शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

धान उत्पादकांना बोनसचा लॉलिपॉप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 21:58 IST

आॅनलाईन लोकमतकोंढा (कोसरा) : नागपूर विधीमंडळ अधिवेशनात धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रूपये बोनस शासनाने जाहीर केले. अधिवेशन संपून दोन महिन्यांचा कालावधी लोटला. पण बोनस देण्याचे परिपत्रक शासकीय आधारभूत केंद्राला प्राप्त न झाल्याने शेतकरी संभ्रमात पडले आहेत. पणिामी धान उत्पादकांना बोनसचा फक्त लॉलीपाप दिला होता काय? असा प्रश्न शेतकरी ...

ठळक मुद्देशेतकरी संभ्रमात : ३१ मार्चपूर्वी वाटप होणार काय?

आॅनलाईन लोकमतकोंढा (कोसरा) : नागपूर विधीमंडळ अधिवेशनात धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रूपये बोनस शासनाने जाहीर केले. अधिवेशन संपून दोन महिन्यांचा कालावधी लोटला. पण बोनस देण्याचे परिपत्रक शासकीय आधारभूत केंद्राला प्राप्त न झाल्याने शेतकरी संभ्रमात पडले आहेत. पणिामी धान उत्पादकांना बोनसचा फक्त लॉलीपाप दिला होता काय? असा प्रश्न शेतकरी विचारित आहेत.जिल्ह्यात धान हे प्रमुख पीक आहे. धा उत्पादक तथा चौरास पट्टा म्हणून पवनी व लाखांदूर तालुका ओळखला जातो. यावर्षी धानाची उतारी कधी नव्हे एवढी कमी आली आहे. उत्पादन खर्च एका एकरला जवळपास २० हजार रूपये आला आहे. त्यामानाने धानाचा उतारा एका एकरास १० ते १३ क्विंटल मिळाले. त्यामुळे शेतकरी हतबल आहे. बियाणे, खत, औषधी, मजुरी व कापणी, मळणी असे खर्च भरमसाठ वाढले होते.धानाची शेती परवडणारी नाही, असे चौरास भागातील शेतकरी ओरडत आहेत. बँक, सहकारी संस्था, खासगी पतसंस्था, खासगी सावकार यांच्याकडून अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढले ते उत्पादन अत्यल्प झाल्याने फेडू शकले नाही. ठोकळ प्रतीचे धान पेरणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने १,५५० रूपये भाव देऊन मोठी फसवणूक केली. सध्या तरी बारीकप्रतीचे धान व्यापारी २,५०० रूपये क्विंटल भावाने धान खरेदी करीत आहेत. मात्र १,५५० रूपये क्विंटल भावाने धानाची आधारभूत केंद्रावर शासनाने खरेदी केली.धानाच्या किंमतीत शेतकºयांना शासनाने मारल्यानंतर नागपूर विधीमंडळ अधिवेशनात प्रति क्विंटल ५०० रूपये बोनस देईल, अशी अपेक्षा बाळगून अनेक शेतकरी होते. पण ते देखिल प्रति क्विंटल २०० रूपये बोनस जाहीर करून घोर निराशा केली. नागपूर अधिवेशनात शासनाने बोनस जाहीर केला. पण त्यासंबंधी आदेश मात्र अद्याप काढले नाही. त्यामुळे आता सरकारच्या घोषणेबद्दल शेतकरी शंका व्यक्त करीत आहेत. मार्च अखेर सर्व शेतकरी बँक, सहकारी संस्था तसेच इतराचे कर्ज जमा करून नव्याने पीक कर्जाची उचल करीत असतात.३१ मार्चअखेर पीक कर्ज भरले तर सहकारी संस्था, बँक व्याज आकारणी करीत नाही. मात्र नंतर व्याज आकारणी करीत असतात. तेव्हा शासनाने जाहीर केलेले धानावरील बोनस ३१ मार्चपुर्वी शेतकºयांना दिल्यास त्याचा लाभ शेतकºयास होईल.बँक, सहकारी संस्थेचे त्याचा लाभ शेतकऱ्यास होईल. बँक, सहकारी संस्थेचे कर्ज भरण्यास मदत होईल, महाराष्ट्र शासनाने घोषित केलेले प्रति क्विंटल २०० रूपये बोनस त्वरीत शेतकऱ्यांना देण्याची मागणी जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.