शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

लहान पुलावर जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 06:00 IST

मोठा पुल होण्यापूर्वी लहानपुलावरून वाहतूक होत होती. ब्रिटीशांच्या काळात बांधलेला हा दगडी पुल अगदी अरुंद आहे. गोसे प्रकल्प झाल्यानंतर बॅकवॉटर या पुलापर्यंत राहते. त्यामुळे वैनगंगा येथे कायम दुथडी भरून असते. पावसाळ्यात तर वैनगंगगेला पूर आला की लहान पुलावरून पाणी वाहू लागते. या पुलाची कालमर्यादा संपली असून तो वाहतुकीस योग्य नाही.

ठळक मुद्देवैनगंगा दुथडी। जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिसूचनेकडे वाहनधारकांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वैनगंगा नदीच्या लहानपुलावरून वाहतुकीस तीन वर्षापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध घातल्यानंतरही खुलेआम वाहतूक सुरु आहे. सध्या वैनगंगा दुथडी भरून असून या लहान पुलावरून वाहनधारक जीवघेणा प्रवास करताना दिसत आहेत. याप्रकाराकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत असून प्रशासनाने फलक लावून आपले केवळ कर्तव्य पार पाडले आहे.भंडारा शहराजवळून विशाल पात्र असलेली वैनगंगा वाहते. मोठा पुल होण्यापूर्वी लहानपुलावरून वाहतूक होत होती. ब्रिटीशांच्या काळात बांधलेला हा दगडी पुल अगदी अरुंद आहे. गोसे प्रकल्प झाल्यानंतर बॅकवॉटर या पुलापर्यंत राहते. त्यामुळे वैनगंगा येथे कायम दुथडी भरून असते. पावसाळ्यात तर वैनगंगगेला पूर आला की लहान पुलावरून पाणी वाहू लागते. या पुलाची कालमर्यादा संपली असून तो वाहतुकीस योग्य नाही. मात्र त्यानंतरही कारधाकडे जाण्यासाठी जवळचा पुल म्हणून आजही शेकडो नागरिक लहान पुलाचाच उपयोग करतात. दुचाकी, रिक्षा आदी वाहने येथून भरधाव जातात. पुरुषांसोबत महिलाही या पुलावरून आपली वाहने घेऊन जात असल्याचे दृष्य नेहमीच दिसते.यावर्षी पावसाळ्यात दोनदा या पुलावरून पुराचे पाणी वाहून गेले. सुरक्षा कठडेही तुटले होते. पुलावर मोठाले खड्डेही पडले आहेत. अशा स्थितीत जीवघेणा प्रवास सुरु आहे.हा पुल वाहतुकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बंद करण्यात आला आहे. ८ ऑगस्ट २०१६ च्या अधिसूचनेनुसार जुना पुल वाहतुकीस पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. कुणीही जबरीने पुलावरुन प्रवास केल्याने अनुचित घडना घडल्यास प्रशासन जबाबदार राहणार नाही असे म्हटले आहे. याबाबतचे दोन फलक वैनगंगा नदीवरील लहान पुलाच्या दोन्ही बाजूला लावण्यात आले आहे. प्रत्येक वाहनधारक या फलकाकडे पाहतो आणि सुसाट वाहन पळवित असल्याचे चित्र आहे.सुरक्षेच्या दृष्टीने येथे कोणत्याही उपाययोजना नाहीत. एखादा अपघात घडल्यास मदतीलाही कुणी येण्याची शक्यता नाही. प्रशासनाने मात्र आपले कर्तव्य बजावले, परंतु नागरिक त्याला प्रतिसाद देत नसल्याचे दिसते.सुसाईड पॉइंटवैनगां नदीचे दोन्ही पुल सुसाईड पॉइंट म्हणून ओळखले जातात. गत वर्षभरात अनेकांनी या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे. दीड वर्षापूर्वी एका प्रेमी युगुलाने पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर सातत्याने या पुलावरून आत्महत्या करण्याच्या संख्येत वाढ होत आहे. रात्रीबेरात्री या पुलावर कुणीही नसल्याची संधी साधून आत्महत्या केली जाते. त्यानंतर मृतदेह शोधताना मोठी कसरत करावी लागते.पूल कायमचा बंद करावैनगंगा नदीवरील लहान पुलावर लोखंडी कठडे आडवे लावण्यात आले आहेत. परंतु दुचाकी वाहने हे कठडे पार करून पुलावरून प्रवास करतात. बांधकाम विभागाने या पुलाच्या दोन्ही बाजू कायमच्या बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :riverनदी