शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

पूर्व विदर्भातील प्रकल्पांमध्ये अत्यल्प जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 12:43 IST

पर्जन्यमानात आघाडीवर असणाऱ्या पूर्व विदर्भातील प्रकल्पांमध्ये यावर्षीच्या मान्सून सत्रात अत्यल्प पाणीसाठा आहे. एकट्या भंडारा जिल्ह्यात ६३ प्रकल्पांतर्गत ३६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.

ठळक मुद्देदमदार पावसाची प्रतीक्षा ३६ टक्के पाण्याने भागणार कसे?

लोकमत न्यूज नेटवर्कइंद्रपाल कटकवारभंडारा : पर्जन्यमानात आघाडीवर असणाऱ्या पूर्व विदर्भातील प्रकल्पांमध्ये यावर्षीच्या मान्सून सत्रात अत्यल्प पाणीसाठा आहे. एकट्या भंडारा जिल्ह्यात ६३ प्रकल्पांतर्गत ३६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. परिणामी पावसाने दगा दिल्यास नागरिकांसह शेतीलाही याचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे.पूर्व विदर्भातील भंडारा व गोंदिया जिल्ह्यात तलावांची मोठी संख्या आहे. अडीच हजारांपेक्षा जास्त तलाव असले तरी त्यात माजी मालगुजारी तलावांची अवस्था हवी तेवढी चांगली नाही. पावसाळ्यात तलावांसह बोड्या व प्रकल्पांमध्ये पाणी साठवणूक होत असते. यावर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र, त्यानंतर ेपावसाने पाठ फिरविल्यामुळे प्रकल्पांमध्येही पाणी साठा होवू शकला नाही. भंडारा जिल्ह्यातील जीवनदायीनी समजल्या जाणाऱ्या वैनगंगा नदीत मध्यप्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागात बरसणाऱ्या पावसाचे पाणी धरणांमार्फत सोडले जाते. यावर्षी मात्र तशी स्थिती ओढवली नाही. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सरासरी १९ टक्के पाऊस कमी झाला.भंडारा जिल्ह्यात ६३ प्रकल्प असून त्यात चार मध्यम प्रकल्प, ३१ लघु प्रकल्प तर २८ माजी मालगुजारी तलाव आहेत. हे सर्व प्रकल्प लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येत असून वन व अन्य विभागांच्या हद्दीत असलेल्या तलावांची संख्या वेगळी आहे.पावसाने दगा दिल्यामुळे सद्यस्थितीत मध्यम प्रकल्पांमध्ये ३० टक्के तर लघु प्रकल्पात ३९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. दोन महिने पूर्ण झाल्यावरही जिल्ह्यातील प्रकल्पांनी निम्मी टक्केवारीही ओलांडलेली नाही. पाऊस नसल्यामुळे रोवणी व धान पीकाकरिता पहिल्यांदाच बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडण्यात येणार आहे.धरणाची स्थितीही चिंताजनकभंडारापेक्षा गोंदिया जिल्ह्यात धरणांची संख्या अधिक असली तरी दोन्ही जिल्ह्यात पर्जन्यमानाचे प्रमाण यावर्षी कमी आहे. परिणामी गोंदिया जिल्ह्यातील ईटियाडोह, सिरपूर, कालीसराड, धापेवाडा, वैनगंगा देवरी आदी धरण क्षेत्रात अपेक्षित जलसाठ्यापेक्षा पाण्याची टक्केवारी कमी आहे. याशिवाय मध्यप्रदेशातील संजय सरोवरात ४१० दलघमी जलसाठा अपेक्षित असताना आजघडीला फक्त १९८ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. महत्वाकांक्षी गोसीखुर्द धरणात ११४६ दलघमी जलसाठा अपेक्षित असताना १८८.०४ पाणीसाठा उपलब्ध आहे. या दोन्ही धरणांची टक्केवारी अनुक्रमे ४८ व २५ अशी आहे. सद्यस्थितीत भंडारा शहराच्या हाकेवर असलेल्या वैनगंगा नदीची पातळी ५.१७ मीटर इतकी आहे.

टॅग्स :agricultureशेतीWaterपाणी