शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Lok Sabha Election 2019; लोकसभा निवडणूक राष्ट्रीय अस्मितेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 00:51 IST

विकासाचा मुद्दा घेवून भाजप ही निवडणूक लढवित आहे. मात्र ही निवडणूक गल्लीची नव्हे तर दिल्लीची असून राष्ट्रीय अस्मिता जपणारी आहे. पूर्वीच्या अन्याय, अत्याचारी, दुराचारी व भ्रष्टाचारी सरकारला थारा न घालता विकासात्मक वाटचाल करणाऱ्या भाजपचे हात मजबूत करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस : भंडारा येथील सभेत काँग्रेसवर टीका

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विकासाचा मुद्दा घेवून भाजप ही निवडणूक लढवित आहे. मात्र ही निवडणूक गल्लीची नव्हे तर दिल्लीची असून राष्ट्रीय अस्मिता जपणारी आहे. पूर्वीच्या अन्याय, अत्याचारी, दुराचारी व भ्रष्टाचारी सरकारला थारा न घालता विकासात्मक वाटचाल करणाऱ्या भाजपचे हात मजबूत करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.भंडारा येथील दसरा मैदानात मंगळवारी सायंकाळी आयोजित भाजप-शिवसेना प्रणीत युतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेला ते संबोधित करीत होेते. यावेळी मंचावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, माजी खासदार शिशुपाल पटले, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, म्हाडाचे सभापती तारिक कुरैशी, उमेदवार सुनील मेंढे, आशु गोंडाणे, मुकेश थानथराटे, असित बागडे आदी मान्यवर उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विदर्भात पहिल्या टप्प्यात लोकसभा निवडणूक होत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पूर्व विदर्भातून उमेदवाराच्या रूपाने सुनील मेंढे यांना ओपनिंग बॅट्समन म्हणून संधी दिली आहे. ते प्रचंड मताधिक्याने निवडून येतील यात शंका नाही. विकासाच्या मुद्यावर भाजप निवडणूक लढवित असून भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात बऱ्याच कामांना गती देण्यात आली आहे.भंडारातही नगराध्यक्ष मेंढे यांनी पाणीपुरवठा योजना, भूमिगत गटार योजना, एलईडी पथदिवे यासारख्या विकासात्मक कामांना प्राधान्य दिले, असे त्यांनी सांगितले.काँग्रेस-राष्ट्रवादीवर निशाणा साधून मुख्यमंत्री म्हणाले, सर्जीकल स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे अड्डे उदध्वस्त करणाºया सैन्याला काँग्रेस-राष्ट्रवादी पुरावे मागत आहे. ही बाब देशासाठी शरमेने मान खाली घालणारी आहे.गरीबांना वार्षिक ७२ हजार रूपये देण्याची घोषणा करणाºया काँग्रेसने पैसा कुठून व कसा आणणार हे मात्र सांगितले नाही. दुसरीकडे गरीबांचा पैसा गरीबांना कसा मिळेल, अशी व्यवस्था प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. स्वच्छ भारत अभियान, पंतप्रधान आवास योजना, उज्वला योजना, मुद्रा लोन, आयुष्यमान भारत, कामगार, लहान व्यवसायीकांसह शेतकऱ्यांना पेंशन देण्याचा महत्वाकांक्षी निर्णयही मोदी सरकारने घेतला आहे. सर्वांच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. खºया अर्थाने भाजपचे शासन देशाला विकासाकडे घेवून जाणारे असून भाजप उमेदवाराचे हात बळकट करावे, असेही आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. सभेचे संचालन व आभार नगरसेवक संजय कुंभलकर यांनी केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhandara-gondiya-pcभंडारा-गोंदियाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019