शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व विदर्भातील प्रकल्पांमध्ये अत्यल्प जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 12:43 IST

पर्जन्यमानात आघाडीवर असणाऱ्या पूर्व विदर्भातील प्रकल्पांमध्ये यावर्षीच्या मान्सून सत्रात अत्यल्प पाणीसाठा आहे. एकट्या भंडारा जिल्ह्यात ६३ प्रकल्पांतर्गत ३६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.

ठळक मुद्देदमदार पावसाची प्रतीक्षा ३६ टक्के पाण्याने भागणार कसे?

लोकमत न्यूज नेटवर्कइंद्रपाल कटकवारभंडारा : पर्जन्यमानात आघाडीवर असणाऱ्या पूर्व विदर्भातील प्रकल्पांमध्ये यावर्षीच्या मान्सून सत्रात अत्यल्प पाणीसाठा आहे. एकट्या भंडारा जिल्ह्यात ६३ प्रकल्पांतर्गत ३६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. परिणामी पावसाने दगा दिल्यास नागरिकांसह शेतीलाही याचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे.पूर्व विदर्भातील भंडारा व गोंदिया जिल्ह्यात तलावांची मोठी संख्या आहे. अडीच हजारांपेक्षा जास्त तलाव असले तरी त्यात माजी मालगुजारी तलावांची अवस्था हवी तेवढी चांगली नाही. पावसाळ्यात तलावांसह बोड्या व प्रकल्पांमध्ये पाणी साठवणूक होत असते. यावर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र, त्यानंतर ेपावसाने पाठ फिरविल्यामुळे प्रकल्पांमध्येही पाणी साठा होवू शकला नाही. भंडारा जिल्ह्यातील जीवनदायीनी समजल्या जाणाऱ्या वैनगंगा नदीत मध्यप्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागात बरसणाऱ्या पावसाचे पाणी धरणांमार्फत सोडले जाते. यावर्षी मात्र तशी स्थिती ओढवली नाही. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सरासरी १९ टक्के पाऊस कमी झाला.भंडारा जिल्ह्यात ६३ प्रकल्प असून त्यात चार मध्यम प्रकल्प, ३१ लघु प्रकल्प तर २८ माजी मालगुजारी तलाव आहेत. हे सर्व प्रकल्प लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येत असून वन व अन्य विभागांच्या हद्दीत असलेल्या तलावांची संख्या वेगळी आहे.पावसाने दगा दिल्यामुळे सद्यस्थितीत मध्यम प्रकल्पांमध्ये ३० टक्के तर लघु प्रकल्पात ३९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. दोन महिने पूर्ण झाल्यावरही जिल्ह्यातील प्रकल्पांनी निम्मी टक्केवारीही ओलांडलेली नाही. पाऊस नसल्यामुळे रोवणी व धान पीकाकरिता पहिल्यांदाच बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडण्यात येणार आहे.धरणाची स्थितीही चिंताजनकभंडारापेक्षा गोंदिया जिल्ह्यात धरणांची संख्या अधिक असली तरी दोन्ही जिल्ह्यात पर्जन्यमानाचे प्रमाण यावर्षी कमी आहे. परिणामी गोंदिया जिल्ह्यातील ईटियाडोह, सिरपूर, कालीसराड, धापेवाडा, वैनगंगा देवरी आदी धरण क्षेत्रात अपेक्षित जलसाठ्यापेक्षा पाण्याची टक्केवारी कमी आहे. याशिवाय मध्यप्रदेशातील संजय सरोवरात ४१० दलघमी जलसाठा अपेक्षित असताना आजघडीला फक्त १९८ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. महत्वाकांक्षी गोसीखुर्द धरणात ११४६ दलघमी जलसाठा अपेक्षित असताना १८८.०४ पाणीसाठा उपलब्ध आहे. या दोन्ही धरणांची टक्केवारी अनुक्रमे ४८ व २५ अशी आहे. सद्यस्थितीत भंडारा शहराच्या हाकेवर असलेल्या वैनगंगा नदीची पातळी ५.१७ मीटर इतकी आहे.

टॅग्स :agricultureशेतीWaterपाणी