शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

शहरवासीयांना पिवळसर पाणी पुरवठा

By admin | Updated: April 27, 2015 00:11 IST

मागील १५ दिवसांपासून नळांद्वारे पिवळसर पाणी येत असताना नगरपालिका चुप्पी साधून आहे. ..

भंडारा : मागील १५ दिवसांपासून नळांद्वारे पिवळसर पाणी येत असताना नगरपालिका चुप्पी साधून आहे. नगरपालिकेच्या या दुर्लक्षित धोरणामुळे शहरातील जवळपास सव्वा ते दीड लाख लोकांना जलजन्य आजाराची लागण होण्याची शक्यता आहे.या शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासह मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेली जिल्हा परिषदेची भव्य इमारत, शासकीय, निमशासकीय व खाजगी कार्यालये आहेत. जिल्ह्याचा कारभार याच ठिकाणाहून हाकला जातो. शैक्षणिक संस्था असल्याने जिल्ह्यातीलच नव्हे तर, जिल्हाबाहेरील विद्यार्थी शहरात शिक्षणासाठी येतात. परंतु, कोणत्याही कामानिमित्त शहरात येणाऱ्या नागरिकांना किंवा विद्यार्थ्यांना ठेपाळलेल्या कारभाराचा प्रत्यय येतोच. पंधरा दिवसांपासून नळांना पिवळसर पाणी येत आहे. या पाण्याचा थर अर्ध्या तासाने गुंडात किंवा बादलीच्या खाली साचतो. शहरातील पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन जागोजागी फुटल्याने तर काही पाईपलाईन जीर्ण झाल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे बोलले जाते. हा प्रकार नगरपालिकेच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना माहित असतानादेखील ते याकडे का दुर्लक्ष करतात. हे न समजण्यापलिकडे आहे. या अशुद्ध पाण्यामुळे शहरातील लोकांना जलजन्य आजाराची लागण होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांनी दखल घेऊन ताबडतोब उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. (नगर प्रतिनिधी)वैनगंगा दूषितवैनगंगेच्या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात असल्याने दुर्गधीयुक्त पाणी प्यावे लागत आहे़ शासन स्तरावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी ताालुक्यात गोसीखुर्द येथे वैनगंगा नदीवर मोठे धरण बांधले आहे़ त्यामध्ये पाणी अडविण्यात आले आहे. नागपुरातून वाहत येणाऱ्या नाग व कन्हान नदीचे घाण पाणी वैनगंगा नदीत मिसळते़ गोसे धरणातील जलसाठा दूषित झाला आहे. धरणात पाणी अडविल्यामुळे वैनगंगा नदी दुथडी पाण्याने भरली राहत आहे. नागनदीचे पाणी मिसळल्यामुळे पाणी दूषित झाले असून पाण्यातून दुर्गंधी येत आहे. पाण्याचा रंग हिरवट काळसर झाला आहे. एकंदरीत या दूषित पाण्यामुळे लोकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. कोणत्याही प्रकारचा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदी काठावरील गावाचे गुरेढोरे नदीतीलच पाणी पितात. दूषित पाण्यामुळे शेतकऱ्यांचे जनावरांना रोगराई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.प्रदूषणाची समस्या कायमस्वरुपी सुटावीपवनी : नागनदीच्या प्रदूषणामुळे महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहे. पवनी तालुक्यातील २५ गावातील पाणी प्रदूषित झाले आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने या प्रदूषणाच्या समस्येवर कायमस्वरुपी उपाय करण्याची आज गरज निर्माण झाली आहे. धरणातील दूषित पाण्याचा पुरवठा पवनी शहराला होत आहे. नागपूर शहरातून वाहणाऱ्या नागनदीत शहरातील ३४५ पैकी २६५ एमएलडी सांडपाणी दररोज सोडले जात आहे. ही नागनदी अन्य चार नद्यांसोबत आंभोराजवळ वैनगंगा नदीला येवून मिळते. ते वैनगंगा नदीचे पाणी गोसीखुर्द धरणात येवून जमा होते.नागनदीच्या प्रदूषित पाण्यामुळे गोसीखुर्द धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले आहे. पवनी तालुक्यातील वैनगंगा नदी काठावर २५ गावे व पवनी शहरासह अनेक गावातील पाणी प्रदूषित झाले आहे. याचे प्रमाण मिळाले आहेत. नदीकाठावर अनेक गावात मोठ्या प्रमाणात डासांची व जीवजंतूची निर्मिती झाली आहे. त्यामुळे मलेरिया, डेंगू आदी आजारांच्या प्रादूर्भावाने जनता त्रस्त झाली आहे.या प्रदूषणावर केंद्र व राज्य सरकारने कायमस्वरुपी तोडगा काढण्याची आज गरज निर्माण झाली आहे. नागनदीचे प्रदूषण थांबविण्याकरिता नागपूर महानगर पालिकेने मागील वर्षी १,३२८ कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर केला होता. तो मंजूरही झाला. पण अजूनपर्यंत याची अंमलबजावणी न झाल्यामुळे हे प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच आहे. गोसेखुर्द धरणातून वैनगंगा नदीच्या पात्रातील सोडले जाणारे पाणी प्रदूषित, दुर्गंधीयुक्त, काळ्या - पिवळ्या व हिरव्या रंगाचे आहे. धरणाजवळ थांबल्यास या सोडल्या जाणाऱ्या पाण्याला दुर्गंधी येते. या प्रदूषित पाण्याचा सर्वाधिक फटका पवनी शहराला बसत आहे. या प्रदूषित पाण्यामुळे यावर्षी विषमज्वर, काविळचे मोठ्या संख्येत रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी अनेकांचा मृत्यू झाला आहे. शहरातील प्रदूषित पाण्याची समस्या तातडीने सुटण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)