शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
3
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
4
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
5
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
6
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
7
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
8
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
9
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
10
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
11
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
12
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
13
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
14
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
15
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
16
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
17
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
18
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
19
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
20
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!

बहीण-भावाच्या प्रेमाचा ‘दुवा’ टपाल विभाग

By admin | Updated: August 26, 2015 00:27 IST

भारतीय संस्कृतीत प्रमुख सणामध्ये ‘रक्षाबंधन’ हा सण भाऊ-बहिणीचा स्नेह व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो.

\विश्वासार्ह जोपासले : भारतीय पोस्टाची अविरत सेवा, स्मार्टफोन सेवेतही आर्थिक उलाढालप्रशांत देसाई  भंडाराभारतीय संस्कृतीत प्रमुख सणामध्ये ‘रक्षाबंधन’ हा सण भाऊ-बहिणीचा स्नेह व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. देशभरात ह्या सणाची वेगवेगळ्या नावाने ओळख आहे. उत्तर भारतात ‘कजरी-पौर्णिमा’, पश्चिम भारतातात ‘नारळी पौर्णिमा’ या नावाने तो साजरा केला जातो. अनादि काळापासून सुरू असलेल्या भाऊ-बहिणीच्या या प्रेमाचा खऱ्या अर्थाने ‘दुवा' ठरला आहे, तो भारतीय टपाल विभाग. आधुनिक यांत्रिक युगात स्मार्टफोन, व्हॉट्स अप, फेसबुकला फार मोठे महत्त्व आले आहे. यामुळे आदानप्रदान मोबाईलमधूनच चुटकीसरशी होत आहे. तीन दिवसावर आलेल्या रक्षाबंधनामुळे पोस्टाची आर्थिक आवक वाढली आहे. इंटरनेटच्या आधुनिक युगातही परंपरागत भारतीय पोस्ट खात्याने नागरिकांच्या मनात आपली प्रतीमा जोपासली आहे. पुढील पंधरा दिवस पोस्टातून भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतिक असलेल्या विविधांगी राखींचा प्रवास होणार आहे. ऐरव्ही, आर्थिक उलाढाल मंदावली असे चित्र असलेल्या टपाल कार्यालयातून राखींच्या प्रवासामुळे मोठे आर्थिक उत्पन्न वाढणार आहे.भंंडारा मुख्य डाकघरांतर्गत १९ उपडाक कार्यालय तथा १२० शाखा कार्यालय (ग्रामीण टपाल सेवा) आहेत. ग्रामीण विभागात २५५ तर विभागाीय कार्यायलात १०४ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातील ४० कर्मचारी हे भंडारा मुख्य डाकघर येथे कार्यरत आहेत. हे सर्व कर्मचारी बहिण-भावाच्या प्रेमाचा 'दवा' ठरले आहेत. दुरवर राहणारी बहिण आपल्या लाडक्या भावाला प्रेमाने राखी पाठविते. ती वेळेत तिच्या भावाला मिळावी यासाठी हे कर्मचारी कार्यरत आहेत. इंटरनेटचे युग असल्याने अनेकजण आता स्मार्टफोनच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा देतात. त्यामुळे पूर्वी दिवाळी, दसरा किंवा पारंपारिक सणांना पाठविण्यात येणारे शुभेच्छा कार्डला आता फाटा बसला आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून पोस्ट कार्यालयाला याचा आर्थिक फटका बसला आहे. असे असले तरी, रक्षाबंधन या सणाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने बहिण आपल्या भावाला पोस्टातून राखी पाठवित असल्याने पोस्टावरील नागरिकांचा विश्वास आजही अबाधित आहे, हे लक्षात येते.ऐरव्ही, डाक विभागातून विविध विभागांचे व आध्यात्मिकतेचे मासीक, बँक, आरटीओ, एलआयसी यांच्यासह शासकीय कार्यालयांचा पत्रव्यवहार होतो. मात्र, रक्षाबंधन असा एकमात्र सण आहे, बहिण भावाला राखी पोस्टाने किंवा कुरिअरने पाठविते. भारतीय पोस्ट विभागाने विश्वासर्हता जोपासली असल्याचे हे ध्योतक आहे. भंडारा मुख्य डाकघर येथून सध्या दररोज सुमारे २५० राखी स्पीड पोस्टने व ५०० राखी साधारण डाकने पाठविण्यात येत आहे. तर बाहेरून किमान ९०० राखीचे लिफापे येत आहेत. येत्या पंधरा दिवसात भंडारा मुख्य डाकघर येथून राखीचे किमान ५ हजार स्पीड पोस्ट तर साधारण ३ हजार डाक जाण्याची शक्यता आहे. तर जिल्हाभरातील डाक कार्यालयाचा विचार केल्यास सुमारे १५ हजार राखींचे लिफापे स्पीड पोस्टने तर तेवढीच लिफापे साधारण डाकने पाठविण्यात येण्याची शक्यता आहे. या व्यवहारातून केवळ पंधरा दिवसात डाक विभागाचे किमान चार लाखांचे आर्थिक उत्पन्न वाढणार आहे.पौराणिक कथा व इतिहात चाळता रक्षाबंधन या सणात काळानुरूप बदल झालेला आढळतो. आता तर हे पर्व भाऊ-बहिणीच्या अतुट नात्याचे, प्रेमाचे, स्नेहाचे व बंधनाचे पर्व म्हणून देशात साजरे होताना दिसते. त्यात बहिण आपल्या भावाच्या उजव्या हातावर राखी बांधत असते व भाऊ आपल्या लाडक्या बहिणीच्या रक्षणाचे दायित्त्व स्विकारत असतो. काळ बदलला असला तरी आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगात भाऊ- बहीनींच्या स्नेहाचा 'रक्षाबंधण' या सणाचे महत्त्व कायम आहे.