शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शहरवासीयांना पिवळसर पाणी पुरवठा

By admin | Updated: April 27, 2015 00:11 IST

मागील १५ दिवसांपासून नळांद्वारे पिवळसर पाणी येत असताना नगरपालिका चुप्पी साधून आहे. ..

भंडारा : मागील १५ दिवसांपासून नळांद्वारे पिवळसर पाणी येत असताना नगरपालिका चुप्पी साधून आहे. नगरपालिकेच्या या दुर्लक्षित धोरणामुळे शहरातील जवळपास सव्वा ते दीड लाख लोकांना जलजन्य आजाराची लागण होण्याची शक्यता आहे.या शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासह मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेली जिल्हा परिषदेची भव्य इमारत, शासकीय, निमशासकीय व खाजगी कार्यालये आहेत. जिल्ह्याचा कारभार याच ठिकाणाहून हाकला जातो. शैक्षणिक संस्था असल्याने जिल्ह्यातीलच नव्हे तर, जिल्हाबाहेरील विद्यार्थी शहरात शिक्षणासाठी येतात. परंतु, कोणत्याही कामानिमित्त शहरात येणाऱ्या नागरिकांना किंवा विद्यार्थ्यांना ठेपाळलेल्या कारभाराचा प्रत्यय येतोच. पंधरा दिवसांपासून नळांना पिवळसर पाणी येत आहे. या पाण्याचा थर अर्ध्या तासाने गुंडात किंवा बादलीच्या खाली साचतो. शहरातील पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन जागोजागी फुटल्याने तर काही पाईपलाईन जीर्ण झाल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे बोलले जाते. हा प्रकार नगरपालिकेच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना माहित असतानादेखील ते याकडे का दुर्लक्ष करतात. हे न समजण्यापलिकडे आहे. या अशुद्ध पाण्यामुळे शहरातील लोकांना जलजन्य आजाराची लागण होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांनी दखल घेऊन ताबडतोब उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. (नगर प्रतिनिधी)वैनगंगा दूषितवैनगंगेच्या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात असल्याने दुर्गधीयुक्त पाणी प्यावे लागत आहे़ शासन स्तरावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी ताालुक्यात गोसीखुर्द येथे वैनगंगा नदीवर मोठे धरण बांधले आहे़ त्यामध्ये पाणी अडविण्यात आले आहे. नागपुरातून वाहत येणाऱ्या नाग व कन्हान नदीचे घाण पाणी वैनगंगा नदीत मिसळते़ गोसे धरणातील जलसाठा दूषित झाला आहे. धरणात पाणी अडविल्यामुळे वैनगंगा नदी दुथडी पाण्याने भरली राहत आहे. नागनदीचे पाणी मिसळल्यामुळे पाणी दूषित झाले असून पाण्यातून दुर्गंधी येत आहे. पाण्याचा रंग हिरवट काळसर झाला आहे. एकंदरीत या दूषित पाण्यामुळे लोकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. कोणत्याही प्रकारचा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदी काठावरील गावाचे गुरेढोरे नदीतीलच पाणी पितात. दूषित पाण्यामुळे शेतकऱ्यांचे जनावरांना रोगराई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.प्रदूषणाची समस्या कायमस्वरुपी सुटावीपवनी : नागनदीच्या प्रदूषणामुळे महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहे. पवनी तालुक्यातील २५ गावातील पाणी प्रदूषित झाले आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने या प्रदूषणाच्या समस्येवर कायमस्वरुपी उपाय करण्याची आज गरज निर्माण झाली आहे. धरणातील दूषित पाण्याचा पुरवठा पवनी शहराला होत आहे. नागपूर शहरातून वाहणाऱ्या नागनदीत शहरातील ३४५ पैकी २६५ एमएलडी सांडपाणी दररोज सोडले जात आहे. ही नागनदी अन्य चार नद्यांसोबत आंभोराजवळ वैनगंगा नदीला येवून मिळते. ते वैनगंगा नदीचे पाणी गोसीखुर्द धरणात येवून जमा होते.नागनदीच्या प्रदूषित पाण्यामुळे गोसीखुर्द धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले आहे. पवनी तालुक्यातील वैनगंगा नदी काठावर २५ गावे व पवनी शहरासह अनेक गावातील पाणी प्रदूषित झाले आहे. याचे प्रमाण मिळाले आहेत. नदीकाठावर अनेक गावात मोठ्या प्रमाणात डासांची व जीवजंतूची निर्मिती झाली आहे. त्यामुळे मलेरिया, डेंगू आदी आजारांच्या प्रादूर्भावाने जनता त्रस्त झाली आहे.या प्रदूषणावर केंद्र व राज्य सरकारने कायमस्वरुपी तोडगा काढण्याची आज गरज निर्माण झाली आहे. नागनदीचे प्रदूषण थांबविण्याकरिता नागपूर महानगर पालिकेने मागील वर्षी १,३२८ कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर केला होता. तो मंजूरही झाला. पण अजूनपर्यंत याची अंमलबजावणी न झाल्यामुळे हे प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच आहे. गोसेखुर्द धरणातून वैनगंगा नदीच्या पात्रातील सोडले जाणारे पाणी प्रदूषित, दुर्गंधीयुक्त, काळ्या - पिवळ्या व हिरव्या रंगाचे आहे. धरणाजवळ थांबल्यास या सोडल्या जाणाऱ्या पाण्याला दुर्गंधी येते. या प्रदूषित पाण्याचा सर्वाधिक फटका पवनी शहराला बसत आहे. या प्रदूषित पाण्यामुळे यावर्षी विषमज्वर, काविळचे मोठ्या संख्येत रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी अनेकांचा मृत्यू झाला आहे. शहरातील प्रदूषित पाण्याची समस्या तातडीने सुटण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)