शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
3
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
4
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
5
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
6
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
7
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
8
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
9
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
10
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
11
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
12
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
13
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
14
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
15
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
16
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
17
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
18
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
19
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
20
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर, मोहाडी, पवनीत शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 05:00 IST

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे तुमसर, मोहाडी, पवनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी धानपीक आडवे झाले आहे. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा फटका : पीक नुकसानीचा सर्वे करुन आर्थिक मदतीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : यावर्षी पावसाची संततधार कायम राहिल्याने जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी आनंदीत होता. मात्र सद्यस्थितीत धान गर्भावस्थेत असल्याने तसेच हलक्या व मध्यम प्रतीचे वाण परिपक्व झाल्याने काही ठिकाणी धान कापणीला सुरुवात झाली होती. परंतु दोन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे तुमसर, मोहाडी, पवनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी धानपीक आडवे झाले आहे. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.तुमसर तालुक्यातील रोंघा, मंगरली, लोहारा, गायमुख, रामपूर यासारख्या इतरही गावांमध्ये १२ ऑक्टोबर रोजी झालेल्या वादळी पावसामुळे धानपीक जमीनदोस्त झाले आहेत. धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासाठी कृषी विभागासह महसूल विभागाने वेळीच दखल घेऊन नुकसानग्रस्त धानपीकांचे प्रत्यक्ष मोका पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.गत आठवड्याभरापासून वातावरण ढगाळ राहत असल्याने तूर पीकालाही फटका बसत आहे. किडींचा प्रादूर्भाव वाढत असून निसर्गाच्या फटक्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. विधानसभा निवडणुकीमुळे कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त असल्याने अनेक ठिकाणी प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी भेटी देत नाहीत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी वारंवार तक्रार करूनही अनेक ठिकाणी अद्याप पंचनामे झालेले नाहीत. त्यातच अनेक शेतकऱ्यांनी जुलै महिन्यात पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग नोंदवूनही अनेकांना याचा लाभ मिळत नसल्याने योजनेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. दरवर्षीच येणाऱ्या गारपीट, चक्रीवादळ तसेच तडाख्याच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही पीक विमा योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे संतप्त शेतकरी कृषी विभागाकडे चकरा मारत आहेत. मात्र याची अंमलबजावणी जिल्हा राज्य पातळीवरून होत असल्याने अद्यापही अनेक ठिकाणी शेतकरी या योजनेत पात्र ठरलेले नाही. अनेक ठिकाणी भातपीक आडवे झाले आहे. पडलेल्या भातपीकामुळे हे सडण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. त्यामुळे हलके व मध्यम प्रतीचे कापणीयोग्य झालेले धान डोळ्यादेखत सडत असल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना कपाळावर हात मारण्याची वेळ आली आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याची गरज आहे.रबी हंगामही लांबणीवर

अनेक ठिकाणी झालेल्या पावसामुळे तसेच धानपीक निघण्यासाठी उशीर असल्याने शेतकऱ्यांना रबी हंगामासाठी उशीर होत आहे. काही ठिकाणी सोयाबीन पीक निघाले असले तरी अद्याप मशागत न झाल्याने शेतकºयांना गहू, हरभरा पिकाच्या पेरणीसाठी शेताची मशागत करता आलेली नाही. त्यामुळे रबी हंगामातील पिकांच्या पेरणीला उशीर होणार असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी