शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 06:00 IST

जिल्ह्यात शहरीच नव्हे तर आता ग्रामीण भागातही इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु झाल्या आहेत. विद्यार्थी मिळावे म्हणून शाळा व्यवस्थापन पालकांना विविध आमिष देत असतात. त्यात घरापासून शाळेपर्यंत स्कूल बसची सुविधा असल्याचे सांगितले जाते. भरमसाठ फी भरुन विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी पालक आपल्या चिमुकल्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेतात.

ठळक मुद्देअपघाताने वास्तव उघड : गावखेड्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळा

निश्चित मेश्राम।लोकमत न्यूज नेटवर्कपालोरा : ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरु आहे. अप्रशिक्षित चालक आणि असुरक्षित वाहनातून शेकडो चिमुकले प्रवास करतात. पवनी तालुक्यातील सेंद्री खुर्द येथे झालेल्या स्कूलबसच्या अपघातानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.जिल्ह्यात शहरीच नव्हे तर आता ग्रामीण भागातही इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु झाल्या आहेत. विद्यार्थी मिळावे म्हणून शाळा व्यवस्थापन पालकांना विविध आमिष देत असतात. त्यात घरापासून शाळेपर्यंत स्कूल बसची सुविधा असल्याचे सांगितले जाते. भरमसाठ फी भरुन विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी पालक आपल्या चिमुकल्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेतात. घरापासून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरील शाळांमध्ये विद्यार्थी पाठविले जातात. बहुतांश शाळांच्या स्कूल बस असल्यातरी त्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. परिवहन विभागाचे स्कूल बस संदर्भात अत्यंत कडक नियम आहेत. मात्र ग्रामीण भागातील इंग्रजी माध्यमाच्या शाळा या सुरक्षेकडे दुर्लक्ष करतात. अनेक शाळांनी तर स्कूल बस ऐवजी छोट्या वाहनातून विद्यार्थ्यांना असुरक्षितपणे ने-आण केली जाते. या वाहनावरील चालकांच्या कौशल्यशैलीवरही प्रश्नचिन्ह निर्माण होते. अनेक वाहनांवरील चालकतर अप्रशिक्षित असतात. क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी कोंबून नेतात. विद्यार्थ्यांना बसायला जागाही नसते. पवनी तालुक्यातील सेंद्री खुर्द येथे स्कूल बस उलटून ३५ विद्यार्थी जखमी झाले. सुदैवाने प्राणहाणी झाली नाही. मात्र या अपघाताने स्कूल बसच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.पाल्याच्या भविष्यासाठी पालक पदरमोड करुन इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मुलांना पाठवितात. शाळेची भरमसाठ फी भरल्यानंतर प्रवासासाठी स्कूल बसचे वेगळे पैसेही भरतात. परंतू आपल्या मुलाच्या सुरक्षेबाबत कोणताही पालक जागृ्रक असल्याचे दिसत नाही. स्कूल बस असल्याने पोलीसही अशा वाहनावर क्वचितच कारवाई करतात. मुलांच्या वाहनावर कशाला कारवाई म्हणून पोलीस नरमाईची भूमिका घेतात. यामुळेच अशा स्कूल बसचे चांगलेच फावते.स्कूल बससोबतच अनेक विद्यार्थी एसटी महामंडळाने प्रवास करतात. सवलतीचा पास काढून ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरात येतात. परंतू त्यांना दररोज बसमध्ये उभ्यानेच प्रवास करावा लागतो. अनेकदा रात्री उशिरापर्यंत बस मिळत नसल्याने थांब्यावरच थांबून राहावे लागते. विद्यार्थीनींचा सुरक्षेचा प्रश्न यामुळे निर्माण होतो.मानवविकास मिशनच्या बसेस असल्या तरी त्याचा उपयोग प्रवाशांसाठीच केला जातो. यामुळे विद्यार्थी दुर्लक्षीतच राहतात. जिल्ह्यातील सर्व स्कूल बसचे आॅडीट करुन सुरक्षेची खातरजमा करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.विद्यार्थीनींची मोफत पास बंदपहिली ते बारावीपर्यंत बाहेरगावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींना अहिल्याबाई होळकर योजनेमार्फत मोफत एसटी बस पास दिली जात होती. त्यामुळे अनेक मुली बाहेरगावी जावून शिक्षण घेत होत्या. परंतु गत वर्षभरापासून ही पास बंद करण्यात आली. त्यामुळे अनेक मुली उच्च शिक्षणापासून वंचित आहे. पालकांनी मुलींना शहरी भागात पाठविणे बंद केले आहे. ही योजना सुरु करावी अशी मागणी या निमित्ताने पुन्हा एकदा पुढे आली आहे.परिवहन विभागाचे दुर्लक्षस्कूल बस संदर्भात परिवहन विभागाचे कडक नियम आहेत. या नियमांच्या अधिनराहूनच विद्यार्थ्यांची वाहतूक करावी लागते. परंतू ग्रामीण भागातील स्कूल बस सर्व नियम पायदळी तुडवत प्रवास करतांना दिसतात. स्कूल बससोबत शालेय विद्यार्थी वाहतूकीचा परवाना नसलेले वाहनेही विद्यार्थ्यांची ने-आण करतांना दिसतात. आॅटोरिक्षांमध्ये तर विद्यार्थी अक्षरश: कोंबून असतात.आपल्या मुलाला कुठे शिकवावे. हा प्रत्येक पालकाचा अधिकार आहे. परंतु विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडेही पालकाने लक्ष देण्याची गरज आहे. शाळा व्यवस्थापनाने केवळ पैसे कमविण्याच्या नादात चिमुकल्याचे भविष्य हिरावून घेवू नये. स्कूल बसची तपासणी करावी.- बाळू फुलबांधेशिवसेना विधानसभा प्रमुखविद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेरकोंढा-कोसरा : सेंद्री खुर्द गावाजवळ झालेल्या स्कूल बस अपघातातील गंभीर जखमी विद्यार्थी आणि कर्मचारी यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकिय सुत्रांनी सांगितले. भंडारा येथील खाजगी रुग्णालयात या विद्यार्थ्यांवर उपचार सुरु आहे. कोंढा येथील मदर टेरेसा पब्लिक स्कूलच्या बसला अपघात होऊन ३५ विद्यार्थी व चार कर्मचारी जखमी झाले होते. गंभीर जखमी मानसी चिलमकर (४) हिच्या डोक्याला दुखापत झाली आहे. तर मयुरी उपरिकर (९) ही या अपघातात गंभीर जखमी झाली होती. या दोघांवर भंडारातील रुग्णालयात उपचार सुरु आहे. कर्मचारी सुषमा नंदागवळी, संध्या गिरडकर यांच्यावरही उपचार सुरु आहे. दरम्यान या प्रकरणी अड्याळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक चौकशी पोलीस निरीक्षक सुरेश ढोबळे यांच्या मार्गदर्शक जमादार सुभाष मस्के करीत आहे.

टॅग्स :Accidentअपघात