शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

धान उत्पादकांना बोनसचा लॉलिपॉप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 21:58 IST

आॅनलाईन लोकमतकोंढा (कोसरा) : नागपूर विधीमंडळ अधिवेशनात धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रूपये बोनस शासनाने जाहीर केले. अधिवेशन संपून दोन महिन्यांचा कालावधी लोटला. पण बोनस देण्याचे परिपत्रक शासकीय आधारभूत केंद्राला प्राप्त न झाल्याने शेतकरी संभ्रमात पडले आहेत. पणिामी धान उत्पादकांना बोनसचा फक्त लॉलीपाप दिला होता काय? असा प्रश्न शेतकरी ...

ठळक मुद्देशेतकरी संभ्रमात : ३१ मार्चपूर्वी वाटप होणार काय?

आॅनलाईन लोकमतकोंढा (कोसरा) : नागपूर विधीमंडळ अधिवेशनात धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रूपये बोनस शासनाने जाहीर केले. अधिवेशन संपून दोन महिन्यांचा कालावधी लोटला. पण बोनस देण्याचे परिपत्रक शासकीय आधारभूत केंद्राला प्राप्त न झाल्याने शेतकरी संभ्रमात पडले आहेत. पणिामी धान उत्पादकांना बोनसचा फक्त लॉलीपाप दिला होता काय? असा प्रश्न शेतकरी विचारित आहेत.जिल्ह्यात धान हे प्रमुख पीक आहे. धा उत्पादक तथा चौरास पट्टा म्हणून पवनी व लाखांदूर तालुका ओळखला जातो. यावर्षी धानाची उतारी कधी नव्हे एवढी कमी आली आहे. उत्पादन खर्च एका एकरला जवळपास २० हजार रूपये आला आहे. त्यामानाने धानाचा उतारा एका एकरास १० ते १३ क्विंटल मिळाले. त्यामुळे शेतकरी हतबल आहे. बियाणे, खत, औषधी, मजुरी व कापणी, मळणी असे खर्च भरमसाठ वाढले होते.धानाची शेती परवडणारी नाही, असे चौरास भागातील शेतकरी ओरडत आहेत. बँक, सहकारी संस्था, खासगी पतसंस्था, खासगी सावकार यांच्याकडून अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढले ते उत्पादन अत्यल्प झाल्याने फेडू शकले नाही. ठोकळ प्रतीचे धान पेरणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने १,५५० रूपये भाव देऊन मोठी फसवणूक केली. सध्या तरी बारीकप्रतीचे धान व्यापारी २,५०० रूपये क्विंटल भावाने धान खरेदी करीत आहेत. मात्र १,५५० रूपये क्विंटल भावाने धानाची आधारभूत केंद्रावर शासनाने खरेदी केली.धानाच्या किंमतीत शेतकºयांना शासनाने मारल्यानंतर नागपूर विधीमंडळ अधिवेशनात प्रति क्विंटल ५०० रूपये बोनस देईल, अशी अपेक्षा बाळगून अनेक शेतकरी होते. पण ते देखिल प्रति क्विंटल २०० रूपये बोनस जाहीर करून घोर निराशा केली. नागपूर अधिवेशनात शासनाने बोनस जाहीर केला. पण त्यासंबंधी आदेश मात्र अद्याप काढले नाही. त्यामुळे आता सरकारच्या घोषणेबद्दल शेतकरी शंका व्यक्त करीत आहेत. मार्च अखेर सर्व शेतकरी बँक, सहकारी संस्था तसेच इतराचे कर्ज जमा करून नव्याने पीक कर्जाची उचल करीत असतात.३१ मार्चअखेर पीक कर्ज भरले तर सहकारी संस्था, बँक व्याज आकारणी करीत नाही. मात्र नंतर व्याज आकारणी करीत असतात. तेव्हा शासनाने जाहीर केलेले धानावरील बोनस ३१ मार्चपुर्वी शेतकºयांना दिल्यास त्याचा लाभ शेतकºयास होईल.बँक, सहकारी संस्थेचे त्याचा लाभ शेतकऱ्यास होईल. बँक, सहकारी संस्थेचे कर्ज भरण्यास मदत होईल, महाराष्ट्र शासनाने घोषित केलेले प्रति क्विंटल २०० रूपये बोनस त्वरीत शेतकऱ्यांना देण्याची मागणी जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.