शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

लहान पुलावर जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 06:00 IST

मोठा पुल होण्यापूर्वी लहानपुलावरून वाहतूक होत होती. ब्रिटीशांच्या काळात बांधलेला हा दगडी पुल अगदी अरुंद आहे. गोसे प्रकल्प झाल्यानंतर बॅकवॉटर या पुलापर्यंत राहते. त्यामुळे वैनगंगा येथे कायम दुथडी भरून असते. पावसाळ्यात तर वैनगंगगेला पूर आला की लहान पुलावरून पाणी वाहू लागते. या पुलाची कालमर्यादा संपली असून तो वाहतुकीस योग्य नाही.

ठळक मुद्देवैनगंगा दुथडी। जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिसूचनेकडे वाहनधारकांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वैनगंगा नदीच्या लहानपुलावरून वाहतुकीस तीन वर्षापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध घातल्यानंतरही खुलेआम वाहतूक सुरु आहे. सध्या वैनगंगा दुथडी भरून असून या लहान पुलावरून वाहनधारक जीवघेणा प्रवास करताना दिसत आहेत. याप्रकाराकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत असून प्रशासनाने फलक लावून आपले केवळ कर्तव्य पार पाडले आहे.भंडारा शहराजवळून विशाल पात्र असलेली वैनगंगा वाहते. मोठा पुल होण्यापूर्वी लहानपुलावरून वाहतूक होत होती. ब्रिटीशांच्या काळात बांधलेला हा दगडी पुल अगदी अरुंद आहे. गोसे प्रकल्प झाल्यानंतर बॅकवॉटर या पुलापर्यंत राहते. त्यामुळे वैनगंगा येथे कायम दुथडी भरून असते. पावसाळ्यात तर वैनगंगगेला पूर आला की लहान पुलावरून पाणी वाहू लागते. या पुलाची कालमर्यादा संपली असून तो वाहतुकीस योग्य नाही. मात्र त्यानंतरही कारधाकडे जाण्यासाठी जवळचा पुल म्हणून आजही शेकडो नागरिक लहान पुलाचाच उपयोग करतात. दुचाकी, रिक्षा आदी वाहने येथून भरधाव जातात. पुरुषांसोबत महिलाही या पुलावरून आपली वाहने घेऊन जात असल्याचे दृष्य नेहमीच दिसते.यावर्षी पावसाळ्यात दोनदा या पुलावरून पुराचे पाणी वाहून गेले. सुरक्षा कठडेही तुटले होते. पुलावर मोठाले खड्डेही पडले आहेत. अशा स्थितीत जीवघेणा प्रवास सुरु आहे.हा पुल वाहतुकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बंद करण्यात आला आहे. ८ ऑगस्ट २०१६ च्या अधिसूचनेनुसार जुना पुल वाहतुकीस पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. कुणीही जबरीने पुलावरुन प्रवास केल्याने अनुचित घडना घडल्यास प्रशासन जबाबदार राहणार नाही असे म्हटले आहे. याबाबतचे दोन फलक वैनगंगा नदीवरील लहान पुलाच्या दोन्ही बाजूला लावण्यात आले आहे. प्रत्येक वाहनधारक या फलकाकडे पाहतो आणि सुसाट वाहन पळवित असल्याचे चित्र आहे.सुरक्षेच्या दृष्टीने येथे कोणत्याही उपाययोजना नाहीत. एखादा अपघात घडल्यास मदतीलाही कुणी येण्याची शक्यता नाही. प्रशासनाने मात्र आपले कर्तव्य बजावले, परंतु नागरिक त्याला प्रतिसाद देत नसल्याचे दिसते.सुसाईड पॉइंटवैनगां नदीचे दोन्ही पुल सुसाईड पॉइंट म्हणून ओळखले जातात. गत वर्षभरात अनेकांनी या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे. दीड वर्षापूर्वी एका प्रेमी युगुलाने पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर सातत्याने या पुलावरून आत्महत्या करण्याच्या संख्येत वाढ होत आहे. रात्रीबेरात्री या पुलावर कुणीही नसल्याची संधी साधून आत्महत्या केली जाते. त्यानंतर मृतदेह शोधताना मोठी कसरत करावी लागते.पूल कायमचा बंद करावैनगंगा नदीवरील लहान पुलावर लोखंडी कठडे आडवे लावण्यात आले आहेत. परंतु दुचाकी वाहने हे कठडे पार करून पुलावरून प्रवास करतात. बांधकाम विभागाने या पुलाच्या दोन्ही बाजू कायमच्या बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :riverनदी