शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
3
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
4
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
5
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
6
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
7
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
8
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
9
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
10
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
12
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
13
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
14
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
15
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
16
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
17
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
18
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
19
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
20
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय

बहीण-भावाच्या प्रेमाचा ‘दुवा’ टपाल विभाग

By admin | Updated: August 26, 2015 00:27 IST

भारतीय संस्कृतीत प्रमुख सणामध्ये ‘रक्षाबंधन’ हा सण भाऊ-बहिणीचा स्नेह व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो.

\विश्वासार्ह जोपासले : भारतीय पोस्टाची अविरत सेवा, स्मार्टफोन सेवेतही आर्थिक उलाढालप्रशांत देसाई  भंडाराभारतीय संस्कृतीत प्रमुख सणामध्ये ‘रक्षाबंधन’ हा सण भाऊ-बहिणीचा स्नेह व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. देशभरात ह्या सणाची वेगवेगळ्या नावाने ओळख आहे. उत्तर भारतात ‘कजरी-पौर्णिमा’, पश्चिम भारतातात ‘नारळी पौर्णिमा’ या नावाने तो साजरा केला जातो. अनादि काळापासून सुरू असलेल्या भाऊ-बहिणीच्या या प्रेमाचा खऱ्या अर्थाने ‘दुवा' ठरला आहे, तो भारतीय टपाल विभाग. आधुनिक यांत्रिक युगात स्मार्टफोन, व्हॉट्स अप, फेसबुकला फार मोठे महत्त्व आले आहे. यामुळे आदानप्रदान मोबाईलमधूनच चुटकीसरशी होत आहे. तीन दिवसावर आलेल्या रक्षाबंधनामुळे पोस्टाची आर्थिक आवक वाढली आहे. इंटरनेटच्या आधुनिक युगातही परंपरागत भारतीय पोस्ट खात्याने नागरिकांच्या मनात आपली प्रतीमा जोपासली आहे. पुढील पंधरा दिवस पोस्टातून भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतिक असलेल्या विविधांगी राखींचा प्रवास होणार आहे. ऐरव्ही, आर्थिक उलाढाल मंदावली असे चित्र असलेल्या टपाल कार्यालयातून राखींच्या प्रवासामुळे मोठे आर्थिक उत्पन्न वाढणार आहे.भंंडारा मुख्य डाकघरांतर्गत १९ उपडाक कार्यालय तथा १२० शाखा कार्यालय (ग्रामीण टपाल सेवा) आहेत. ग्रामीण विभागात २५५ तर विभागाीय कार्यायलात १०४ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातील ४० कर्मचारी हे भंडारा मुख्य डाकघर येथे कार्यरत आहेत. हे सर्व कर्मचारी बहिण-भावाच्या प्रेमाचा 'दवा' ठरले आहेत. दुरवर राहणारी बहिण आपल्या लाडक्या भावाला प्रेमाने राखी पाठविते. ती वेळेत तिच्या भावाला मिळावी यासाठी हे कर्मचारी कार्यरत आहेत. इंटरनेटचे युग असल्याने अनेकजण आता स्मार्टफोनच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा देतात. त्यामुळे पूर्वी दिवाळी, दसरा किंवा पारंपारिक सणांना पाठविण्यात येणारे शुभेच्छा कार्डला आता फाटा बसला आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून पोस्ट कार्यालयाला याचा आर्थिक फटका बसला आहे. असे असले तरी, रक्षाबंधन या सणाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने बहिण आपल्या भावाला पोस्टातून राखी पाठवित असल्याने पोस्टावरील नागरिकांचा विश्वास आजही अबाधित आहे, हे लक्षात येते.ऐरव्ही, डाक विभागातून विविध विभागांचे व आध्यात्मिकतेचे मासीक, बँक, आरटीओ, एलआयसी यांच्यासह शासकीय कार्यालयांचा पत्रव्यवहार होतो. मात्र, रक्षाबंधन असा एकमात्र सण आहे, बहिण भावाला राखी पोस्टाने किंवा कुरिअरने पाठविते. भारतीय पोस्ट विभागाने विश्वासर्हता जोपासली असल्याचे हे ध्योतक आहे. भंडारा मुख्य डाकघर येथून सध्या दररोज सुमारे २५० राखी स्पीड पोस्टने व ५०० राखी साधारण डाकने पाठविण्यात येत आहे. तर बाहेरून किमान ९०० राखीचे लिफापे येत आहेत. येत्या पंधरा दिवसात भंडारा मुख्य डाकघर येथून राखीचे किमान ५ हजार स्पीड पोस्ट तर साधारण ३ हजार डाक जाण्याची शक्यता आहे. तर जिल्हाभरातील डाक कार्यालयाचा विचार केल्यास सुमारे १५ हजार राखींचे लिफापे स्पीड पोस्टने तर तेवढीच लिफापे साधारण डाकने पाठविण्यात येण्याची शक्यता आहे. या व्यवहारातून केवळ पंधरा दिवसात डाक विभागाचे किमान चार लाखांचे आर्थिक उत्पन्न वाढणार आहे.पौराणिक कथा व इतिहात चाळता रक्षाबंधन या सणात काळानुरूप बदल झालेला आढळतो. आता तर हे पर्व भाऊ-बहिणीच्या अतुट नात्याचे, प्रेमाचे, स्नेहाचे व बंधनाचे पर्व म्हणून देशात साजरे होताना दिसते. त्यात बहिण आपल्या भावाच्या उजव्या हातावर राखी बांधत असते व भाऊ आपल्या लाडक्या बहिणीच्या रक्षणाचे दायित्त्व स्विकारत असतो. काळ बदलला असला तरी आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगात भाऊ- बहीनींच्या स्नेहाचा 'रक्षाबंधण' या सणाचे महत्त्व कायम आहे.