शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

तुमसर, मोहाडी, पवनीत शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 05:00 IST

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे तुमसर, मोहाडी, पवनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी धानपीक आडवे झाले आहे. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा फटका : पीक नुकसानीचा सर्वे करुन आर्थिक मदतीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : यावर्षी पावसाची संततधार कायम राहिल्याने जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी आनंदीत होता. मात्र सद्यस्थितीत धान गर्भावस्थेत असल्याने तसेच हलक्या व मध्यम प्रतीचे वाण परिपक्व झाल्याने काही ठिकाणी धान कापणीला सुरुवात झाली होती. परंतु दोन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे तुमसर, मोहाडी, पवनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी धानपीक आडवे झाले आहे. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.तुमसर तालुक्यातील रोंघा, मंगरली, लोहारा, गायमुख, रामपूर यासारख्या इतरही गावांमध्ये १२ ऑक्टोबर रोजी झालेल्या वादळी पावसामुळे धानपीक जमीनदोस्त झाले आहेत. धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासाठी कृषी विभागासह महसूल विभागाने वेळीच दखल घेऊन नुकसानग्रस्त धानपीकांचे प्रत्यक्ष मोका पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.गत आठवड्याभरापासून वातावरण ढगाळ राहत असल्याने तूर पीकालाही फटका बसत आहे. किडींचा प्रादूर्भाव वाढत असून निसर्गाच्या फटक्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. विधानसभा निवडणुकीमुळे कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त असल्याने अनेक ठिकाणी प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी भेटी देत नाहीत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी वारंवार तक्रार करूनही अनेक ठिकाणी अद्याप पंचनामे झालेले नाहीत. त्यातच अनेक शेतकऱ्यांनी जुलै महिन्यात पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग नोंदवूनही अनेकांना याचा लाभ मिळत नसल्याने योजनेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. दरवर्षीच येणाऱ्या गारपीट, चक्रीवादळ तसेच तडाख्याच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही पीक विमा योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे संतप्त शेतकरी कृषी विभागाकडे चकरा मारत आहेत. मात्र याची अंमलबजावणी जिल्हा राज्य पातळीवरून होत असल्याने अद्यापही अनेक ठिकाणी शेतकरी या योजनेत पात्र ठरलेले नाही. अनेक ठिकाणी भातपीक आडवे झाले आहे. पडलेल्या भातपीकामुळे हे सडण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. त्यामुळे हलके व मध्यम प्रतीचे कापणीयोग्य झालेले धान डोळ्यादेखत सडत असल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना कपाळावर हात मारण्याची वेळ आली आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याची गरज आहे.रबी हंगामही लांबणीवर

अनेक ठिकाणी झालेल्या पावसामुळे तसेच धानपीक निघण्यासाठी उशीर असल्याने शेतकऱ्यांना रबी हंगामासाठी उशीर होत आहे. काही ठिकाणी सोयाबीन पीक निघाले असले तरी अद्याप मशागत न झाल्याने शेतकºयांना गहू, हरभरा पिकाच्या पेरणीसाठी शेताची मशागत करता आलेली नाही. त्यामुळे रबी हंगामातील पिकांच्या पेरणीला उशीर होणार असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी