरम्यान आज मंगळवारपासून राष्ट्रीय महामार्गावर स्थित एफडीसीएम कार्यालयासमोर या वनमजुरांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषण मंडपात संघटनेचे जिल्हाध्यक्ष युवराज रामटेके, वनमजुर गणपत कोडापे, मधुकर चौधरी, ओमप्रकाश दोनोडे, गजेंद्र खडसे, रमेश लांजेवार, भोजराम फंदे, कविराज लांजेवार, नागो मेंढे, राजकुमार मते, अनिराम कावळे, जयगोपाल खेडीकर, परसराम टिचकुले, महेंद्र भैसारे यांच्यासह त्यांच्या कुटूंबियातील महिला व मुलेही उपोषणात सहभागी झाली आहेत. (प्रतिनिधी)कित्येक वर्षांपासून वनमजुरांचा संघर्ष सुरू आहे. महाराष्ट्र राज्य वन व सामाजिक वनीकरण रोजंदारी मजुर कामगार संघटनेच्या वतीने सातत्याने वनमजुरांच्या समस्या रेटून धरले आहेत. विभागीय व्यवस्थापकासह नागपुरातील वरिष्ठांनाही या वनमजुरांची व्यथा व दशा चांगली ठाऊक आहे. असे असतानाही त्यांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. उल्लेखनीय म्हणजे औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानंतरही शासन कुठल्या आदेशाची वाट बघत आहे हे एक न उलगडणारे कोडे आहे. वनमजुरांना तात्काळ स्थायी नौकरीत सामावून घेण्याची गरज आहे.-युवराज रामटेके, अध्यक्ष, राज्यवन, साामाजिक वनीकरण रोजंदारी मजुर कामगार संघटना.यासंदर्भात महाव्यवस्थापक टी.के. चौबे यांनी कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. पाच महिने थांबा सर्वांना कामावर घेण्यात येईल. आमची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे.-गणपत कोडापे, वनमजूर, तालुका लाखनी