शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

एकाला आजीवन तर दुसऱ्या आरोपीला सात वर्षे कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 22:22 IST

एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून दोन आरोपींनी लोखंडी हातोडीने अश्विनी शिंदे या तरूणीवर जीवघेणा हल्ला केला होता. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश संजय देशमुख यांनी मुख्य आरोपीला आजीवन तर दुसºया आरोपीला सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा शुक्रवारला सुनावली. याच आरोपींविरूद्व प्रीती बारिया या महिलेचा खून प्रकरणी दोष सिद्ध झाले असून या प्रकरणाची अंतिम सुनावणी शनिवारला सकाळी ११.३० वाजता होणार आहे.

ठळक मुद्देजिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय : अश्विनी शिंदे हल्लाप्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून दोन आरोपींनी लोखंडी हातोडीने अश्विनी शिंदे या तरूणीवर जीवघेणा हल्ला केला होता. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश संजय देशमुख यांनी मुख्य आरोपीला आजीवन तर दुसºया आरोपीला सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा शुक्रवारला सुनावली. याच आरोपींविरूद्व प्रीती बारिया या महिलेचा खून प्रकरणी दोष सिद्ध झाले असून या प्रकरणाची अंतिम सुनावणी शनिवारला सकाळी ११.३० वाजता होणार आहे.अमिर एजाज शेख या आरोपीला भादंवि ३०७ कलमान्वये आजन्म कारावास तर सचिन कुंडलीक राऊत या आरोपीला भादंवि ३९७ कलमान्वये सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.३० जुलै २०१५ रोजी दुपारच्या सुमारास म्हाडा कॉलनीतील रविंद्र शिंदे यांच्या घरी मुलगी अश्विनी एकटी असल्याचे पाहून एसी दुरूस्तीच्या बहाण्याने अमिर एजाज शेख व सचिन कुंडलीक राऊत या दोन तरूणांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर तिच्या डोक्यावर लोखंडी हातोडीने वार केले होते. तेव्हापासून अश्विनीला कायम अपंगत्व आले आहे.त्याच रात्री ८ वाजताच्या सुमारास या आरोपीनी तकीया वॉर्डातील रूपेश बारीया यांच्या घरी एसी दुरूस्तीच्या बहान्याने प्रवेश करून प्रिती बारीया (३०) यांच्या डोक्यावर हातोडीने वार करून जिवानीशी ठार केले. दरम्यान, तिचा मुलगा भव्य बारीया (९) हा समोर आला असता आरोपींनी त्याच्याही डोक्यावर हातोडीने वार केल्यामुळे त्यालाही अपंगत्व आले आहे.याप्रकरणी भंडारा पोलिसांनी अटक करून आरोपींविरूद्ध भादंवि ३०२, ३०७, ३९७, ४५२ कलमान्वये गुन्हे नोंदविले होते. तपासात पोलिसांनी दागिने, रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली हातोडी आरोपीच्या घरून जप्त केली होती. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणाची अंतिम सुनावणी शुक्रवारला झाली. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी अश्विनी शिंदे प्रकरणात आजन्म कारावासाची शिक्षा तर प्रीती बारिया खून प्रकरणात दोष सिद्ध झाले असून या प्रकरणाची सुनावणी शनिवारला करण्यात येणार आहे. शनिवारच्या अंतिम निकालाकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.प्रीती बारिया खून प्रकरणाची सुनावणी आजप्रीती बारिया या बहुचर्चित खून खटल्यात आरोपींविरूद्ध आज शुक्रवारला झालेल्या युक्तीवादात दोष सिद्ध झाले. आता या खटल्याची अंतिम सुनावणी शनिवारला सकाळी जिल्हा व सत्र न्यायालयात होणार आहे. अमिर शेख आणि सचिन राऊत या आरोपींनी प्रीती बारिया यांचा खून केला होता. त्यापूर्वी अर्जुनी (मोरगाव) येथील नितू सुरेश पशिने या महिलेचा याच आरोपींनी खून केला होता. या जीवघेणा हल्ल्यात अश्विनी शिंदे व भव्य बारिया या मुलाला कायमचे अपंगत्व आले आहे. त्यामुळे अश्विनी व भव्यला आयुष्यभर या असह्य वेदना सहन कराव्या लागणार आहेत. या दोघांच्या उपचारासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी लाखो रूपये खर्च करूनही हे दोघे आजवर सामान्य स्थितीत आली नाहीत. त्यामुळे या क्रूर आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा होत आहे, अशी मागणी होत आहे.