शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

Maharashtra Election 2019 ; पाच वर्षात दुप्पट विकास कामे केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 6:00 AM

धानाला दरवर्षी बोनस देणारे युती सरकार असून यापुढेही धानाला योग्य बोनस दिला जाईल. भंडारा जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण केले असून पुनर्वसनासाठी भरीव निधी दिला. गोसे प्रकल्पाच्या सिंचन क्षमतेत वाढ करण्यात आली. पाच वर्षात आठ हजार हेक्टरवरून ५८ हजार हेक्टरवर सिंचन क्षमता नेली.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस । भंडारा येथे प्रचारसभेचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पाच वर्षात सगळ्या समस्या सुटल्या असा दावा आमचा नाही, मात्र काँग्रेस - राष्ट्रवादीने पंधरा वर्षात केले नाही ते आम्ही पाच वर्षात दुप्पट करून दाखविले. आमचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम उभे राहिले. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासासाठी महायुतीला साथ द्या, पुढच्या पाच वर्षात चेहरा-मोहरा बदलून दाखवू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.भंडारा येथील दसरा मैदानावर शनिवारी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी उर्जामंत्री तथा भाजपचे पूर्व विदर्भ प्रचार प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे, खासदार सुनील मेंढे, म्हाडाचे सभापती तारीक कुरैशी, नगरपरिषद उपाध्यक्ष आशू गोंडाणे आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, काँग्रेस - राष्ट्रवादीने १५ वर्षात २० हजार कोटींची कर्जमाफी दिली. आमच्या सरकारने पाचच वर्षात ५० हजार कोटींची कर्जमाफी दिली. ५० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत कर्जमाफी सुरुच राहील असे सांगितले.धानाला दरवर्षी बोनस देणारे युती सरकार असून यापुढेही धानाला योग्य बोनस दिला जाईल. भंडारा जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण केले असून पुनर्वसनासाठी भरीव निधी दिला. गोसे प्रकल्पाच्या सिंचन क्षमतेत वाढ करण्यात आली. पाच वर्षात आठ हजार हेक्टरवरून ५८ हजार हेक्टरवर सिंचन क्षमता नेली. ती लवकरच एक लाख हेक्टर करणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, भंडारा शहराच्या पाणीपुरवठा योजनेसह विविध विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला.प्रत्येकाला घर देण्याचे उद्दिष्ट असून २०२१ पर्यंत एकही व्यक्ती राज्यात बेघर राहणार नाही. प्रत्येक घरात वीज, पाणी, गॅस, शौचालय सुविधा दिल्या आणि यापुढे देण्यात येतील.शेतकºयांकडे जमीन होती, मात्र मालकी सरकारची होती. शेतकरी भोगवटदार क्रमांक दोन होते. आमच्या सरकारने कायदा करून भूमीधारी शेतकºयांना भूस्वामी केले. त्याचा फायदा शेकडो शेतकºयांना झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बचतगटांच्या माध्यमातून ४० लाख कुटुंब जोडले आहेत. यापुढे बचत गटांसोबत एक लाख कुटुंब जोडले जातील. बचत गाटांच्या महिलांना एक लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देऊन महिलांना सक्षम करण्यात येणार आहे.भंडाराजिल्ह्यात मकरधोकडा येथे दीड हजार कोटी गुंतवणुकीचा इथेनॉल प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पामुळे शेतकºयांना तणसापासून पैसा मिळेल आणि दहा हजार तरुणांना रोजगार मिळेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. भंडारा शहरासोबत जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलून दाखवू. त्यासाठी तुमची साथ हवी आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणले.माझ्यावर अन्याय झाला नाही - चंद्रशेखर बावनकुळेभाजपने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला भरभरुन दिले. जिल्हापरिषद सदस्य, आमदार, मंत्री, पालकमंत्री पदे दिली. पूर्व विदर्भाच्या ३२ मतदार संघाच्या प्रचाराची मोठी जबाबदारी माझ्यावर सोपविली. माझ्यावर कोणताही अन्याय झाला नाही. केवळ अफवा पसरविल्या जातात. त्यावर विश्वास ठेवू नका असे आवाहन उर्जामंत्री चंद्रशेखर बावनुळे यांनी केले.

टॅग्स :bhandara-acभंडाराDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस